शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

By आनंद डेकाटे | Updated: June 29, 2025 19:06 IST

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची संधी देशाने गमावली

नागपूर : पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी कशाचीही तमा न बाळगता पाकिस्तानचे दाेन तुकडे केले. तशीच संधी पुन्हा चालून आली होती. देशाचेे सैन्य लढाई जिंकण्याच्या जवळ आले होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नाकर्त्या पंतप्रधानांमुळे आपण जिंकलेली लढाई हरलो. ट्रम्पने युध्दबंदी घोषीत करावी एवढी पत विश्वगुरूमुळे भारताची जगात घसरली' अशी जहीर टीका वंचित बहुजन आघाडी नेते माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. संघाची कुबडी घेऊन राजकारण करणाऱ्या मोदींना ट्रम्पची दादागिरी मोडता आली नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

रविवारी फुले-आंबेडकर इंटेलेक्चुअल फोरमच्यावतीने कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवन येथे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची परिस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरची पोलखोल करीत भारताची जगात झालेली नाचक्की, पाकिस्तानची कायमची जिरविण्याची संधी आणि विरोधकांची मिळमिळीत भूमिका यावर बोचरी टीका केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही लुटपुटूची लढाई आहे. या युध्दात भारत सपशेल हरला आहे. हल्ला दहशतवादी केंद्रातून नव्हे पाकिस्तानातून होत असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. पाकिस्तानचे पाच तुकडे वा नेस्तनाबुत करण्याची मोठी संधी देशाने गमावली. विश्वगुरू जग पालथा घालत आहेत. परंतु, एकाही राष्ट्राला आपल्या बाजूने उभे करू शकले नाहीत. प्रास्ताविक डॉ.सर्जनादित्य मनोहर यांनी केले. संचालन प्रा.डॉ. राजेंद्र डोंगरे यंनी केले. प्रा. अनिकेत मून यांनी आभार मानले.

- भाजप-संघाचे राजकारण देशासाठी घातकसंघाचे बोधचिन्ह स्वास्तिक आहे. ते हिटलरला मानतात. दुसरीकडे इस्त्रायलवर अवलंबून आहेत. अर्थात ज्यूंवर अवलंबून आहे. हिटलर व ज्यू यांचा '३६' चा आकडा आहे. संघ याच आकड्याशी खेळत आहे. असे अतात्वीक राजकारण देशासाठी घातक असल्याचे आंबेडकर म्हणाले.

- फुले शाहू आंबेडकर चळवळीला नेतृत्वाची संधीपाकिस्तानची निमींती असो वा देशातील इतरही प्रश्न, यावर कॉंग्रेस, संघ, माकप काहीही बोलणार नाही. त्यांचा नाइलाज आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला नेतृत्व करण्याची संधी आहे. त्यामुळे मौनीवृत्ती सोडा सरकारला थेट प्रश्न विचारा, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर