लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात परत आली. परंतु तेव्हापर्यंत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे प्रभावित झाली होती. नवेगाव खैरीमध्ये वीज गेल्याने सर्वाधिक परिणाम पडला.नवेगाव खैरी येथे ब्रेकडाऊनमुळे लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, गांधीनगर झोनमध्ये येणाऱ्या जलकुंभांसह बोरियापुरा फीडरमधून रविवारपर्यंत पाणीपुरवठा प्रभावित राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा होणार नाही.एकीकडे तोतलाडोह धरणामधील डेड स्टॉक पाणीही हळूहळू संपत आले आहे. त्यावर वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहरात अचानक जलसंकट निर्माण झाले आहे. ओसीडब्ल्यूतर्फे सांगण्यात आले आहे की, नवेगाव खैरी येथे झालेल्या ब्रेकडाऊनमुळे दुपारी ३ वाजता कच्च्या पाण्याचे पंपिंग अचानक थांबले. परिणामी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाणी उचलता येऊ शकले नाही. यामुळे पेंच-१, पेंच-२, पेंच-३ दुपारी ४.३० वाजेपर्यंत पूर्णपणे ठप्प झाले होते. पाण्याच्या टाक्या खाली झाल्या होत्या. नळ तर सोडाच टँकरनेही पाणीपुरवठा होऊ शकला नाही.पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार ब्रेकडाऊनमुळे शनिवारी व रविवारी अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर शहरातील काही भागात सीमित पाणीपुरवठा केला जाईल. गोरेवाडा तलावाची पातळीसुद्धा ३११.८० मीटरवर आली आहे. ती पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी बिलकूल योग्य नाही. येथून पाणीसुद्धा उचलले जाऊ शकत नाही.सलग सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडितनवेगाव खैरीमध्ये वादळामुळे सलग सहा दिवसांपासून ब्रेकडाऊन होत आहे. नंतर महावितरणतर्फे वीज उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु पंपिंग एक तासही बंद राहिले तर त्याचा परिणाम दिवसभर राहतो. २ जून रोजी रात्री ४ तास, ५ जून रोजी सकाळी व ६ जून रोजी एक तासासाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. ७ जून रोजी दुपारी झालेल्या ब्रेकडाऊनमुळे पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.दुसऱ्या लाईनवरून वीज पुरवठाशहरातील पाणीपुरवठा प्रभावित होत असल्याची माहिती मिळताच महावितरणने तात्काळ उपाययोजना सुरू केली. सावनेर येथील कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांच्यानुसार पाऊस व वादळामुळे वीज वितरण यंत्रणा मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त आहे. तरीही पाणीपुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून लगेच दुसऱ्या लाईनवरून वीज उपलब्ध करण्यात आली. उर्वरित ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. पारशिवनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश मछले आपल्या चमूसह प्रयत्न करीत आहेत.
वादळामुळे नागपूर शहरातील पाणीपुरवठा प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:22 IST
नवेगाव खैरी डॅम परिक्षेत्रात शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा संकटात सापडला आहे. दुपारी ३ वाजता वादळामुळे नवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर एका तासानंतर कन्हान पंपिंग स्टेशनमधील वीज गेली. कन्हानमधील वीज तासाभरात परत आली. परंतु तेव्हापर्यंत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे प्रभावित झाली होती. नवेगाव खैरीमध्ये वीज गेल्याने सर्वाधिक परिणाम पडला.
वादळामुळे नागपूर शहरातील पाणीपुरवठा प्रभावित
ठळक मुद्देनवेगाव खैरी येथील वीज पुरवठा खंडितधरमपेठ, लक्ष्मीनगर, धंतोली व गांधीनगर झोनसह बोरियापुऱ्यावर पडणार प्रभाव