शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीद्वारे जलसंकटावर मात : खापरखेडा वीज केंद्राचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:39 IST

जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला ५०० मेगावॉट व त्याखालील औण्षिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरिता मिशन एनर्जी फाऊंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धनविषयक स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्काराची मोहोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला ५०० मेगावॉट व त्याखालील औण्षिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरिता मिशन एनर्जी फाऊंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धनविषयक स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.देशभरातील शासकीय, अर्धशासकीय आणि खासगी औष्णिक वीज केंद्रांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पाण्याची नासाडी थांबवण्याच्या दृष्टीने वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे खापरखेडा वीज केंद्र सर्वात पुढे राहिले. स्पर्धेचा निर्णय करण्यासाठी मिशन एनर्जी फाऊंडेशनने केंद्रीय विद्युत प्राधिकरणच्या आकडेवारीला आधार बनवले होते. खापरखेडा केंद्र वारेगाव राख केंद्रात राख मिश्रीत पाण्याचा पुन्हा उपयोग करीत आहे. याचप्रकारे ३० वर्षे जुन्या युनिटमधून वीज उत्पादन प्रक्रियेनंतर बाहेर निघणाऱ्या पाण्याचाही पुन्हा वापर करून खापरखेडा केंद्र पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करीत आहे. खापरखेडा केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांचे म्हणणे आहे की, वाढते तापमान, शहरीकरण आणि अपुरा पाऊस यामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याची बचत व त्याचा पुन्हा उपयोग ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक (परिचालन) चंद्रकांत थोटवे यांच्या मार्गदर्शनात पाण्याचा योग्य उपयोगासाठी खापरखेडा येथे जनजागृती अभियान चालविण्यात आले. पाण्याचे शून्य निसऱ्याचे लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच खापरखेडा केंद्राला हे यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.मागणीपेक्षा कमी उपयोगखापरखेडा वीज केंद्रात १२०००० एमएम ३ पाणी दररोज संग्रही ठेवले जात आहे. १००००० एम ३ पाण्याची मागणी आहे, परंतु खापरखेडा वीज केंद्रात जास्तीत जास्त ७५००० एम ३ पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम ३ पाण्याची आवश्यकता रिसायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.पाणी वाचवण्यासाठी काय-काय केले२१० मेगावॉटच्या जुन्या युनिटमधून दर दिवशी १७००० एम ३/ दूषित पाणी बाहेर पडत होते. ते रोखून दरदिवशी ९००० एम ३ स्तरापर्यंत आणण्यात आले.केंद्रातील कॉलनीमधील पाण्याची मागणी १२०० एम ३ पर्यंत कमी आणण्यात आली.कॉलनीतील एसटीपीमध्ये दूषित पाण्याचा पुन्हा वापर करण्याच्या क्षमतेला ५०० एम ३ प्रतिदिन वाढवण्यात आले.एसटीपीमधून पुन्हा उपयोगासाठी तयार पाण्याचा उपयोग राखेच्या देखभालीसाठीवारेगाव राख केंद्रात पुन्हा उपयोगासाठी प्राप्त होणाऱ्या पाण्याला १०००० एम ३ प्रतिदिन १७००० पर्यंत वाढवण्यात आले.

टॅग्स :electricityवीजWaterपाणी