शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी ७०० कि.मी.ची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:09 AM

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : विजेच्या तारांवरील लाेंबकळलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित हाेण्यापासून तर शाॅर्टसर्किट हाेणे, ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : विजेच्या तारांवरील लाेंबकळलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित हाेण्यापासून तर शाॅर्टसर्किट हाेणे, तारा तुटणे यांसह अन्य प्रकार घडतात. संभाव्य धाेका टाळण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मान्सूनपूर्व कामे हाती घेतली. यात कर्मचाऱ्यांनी तब्बल ७०० कि.मी.ची भटकंती करीत झाडांच्या फांद्या ताेडण्यापासून तर जुन्या तारा, इन्सुलेटर बदलविणे यांसह इतर कामे केली.

पावसाळ्यात वीजवहनामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण हाेऊ नये म्हणून महावितरण कंपनीच्या भिवापूर तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी भिवापूर, नांद, धामणगाव, आलेसूर, बेसूर, झमकाेली यांसह अन्य भागांत भटकंती करीत ही कामे पूर्णत्वास नेली आहेत. भिवापूर तालुक्यात विजेच्या बहुतांश तारा जंगलातून गेल्या आहेत. काही ठिकाणी विजेच्या खांबालगत झाडे असून, त्या झाडांच्या फांद्या तारांपर्यंत पाेहाेचल्या आहेत; तर वेली तारांना गुरफटलेल्या आहेत. फांद्या व वेली अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ठरतात. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रकारही घडतात.

पावसाळ्यात निर्माण झालेला विजेचा फाॅल्ट शाेधून काढताना कर्मचाऱ्यांची दमछाक हाेते. वीजपुरवठा वेळीच सुरळीत झाला नाही तर कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या राेषालाही सामाेरे जावे लागते. त्यामुळे महावितरण कंपनीने ही माेहीम एप्रिलमध्ये सुरू केली असून, कर्मचाऱ्यांनी ७०० कि.मी.ची भटकंती करीत फांद्या ताेडून व वेली काढून ती पूर्णत्वास आणली. यात वादळ व पावसामुळे काही अडचणी आल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

...

मुख्यालय सोडल्यास कारवाई

प्रत्येक पावसाळ्यात भिवापूर तालुक्यातील विजेचा लपंडाव सर्वश्रुत आहे. त्यातून अपघातही घडतात. ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण हाेईपर्यंत कुणीही मुख्यालय साेडायचे नाही, असे आदेश महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले हाेते. यात कसूर केल्यास कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या हाेत्या. कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून ही कामे करणे बंधनकारक केले हाेते. त्यामुळे बहुतांश कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ही जबाबदारी पार पाडली.

...

तीन हजार इन्सुलेटर बदलले

वीजवहनात इन्सुलेटर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात इन्सुलेटर फुटून शाॅर्टसर्किट व वीजपुरवठा खंडित हाेण्याचे प्रकार अधिक घडतात. इन्सुलेटर फुटल्यास खांब अथवा त्याच्या आधाराच्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित हाेताे व त्यातून प्राणहानी हाेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या माेहिमेत भिवापूर तालुक्यातील तीन हजार पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर बदलण्यात आले आहेत. शिवाय, ६० ट्रान्सफाॅर्मरचे ऑईल टाॅपअप केले; तर १५ ठिकाणचे डीटीसी केबल, २५० विजेचे माेडकळीस आलेले खांब बदलण्यात आले असून, ४८ नवीन खांब लावण्यात आले. ५० ठिकाणी विजेच्या नवीन तारा ओढण्यात आल्या आहेत.

...

विजेचा तारा तुटल्यास नागरिकांनी त्याला स्पर्श न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना द्यावी. झाडात वीजप्रवाह प्रवाहित झाल्यास लगेच कळवावे. ग्राहकांना कुठलीही समस्या आल्यास त्यांनी फाेन करून माहिती द्यावी. ब्रेकडाऊन असल्यास लगेच दुरुस्ती केली जाईल.

- दामोदर उरकुडे, उपकार्यकारी अभियंता,

महावितरण कंपनी, भिवापूर.