शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

पाणी बचतीद्वारे जलसंकटावर मात : खापरखेडा वीज केंद्राचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:39 IST

जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला ५०० मेगावॉट व त्याखालील औण्षिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरिता मिशन एनर्जी फाऊंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धनविषयक स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय पुरस्काराची मोहोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा जलसंकटात सापडला आहे. तलाव, धरणे आटली आहेत. पाण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजला आहे. प्रशासन चिंतेत पडले आहे. अशा परिस्थितीत खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात पाणी बचत करून जलसंकटावर मात करण्यास सुरुवात झाली आहे. दिल्ली येथे आयोजित समारंभात खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला ५०० मेगावॉट व त्याखालील औण्षिक वीज केंद्र संवर्गात पाण्याच्या शून्य निसऱ्याकरिता मिशन एनर्जी फाऊंडेशन या संस्थेद्वारे पाणी संवर्धनविषयक स्पर्धेत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.देशभरातील शासकीय, अर्धशासकीय आणि खासगी औष्णिक वीज केंद्रांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पाण्याची नासाडी थांबवण्याच्या दृष्टीने वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे खापरखेडा वीज केंद्र सर्वात पुढे राहिले. स्पर्धेचा निर्णय करण्यासाठी मिशन एनर्जी फाऊंडेशनने केंद्रीय विद्युत प्राधिकरणच्या आकडेवारीला आधार बनवले होते. खापरखेडा केंद्र वारेगाव राख केंद्रात राख मिश्रीत पाण्याचा पुन्हा उपयोग करीत आहे. याचप्रकारे ३० वर्षे जुन्या युनिटमधून वीज उत्पादन प्रक्रियेनंतर बाहेर निघणाऱ्या पाण्याचाही पुन्हा वापर करून खापरखेडा केंद्र पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करीत आहे. खापरखेडा केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांचे म्हणणे आहे की, वाढते तापमान, शहरीकरण आणि अपुरा पाऊस यामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाण्याची बचत व त्याचा पुन्हा उपयोग ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर संचालक (परिचालन) चंद्रकांत थोटवे यांच्या मार्गदर्शनात पाण्याचा योग्य उपयोगासाठी खापरखेडा येथे जनजागृती अभियान चालविण्यात आले. पाण्याचे शून्य निसऱ्याचे लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. येथील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच खापरखेडा केंद्राला हे यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.मागणीपेक्षा कमी उपयोगखापरखेडा वीज केंद्रात १२०००० एमएम ३ पाणी दररोज संग्रही ठेवले जात आहे. १००००० एम ३ पाण्याची मागणी आहे, परंतु खापरखेडा वीज केंद्रात जास्तीत जास्त ७५००० एम ३ पाण्याचा उपयोग होत आहे. ३० हजार एम ३ पाण्याची आवश्यकता रिसायकलिंगच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.पाणी वाचवण्यासाठी काय-काय केले२१० मेगावॉटच्या जुन्या युनिटमधून दर दिवशी १७००० एम ३/ दूषित पाणी बाहेर पडत होते. ते रोखून दरदिवशी ९००० एम ३ स्तरापर्यंत आणण्यात आले.केंद्रातील कॉलनीमधील पाण्याची मागणी १२०० एम ३ पर्यंत कमी आणण्यात आली.कॉलनीतील एसटीपीमध्ये दूषित पाण्याचा पुन्हा वापर करण्याच्या क्षमतेला ५०० एम ३ प्रतिदिन वाढवण्यात आले.एसटीपीमधून पुन्हा उपयोगासाठी तयार पाण्याचा उपयोग राखेच्या देखभालीसाठीवारेगाव राख केंद्रात पुन्हा उपयोगासाठी प्राप्त होणाऱ्या पाण्याला १०००० एम ३ प्रतिदिन १७००० पर्यंत वाढवण्यात आले.

टॅग्स :electricityवीजWaterपाणी