शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तापदायक तापमान पुन्हा घेणार उसळी; दाेन दिवस उष्ण लाटेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 13:38 IST

हवामान विभागाने पुन्हा दाेन दिवस १२ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्ण लाटेचा इशारा दिला.

ठळक मुद्देनागपूर ४१.२, अकाेला ४३.९

नागपूर : गेल्या १५ पेक्षा अधिक दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेने सर्वसामान्यांची डाेकेदुखी वाढविली आहे. काही केल्या पारा खाली येण्यास तयार नाही. नागपूरसह काही भागांत दाेन दिवस ढगाळ वातावरणाने ४० अंशाच्या आसपास घटला हाेता, पण रविवारी पुन्हा पाऱ्याने उसळी घेतली. १.२ अंशाची वाढ हाेऊन ताे ४१.२ अंशावर पाेहोचला. अकाेल्यात ४३.९ अंशावर स्थिर असलेल्या तापमानाने नागरिकांना हैराण केले आहे. हवामान विभागाने पुन्हा दाेन दिवस १२ एप्रिलपर्यंत विदर्भात उष्ण लाटेचा इशारा दिला.

हवामान विभागाने पुढचे पाच दिवस पूर्व-पश्चिम राजस्थानसह हरियाणा, दिल्ली, पूर्व-पश्चिम उत्तर प्रदेश व पश्चिम मध्य प्रदेशात अतिउष्ण लहरींचा इशारा दिला आहे. त्याच्या प्रभावाने विदर्भाचेही तापमान वाढण्याची शक्यता आहे. दाेन दिवस नागपूर काहीसे ढगांनी आच्छादले हाेते. रविवारी वातावरण स्वच्छ झाले तसे पाऱ्याने उसळी घेतली.

इतर जिल्ह्यांमध्ये आज तापमानाचा चढता आलेख दिसला. वर्धा ४२.२ अंश, वाशिम ४२.५ अंश, अमरावती ४२.६ अंश, ब्रह्मपुरी ४२.१ अंश, तर गाेंदिया १ अंशाने वाढून ४१.२ अंशावर पाेहोचले. सध्या केवळ गडचिराेलीचे तापमान ४० अंशाच्या खाली आहे. इतर जिल्हे मात्र उष्णतेचा प्रकाेप शाेषत आहेत.

रात्रीच्या किमान तापमानामध्येही सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाची वाढ झाली आहे. अमरावती ५.६, तर यवतमाळ ५.३ अंशाने वाढले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा स्थिर राहण्याचा काळ हाेता. इथून पुढे पाऱ्यात वाढच हाेण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरण