शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

कमजोर प्रतिकारक्षमता आणि उपचारातील दिरंगाईने वाढला मृत्यूदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 23:50 IST

Corona Virus mortality कोराेना संक्रमित आणि संकमणातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा होत असल्याचे प्रकार,  हृदय आणि फुफ्फुस बंद पडत असल्याने मृत्यू वाढत आहेत. मात्र नागपुरात होणारे मृत्यू हे कमजोर प्रतिकार क्षमता व भीतीमुळे उपचारात होणारी दिरंगाई या कारणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहेत.

ठळक मुद्देरक्ताच्या गुठळ्या जमा होण्याच्या घटनांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोराेना संक्रमित आणि संकमणातून बाहेर पडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या जमा होत असल्याचे प्रकार,  हृदय आणि फुफ्फुस बंद पडत असल्याने मृत्यू वाढत आहेत. मात्र नागपुरात होणारे मृत्यू हे कमजोर प्रतिकार क्षमता व भीतीमुळे उपचारात होणारी दिरंगाई या कारणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंमध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मृत्यूंची टक्केेवारी ६० पेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात रोज ५० ते ५५ मृत्यू होत आहेत. ८५ टक्के रुग्णांमध्ये संक्रमणाची कसलीही लक्षणे दिसत नसल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळून आले आहे. मात्र ज्यांच्यामध्ये ही लक्षणे दिसत नाहीत, त्यांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आजारातून दुरुस्त झाल्यावर नियमित आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. ६ टक्के रुग्ण गंभीर होतात. हे विषाणू रक्तवाहिन्या, फुफ्फुस, हृदयाला नुकसान पोहचवतात. ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्याने शरीरावर विपरीत परिणाम पडतो. ‘लोकमत’ने शहरातील काही विशेषज्ञांसोबत चर्चा करून मृत्यूची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मृत्यूची कारणे

- मधुमेह, रक्तदाबाची समस्या

- हृदय, फुफ्फुस व किडनीचे आजार

- उपचार करण्यात होत असलेला विलंब

- ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये असणारी कमी प्रतिकारक्षमता

- रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्याने हृदय व फुफ्फुस बंद पडण्याचे प्रकार

रक्त पातळ करण्याचे औषध : केवलिया

मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया म्हणाले, कोविड रुग्णांना रक्त पातळ होण्याचे औषध दिले जाते. विषाणू रक्रवाहिन्यात गेल्याने नुकसान करतात. यामुळे सतर्कता बाळगायला हवी.

लक्षणे नसणाऱ्यांनी सावध राहावे : जगताप

हृदयरोग विशेषज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, लक्षण नसणाऱ्यांमध्ये दीड महिन्यांनी क्लॉटिंग होणे दिसायला लागते. यामुळे हृदय, फुफ्फुस बंद पडणे असे प्रकार आढळतात. मात्र हे प्रमाण कमी आहे.

असा करतात परिणाम

मानवी शरीरातील फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन घेऊन कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडला जातो.मात्र कोरोनामुळे तयार झालेल्या लहान लहान एअरसॅकमुळे त्यात पाणी जमा व्हायला लागते. त्यामुळे श्वास घेता येत नाही. परिणामत: ऑक्सिजन लावावा लागतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू