शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

राख बंधारा फुटला, जलस्त्रोत दूषित; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाेटीस देण्याऐवजी सूचनावजा सल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 16:16 IST

राख संग्रहण तलावाचा बंधारा फुटला : ४७.४० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

काेराडी (नागपूर) : खसाळा (ता. कामठी) शिवारातील वीज केंद्राचा राख संग्रहण बंधारा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये राखमिश्रित पाणी पसरले. या पाण्यामुळे ४७.४० हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले असून, जलस्राेत दूषित झाले आहेत. या प्रकरणात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज केंद्राला नाेटीस बजावण्याऐवजी त्यांच्या अधिकाऱ्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांसाेबत रविवारी या बंधाऱ्यासह संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत यावर कायमस्वरूपी उपाययाेजनांबाबत काही सूचना केल्या.

राख संग्रहण बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीचे महानिर्मिती आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र सर्वेक्षण केले. महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे त्यांनीही फुटलेला बंधारा व नुकसानीची पाहणी केली. बंधाऱ्यातील राखमिश्रित पाण्यामुळे कामठी तालुक्यातील खैरी, खसाळा, मसाळा, कवठा व सुरादेवी शिवारातील पिकांचे, तसेच मसाळा येथील ६० घरांचे नुकसान झाले असून, या भागातील जलस्राेत दूषित झाले आहेत. शिवाय, पांदण रस्ते खरडून गेले असून, खैरी गावाजवळी नाल्यावरील पूल, मसाळा-सुरादेवी रस्त्यावरील पुलाचे नुकसान झाले. मसाळा येथील बलदेव बरबटकर यांची म्हैश मृत्यूमुखी पडली. या सर्व बाबींचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती महानिर्मितीचे अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. बंधारा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

माती व पाणी प्रदूषणाबाबत उपाययाेजना शून्य

वीज केंद्रातील राखेत आधीच घातक घटक मिसळलेले असतात. बंधाऱ्यातील राखमिश्रित पाण्यामुळे पाच गावांच्या शिवारातील शेती (शेतातील माती), तसेच विहिरी, नाले व इतर जलस्राेत दूषित झाले आहेत. याचे मानवी व गुरांच्या आराेग्यावर, तसेच शेतीच्या सुपीकतेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानिर्मिती प्रशासन काय प्रभावी उपाययाेजना करणार आहे, हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही.

पाणीपुरवठ्याच्या विहिरीत साचली राख

या बंधाऱ्यातील राखमिश्रित पाणी नाल्याद्वारे वाहत येत खैरी, खसाळा, मसाळा व कवठा या गावांच्या पाणीपुरवठा विहिरींमध्ये शिरल्याने त्यात राख साचल्याने या विहिरी काही काळासाठी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महानिर्मितीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तात्पुरती उपाययाेजना केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीnagpurनागपूर