शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

राख बंधारा फुटला, जलस्त्रोत दूषित; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नाेटीस देण्याऐवजी सूचनावजा सल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 16:16 IST

राख संग्रहण तलावाचा बंधारा फुटला : ४७.४० हेक्टरमधील पिकांचे नुकसान

काेराडी (नागपूर) : खसाळा (ता. कामठी) शिवारातील वीज केंद्राचा राख संग्रहण बंधारा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये राखमिश्रित पाणी पसरले. या पाण्यामुळे ४७.४० हेक्टरमधील विविध पिकांचे नुकसान झाले असून, जलस्राेत दूषित झाले आहेत. या प्रकरणात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज केंद्राला नाेटीस बजावण्याऐवजी त्यांच्या अधिकाऱ्यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांसाेबत रविवारी या बंधाऱ्यासह संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठकीत यावर कायमस्वरूपी उपाययाेजनांबाबत काही सूचना केल्या.

राख संग्रहण बंधारा फुटल्याने झालेल्या नुकसानीचे महानिर्मिती आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतंत्र सर्वेक्षण केले. महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे त्यांनीही फुटलेला बंधारा व नुकसानीची पाहणी केली. बंधाऱ्यातील राखमिश्रित पाण्यामुळे कामठी तालुक्यातील खैरी, खसाळा, मसाळा, कवठा व सुरादेवी शिवारातील पिकांचे, तसेच मसाळा येथील ६० घरांचे नुकसान झाले असून, या भागातील जलस्राेत दूषित झाले आहेत. शिवाय, पांदण रस्ते खरडून गेले असून, खैरी गावाजवळी नाल्यावरील पूल, मसाळा-सुरादेवी रस्त्यावरील पुलाचे नुकसान झाले. मसाळा येथील बलदेव बरबटकर यांची म्हैश मृत्यूमुखी पडली. या सर्व बाबींचे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती महानिर्मितीचे अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. बंधारा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

माती व पाणी प्रदूषणाबाबत उपाययाेजना शून्य

वीज केंद्रातील राखेत आधीच घातक घटक मिसळलेले असतात. बंधाऱ्यातील राखमिश्रित पाण्यामुळे पाच गावांच्या शिवारातील शेती (शेतातील माती), तसेच विहिरी, नाले व इतर जलस्राेत दूषित झाले आहेत. याचे मानवी व गुरांच्या आराेग्यावर, तसेच शेतीच्या सुपीकतेवर दूरगामी परिणाम हाेणार आहे. हे परिणाम टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महानिर्मिती प्रशासन काय प्रभावी उपाययाेजना करणार आहे, हे मात्र त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही.

पाणीपुरवठ्याच्या विहिरीत साचली राख

या बंधाऱ्यातील राखमिश्रित पाणी नाल्याद्वारे वाहत येत खैरी, खसाळा, मसाळा व कवठा या गावांच्या पाणीपुरवठा विहिरींमध्ये शिरल्याने त्यात राख साचल्याने या विहिरी काही काळासाठी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महानिर्मितीने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तात्पुरती उपाययाेजना केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणWaterपाणीnagpurनागपूर