शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर विभागातील धरणात पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 23:08 IST

विभागातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (२२ ऑगस्ट) ४०.२१ टक्के इतकी भरली आहेत.

ठळक मुद्दे४०.२१ टक्के धरणे भरली : असोलामेंढा, दिना, पोथरा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागातील मोठ्या धरणांमधीलपाणीसाठा वाढू लागला आहे. विभागातील मोठी धरणे आजच्या तारखेला (२२ ऑगस्ट) ४०.२१ टक्के इतकी भरली आहेत. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आसोलामेंढा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा धरण १०० टक्के भरले आहे.नागपूर विभागात १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ही ३५५३.४९ दलघमी इतकी आहे. यात आजच्या तारखेला १४२८.८७ दलघमी (४०.२१ टक्के ) इतकी भरली आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ९.६० टक्के, कामठी खैरी २७.२५ टक्के, रामटेक १५.८२ टक्के, लोवर नांद ७२.७५ टक्के, वडगाव ८१.०४ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ७८ टक्के, सिरपूर ४९.९३, पुजारी टोला ७८.६८ टक्के, कालिसरार ५१.४९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-(२) २९.१९ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर ३०.३९ टक्के, धाम ७७.९४, लोअर वर्धा ३८.२६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द ५६.४५ टक्के भरले आहेत.मध्यम तलावही ६५.९३ टक्के भरलेमोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत विभागातील मध्यम स्वरुपातील तलाव ६५.९३ टक्के भरले आहेत. विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ३५४.४२ दलघमी म्हणजेच ६५.९३ टक्के इतके पाणी साठले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी