शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये महिलांच्या सामाजिक सुरक्षेचा भराेसा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 20:03 IST

Nagpur News जागतिकीकरणाच्या युगात ‘सराेगेसी मदर’ व ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे माेठे आव्हान आहेत. या दाेन्ही गाेष्टीत याेग्य कायदे नसल्याने महिलांच्या सामाजिक सुरक्षेचा भराेसा करता येत नाही, असे मत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, मुंबईच्या प्राचार्य डाॅ. अस्मिता वैद्य यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘सराेगेसी’च्या कायद्याला अंतिम रूप येतेय

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिकीकरणाच्या युगात ‘सराेगेसी मदर’ व ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हे माेठे आव्हान आहेत. या दाेन्ही गाेष्टीत याेग्य कायदे नसल्याने महिलांच्या सामाजिक सुरक्षेचा भराेसा करता येत नाही, असे मत महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, मुंबईच्या प्राचार्य डाॅ. अस्मिता वैद्य यांनी व्यक्त केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विद्यापीठातर्फे आयाेजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या डाॅ. वैद्य यांनी ‘लाेकमत’शी संवाद साधताना महिला सुरक्षेच्या नव्या आव्हानांवर माहिती दिली. सराेगेसी स्वीकारलेल्या महिलेला सामाजिक व मानसिक छळाचा सामना करावा लागताे. परदेशी पालक असले की ही समस्या भावनिक दृष्टीनेही अधिक व्यापक असते. यासाठी आता कायदा केला जात असून, त्याला अंतिम रूप येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही सामाजिक, सांस्कृतिक आणि कायद्याच्या दृष्टीनेही गुंतागुंतीची समस्या आहे. त्यांनी नुकत्याच घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येचा उल्लेख करीत यातील गंभीरता अधाेरेखित केली. या नात्याला विवाहाचे टॅग नसते. त्यामुळे महिलेच्या सामाजिक सुरक्षेला कुटुंबाचा व कायद्याचाही आधार नसताे. काेणत्याही गाेष्टीची स्पष्टता नसते. त्यामुळे यात घडणारे गुन्हे सर्व प्रकारच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहेत. त्यामुळे या गाेष्टींना कायदेशीर रूप देण्याची आवश्यकता असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याशिवाय अनेक कायदे असले तरी महिलांवर हाेणारे काैटुंबिक हिंसा, सुरक्षितता, ॲसिड हल्ले, हुंडाप्रथा आणि आता सायबर गुन्हे मानवतेच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याचे डाॅ. वैद्य यांनी सांगितले.

महिलांसाठी ६० च्या वर कायदे; संविधानाचे पाठबळ

डाॅ. अस्मिता वैद्य यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा ऊहापाेह केला. संविधानामध्ये आर्टिकल १४ ते २३ व पुढे ३९, ४२, ४३, ४४ मध्ये असलेल्या अधिकारांबाबत सविस्तर माहिती दिली. १८२९ पासून ते संविधान निर्मिती व आताच्या तारखेपर्यंत महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सुरक्षेसाठी ६० च्या वर कायदे करण्यात आले आहेत, ज्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ शकल्या. पाश्चिमात्य देशातील महिलांना ज्यासाठी संघर्ष करावा लागला, त्या गाेष्टीही भारतीय संविधानाने आधीच दिल्या आहेत. मात्र, याेग्य अंमलबजावणीअभावी महिलांविराेधातील गुन्हे आजही घडत असल्याचे शल्य त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप