शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गच्चीवरून जाणाऱ्या हायटेंशन लाईनवरचा पतंग काढायला गेला आणि ... ; महिन्यापूर्वीच झाले होते लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 21:46 IST

हायटेंशन लाईनमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात कामगार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील कळमनाच्या विजयनगरात घडली.

नागपूर : हायटेंशन लाईनमध्ये अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात कामगार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना कळमनाच्या विजयनगरात घडली आहे.

तुलेश जयलाल साहु (२४) असे मृत युवकाचे नाव आहे. तुलेश वॉटर प्रुफींगचे काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आईवडिल, पत्नी आणि तीन विवाहित बहिणी आहेत. तुलेशचे महिनाभरापूर्वी नताशासोबत लग्न झाले होते. तुलेश चार दिवसांपूर्वी आपल्या गावी गेला होता. आज दुपारी ४ वाजता तो गावावरून परतला. सायंकाळी ५ वाजता तो आपल्या घराच्या गच्चीवर उभा होता. त्यावेळी त्याची नजर घराच्या छतावरून गेलेल्या हायटेंशन लाईनमध्ये अडकलेल्या पतंगावर गेली. तुलेशने पतंग काढण्यासाठी पडद्याचा पाईप काढला. पाईपच्या मदतीने तो पतंग काढत होता. पाईप हायटेंशन लाईनला लागल्यामुळे तुलेशला वीजेचा धक्का लागला. तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला.

नगरसेवक पुरुषोत्तम हजारे, सामाजिक कार्यकर्ता रामदास साहु, दिनेश फटींग त्वरीत घटनास्थळी पोहोचले. तुलेशला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. तुलेशचे १४ डिसेंबरला लग्न झाले होते. एकुलता एक मुलगा असल्यामुळे आईवडिलांनी धुमधडाक्यात त्याचे लग्न केले होते. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यावर तुलेश गावावरून परत आला होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विजयनगर परिसरातील नागरिक त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करीत आहेत. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दोघांनी गमविला जीव

पतंग काढण्याच्या आणि पकडण्याच्या प्रयत्नात काही दिवसात कोराडी आणि पारडीत दोन बालकांचा विहिरीत तसेच नाल्यात पडून मृत्यु झाला आहे. दरवर्षी मकरसंक्रातीला अशा घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येऊनही पतंगाच्या नादात अनेकजण आपला जीव धोक्यात घालत असल्याची स्थिती आहे.

.................

टॅग्स :Deathमृत्यू