शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी मनपाने १८ वर्षात काय केले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:10 IST

नागपूर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पेंच प्रकल्पातून १९९५ मध्ये ११२ दलघमी पाणी महानगरपालिकेला देण्यात आले. लोकसंख्या वाढल्यावर २००२ मध्ये अटी-शर्तींवर ...

नागपूर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पेंच प्रकल्पातून १९९५ मध्ये ११२ दलघमी पाणी महानगरपालिकेला देण्यात आले. लोकसंख्या वाढल्यावर २००२ मध्ये अटी-शर्तींवर पुन्हा ७८ दलघमी पाणी देण्यात आले. या १८ वर्षाच्या काळात महानगरपालिकेचे पाणीपुरवठ्यासाठी स्वत:चे स्रोत निर्माण करावे असे ठरले होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी मनपाने गेल्या १८ वर्षात काय केले, असा संतापजनक सवाल महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान केला. त्यावर अमृत योजना, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटचे काम सुरू असल्याचे सांगृून मनपाच्या प्रतिनिधींनी वेळ मारून नेली.

ॲड. आशिष जयस्वाल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी नागपुरातील सिंचन सेवा भवन महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणापुढे सुनावणी झाली. प्राधिकरणाचे विधी सदस्य रामनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्राधिकरणाचे सेक्रेटरी रामनाथ सोनवणे, तांत्रिक सदस्य एस. डी. कुलकर्णी, प्राधिकरणाचे अर्थ सदस्य डॉ. एस टी सांगळे आणि सदस्य ॲड. शकुंतला वाडेकर ऑनलाईन उपस्थित होते. तर मनपाच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूर प्रशासक जयंत गवळी, पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड, उपजिल्हाधिकारी गंधे आणि याचिकाककर्तेे आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते.

पेंच प्रकल्पातून घेतल्या जाणाऱ्या पाण्यावर नागपूर शहरातील लोकसंख्येला १८ वर्षापासून पाणीपुरवठा होत आहे. पेंच प्रकल्पातील उपलब्ध पाण्यावर १५ टक्के पेयजल, १० टक्के औद्योगिक वापर आणि ७५ टक्के सिंचनाच्या वापरासाठी हक्क आहे. मात्र १९९५ मध्ये मनपासाठी अटी-शर्तींवर अधीन राहून तात्पुरते पाण्याचे आरक्षण करण्यात आले. पाण्याचे वाढीव आरक्षण देताना ८,४५४ हेक्टर सिंचन कपात करण्यात आली होती. हे करताना मनपाने स्वत:चे स्रोत निर्माण करायचे होते. कन्हानमध्ये रोहणाचे पाणी लिफ्ट करून वाढीव पाईपलाईनमधून ३ टीसीएम पाणी घ्यायचे ठरले होते. कन्हान-कोलारवर बॅरेज बांधायचे होते. पाणीगळती थांबविण्यासाठी पाईपलाईन बदलणे, चोरी थांबविण्यासाठी उपाययोजना करायच्या होत्या. ट्रीटमेंट वॅाटर प्लांट निर्माण करायचे होते. या काळात झालेल्या कामाचा आढावा प्राधिकरणाने सुनावणीदरम्यान घेतला. परंतु काहीच झाले नसल्याचे निदर्शनास आल्यावर नाराजी व्यक्त केली.