शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:25 IST

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसह पाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.

ठळक मुद्देराज्य महामार्गासह जलसंधारणाची कामे : गडकरींच्या निर्णयाचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसहपाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.महाराष्ट्रातील अनेक भाग आजही दुष्काळग्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या होताहेत. या गंभीर समस्येची जाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘महामार्गाचे रुंदीकरण करतांना परिसरातील नदी-तलावांचे खोलीकरण करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य महामार्ग बांधत असताना मोठ्या प्रमाणावर मातीची गरज असते. ही माती बाहेरून बोलावली जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत रस्ता रुंदीकरण करताना जवळपासच्या नदी-तलावांमधील गाळाचा वापर करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली. यातून दोन फायदे होत आहेत. एक तर नदी-तलावातील गाळ काढून या मातीची गरज भागवल्यास रस्ता बांधकामास मदत होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल आणि नदी तलावांचे खोलीकरण होऊन ते पुनर्जीवित होत आहेत. यातून जलसंधारणाचे कामही होत आहे.महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हा परिसरही शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. गडकरींच्या निर्णयानंतर या परिसरातील नदी, नाले आणि तलावांना पुनर्जीवित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथील राज्य महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे खामगावमध्ये अनेक सकारात्मक बदलांनी गती पकडली आहे. यापूर्वी या भागात पाणी साठवण्याची क्षमता खूप कमी होती. त्यामुळे भरपूर पाऊस होऊनही नदी, नाले, तलाव आणि बांधांमधील पाणी पुन्हा वाहून जात होते. परंतु यावेळी जलस्रोतांवर बांध बांधल्यामुळे आणि नदी-नाले व तलावातील गाळ काढल्यामुळे वाहून जाणारे पाणी नदी-नाले व तलावांमध्ये थांबले आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या ३० वर्षानंतर येथील नदी-नाले व तलावांमध्ये इतके पाणी असल्याचे पाहायला मिळाले आहे.असे बदलले चित्रबुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग सुधाराचे चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मातीसाठी २७ तलाव आणि १२ नदींमधील गाळ काढण्यात आला आहे. एकूण ३०,७५,००० घनमीटर माती काढण्यात आली. यामुळे या नदी-तलवातील पाणी साठवण्याची क्षमता वाढून ती ३०७५ टीसीएम पर्यंत पोहोचली आहे. यामुळे परिसरातील ५२ गावे आणि ३८ पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ झाला आहे. तसेच आतापर्यंत १५,००० विहिरीसुद्धा पुन्हा पाण्याने भरल्या आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्गWaterपाणी