शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

हम लड़ेंगे और जीतेंगे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:40 AM

देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचा निर्धार : इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता सोहळा

ऑनलाईन लोकमत नागपूर : देश एकसंघ राहिला पाहिजे यासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. त्या प्रभावशाली पंतप्रधान होत्या. भारत शक्तिशाली देश असल्याचा त्यांनी जगाला संदेश दिला. परंतु गेल्या तीन वर्षात देशातील लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. १९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांनी नागपुरात ‘हम हारे तो क्या हुआ, फिर जितेंगे’ असा विश्वास व्यक्त केला होता. याच नागपुरात ‘हम लड़ेंगे और जीतेंगे’ असा निर्धार करून पुढील निवडणुकीत सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने सिव्हील लाईन येथील चिटणवीस सेंटरच्या मैदानावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, काँग्रेसचे विधानसभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, माजी खासदार भीमराराज भाटी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी हा देश घडविला. परंतु शासनकर्ते सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून इतिहासात बदल करून या नेत्यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुस्तकातून पुसाल परंतु लोकांच्या मनातून या नेत्यांना पुसता येणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वामुळे भाजपा हादरला आहे. गुजरात निवडणुकीत सोनिया गांंधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शंभर टक्के निवडून येईल. या निवडणुकीत पराभव दिसत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची टीका चव्हाण यांनी केली.देशात परिवर्तनाचे वारे सुरू झाले आहे. नांदेड, भिवंडी, मालेगाव, गुरुदासपूर व चित्रकूट येथील निकाल याचे द्योतक आहे. व्यापारीही आता‘कमल का फूल एकही भूल’ असे म्हणत आहे. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला होता. परंतु भाजपा सरकार गरिबाला हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. इंदिराजींना कठीण काळात‘लोकमत’चे जाहीर आभारइंदिरा गांधी एकविसाव्या शतकातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. या पोलादी महिलेच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘लोकमत’ने त्यांच्या जीवनावर आधारित विशेषांक काढला. या माध्यमातून नवीन पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. या उपक्रमाचे कौतुक करून अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून लोकमतचे जाहीर आभार मानले.