शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये महिलांच्या सामाजिक सुरक्षेचा भराेसा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 20:03 IST

Nagpur News जागतिकीकरणाच्या युगात ‘सराेगेसी मदर’ व ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे माेठे आव्हान आहेत. या दाेन्ही गाेष्टीत याेग्य कायदे नसल्याने महिलांच्या सामाजिक सुरक्षेचा भराेसा करता येत नाही, असे मत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, मुंबईच्या प्राचार्य डाॅ. अस्मिता वैद्य यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘सराेगेसी’च्या कायद्याला अंतिम रूप येतेय

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिकीकरणाच्या युगात ‘सराेगेसी मदर’ व ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे माेठे आव्हान आहेत. या दाेन्ही गाेष्टीत याेग्य कायदे नसल्याने महिलांच्या सामाजिक सुरक्षेचा भराेसा करता येत नाही, असे मत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, मुंबईच्या प्राचार्य डाॅ. अस्मिता वैद्य यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विद्यापीठातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या डाॅ. वैद्य यांनी ‘लाेकमत’शी संवाद साधताना महिला सुरक्षेच्या नव्या आव्हानांवर माहिती दिली. सराेगेसी स्वीकारलेल्या महिलेला सामाजिक व मानसिक छळाचा सामना करावा लागताे. परदेशी पालक असले की ही समस्या भावनिक दृष्टीनेही अधिक व्यापक असते. यासाठी आता कायदा केला जात असून, त्याला अंतिम रूप येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही सामाजिक, सांस्कृतिक आणि कायद्याच्या दृष्टीनेही गुंतागुंतीची समस्या आहे. त्यांनी नुकत्याच घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येचा उल्लेख करीत यातील गंभीरता अधाेरेखित केली. या नात्याला विवाहाचे टॅग नसते. त्यामुळे महिलेच्या सामाजिक सुरक्षेला कुटुंबाचा व कायद्याचाही आधार नसताे. काेणत्याही गाेष्टीची स्पष्टता नसते. त्यामुळे यात घडणारे गुन्हे सर्व प्रकारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहेत. त्यामुळे या गाेष्टींना कायदेशीर रूप देण्याची आवश्यकता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याशिवाय अनेक कायदे असले तरी महिलांवर हाेणारे काैटुंबिक हिंसा, सुरक्षितता, ॲसिड हल्ले, हुंडाप्रथा आणि आता सायबर गुन्हे मानवतेच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याचे डाॅ. वैद्य यांनी सांगितले.

महिलांसाठी ६० च्या वर कायदे; संविधानाचे पाठबळ

डाॅ. अस्मिता वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा ऊहापाेह केला. संविधानामध्ये आर्टिकल १४ ते २३ व पुढे ३९, ४२, ४३, ४४ मध्ये असलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. १८२९ पासून ते संविधान निर्मिती व आताच्या तारखेपर्यंत महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सुरक्षेसाठी ६० च्या वर कायदे करण्यात आले आहेत, ज्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकल्या. पाश्चिमात्य देशातील महिलांना ज्यासाठी संघर्ष करावा लागला, त्या गाेष्टीही भारतीय संविधानाने आधीच दिल्या आहेत. मात्र, याेग्य अंमलबजावणीअभावी महिलांविराेधातील गुन्हे आजही घडत असल्याचे शल्य त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप