शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:25 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसह पाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.

ठळक मुद्देराज्य महामार्गासह जलसंधारणाची कामे : गडकरींच्या निर्णयाचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसहपाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.महाराष्ट्रातील अनेक भाग आजही दुष्काळग्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या होताहेत. या गंभीर समस्येची जाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘महामार्गाचे रुंदीकरण करतांना परिसरातील नदी-तलावांचे खोलीकरण करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य महामार्ग बांधत असताना मोठ्या प्रमाणावर मातीची गरज असते. ही माती बाहेरून बोलावली जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत रस्ता रुंदीकरण करताना जवळपासच्या नदी-तलावांमधील गाळाचा वापर करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली. यातून दोन फायदे होत आहेत. एक तर नदी-तलावातील गाळ काढून या मातीची गरज भागवल्यास रस्ता बांधकामास मदत होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल आणि नदी तलावांचे खोलीकरण होऊन ते पुनर्जीवित होत आहेत. यातून जलसंधारणाचे कामही होत आहे.महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हा परिसरही शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. गडकरींच्या निर्णयानंतर या परिसरातील नदी, नाले आणि तलावांना पुनर्जीवित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथील राज्य महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे खामगावमध्ये अनेक सकारात्मक बदलांनी गती पकडली आहे. यापूर्वी या भागात पाणी साठवण्याची क्षमता खूप कमी होती. त्यामुळे भरपूर पाऊस होऊनही नदी, नाले, तलाव आणि बांधांमधील पाणी पुन्हा वाहून जात होते. परंतु यावेळी जलस्रोतांवर बांध बांधल्यामुळे आणि नदी-नाले व तलावातील गाळ काढल्यामुळे वाहून जाणारे पाणी नदी-नाले व तलावांमध्ये थांबले आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या ३० वर्षानंतर येथील नदी-नाले व तलावांमध्ये इतके पाणी असल्याचे पाहायला मिळाले आहे.असे बदलले चित्रबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग सुधाराचे चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मातीसाठी २७ तलाव आणि १२ नदींमधील गाळ काढण्यात आला आहे. एकूण ३०,७५,००० घनमीटर माती काढण्यात आली. यामुळे या नदी-तलवातील पाणी साठवण्याची क्षमता वाढून ती ३०७५ टीसीएम पर्यंत पोहोचली आहे. यामुळे परिसरातील ५२ गावे आणि ३८ पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ झाला आहे. तसेच आतापर्यंत १५,००० विहिरीसुद्धा पुन्हा पाण्याने भरल्या आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्गWaterपाणी