शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

By आनंद डेकाटे | Updated: June 29, 2025 19:06 IST

पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची संधी देशाने गमावली

नागपूर : पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे. जेव्हा इंदिरा गांधी यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी कशाचीही तमा न बाळगता पाकिस्तानचे दाेन तुकडे केले. तशीच संधी पुन्हा चालून आली होती. देशाचेे सैन्य लढाई जिंकण्याच्या जवळ आले होते. परंतु नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नाकर्त्या पंतप्रधानांमुळे आपण जिंकलेली लढाई हरलो. ट्रम्पने युध्दबंदी घोषीत करावी एवढी पत विश्वगुरूमुळे भारताची जगात घसरली' अशी जहीर टीका वंचित बहुजन आघाडी नेते माजी खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केला. संघाची कुबडी घेऊन राजकारण करणाऱ्या मोदींना ट्रम्पची दादागिरी मोडता आली नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

रविवारी फुले-आंबेडकर इंटेलेक्चुअल फोरमच्यावतीने कस्तुरचंद पार्क जवळील परवाना भवन येथे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची परिस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ऑपरेशन सिंदूरची पोलखोल करीत भारताची जगात झालेली नाचक्की, पाकिस्तानची कायमची जिरविण्याची संधी आणि विरोधकांची मिळमिळीत भूमिका यावर बोचरी टीका केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर ही लुटपुटूची लढाई आहे. या युध्दात भारत सपशेल हरला आहे. हल्ला दहशतवादी केंद्रातून नव्हे पाकिस्तानातून होत असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सुरू आहे. पाकिस्तानचे पाच तुकडे वा नेस्तनाबुत करण्याची मोठी संधी देशाने गमावली. विश्वगुरू जग पालथा घालत आहेत. परंतु, एकाही राष्ट्राला आपल्या बाजूने उभे करू शकले नाहीत. प्रास्ताविक डॉ.सर्जनादित्य मनोहर यांनी केले. संचालन प्रा.डॉ. राजेंद्र डोंगरे यंनी केले. प्रा. अनिकेत मून यांनी आभार मानले.

- भाजप-संघाचे राजकारण देशासाठी घातकसंघाचे बोधचिन्ह स्वास्तिक आहे. ते हिटलरला मानतात. दुसरीकडे इस्त्रायलवर अवलंबून आहेत. अर्थात ज्यूंवर अवलंबून आहे. हिटलर व ज्यू यांचा '३६' चा आकडा आहे. संघ याच आकड्याशी खेळत आहे. असे अतात्वीक राजकारण देशासाठी घातक असल्याचे आंबेडकर म्हणाले.

- फुले शाहू आंबेडकर चळवळीला नेतृत्वाची संधीपाकिस्तानची निमींती असो वा देशातील इतरही प्रश्न, यावर कॉंग्रेस, संघ, माकप काहीही बोलणार नाही. त्यांचा नाइलाज आहे. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरी चळवळीला नेतृत्व करण्याची संधी आहे. त्यामुळे मौनीवृत्ती सोडा सरकारला थेट प्रश्न विचारा, असे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर