शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मान्सूनच्या प्रतीक्षेत धरणे आटली : प्रशासन चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:52 IST

जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपुरात केवळ ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पिण्याचे पाणी आहे. तेव्हा येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात केवळ पाच टक्के साठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपुरात केवळ ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पिण्याचे पाणी आहे. तेव्हा येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठवण्याची क्षमता ही ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला म्हणजे १९ जून रोजी केवळ १७८.३६ दलघमी म्हणजेच केवळ ५.२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी तोतलाडोह, लोअर नांद वणा, गडचिरोलीतील दिना, वर्धा येथील पोथरा, भंडाऱ्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी ही धरणे पूर्णपणे आटली आहेत. उर्वरित प्रकल्पांपैकी कामठी खेरी येथे २३.९८ टक्के, रामटेकमध्ये ७.५० टक्के, वडगाव १०.४ टक्के, इटियाडोह १६ .२७ टक्के, सिरपूर १८.२६ टक्के, पुजारी टोला ९.९२ टक्के, कालिसरार २२.४६ टक्के, असोलामेंढा २४.३८ टक्के, बोर १०.४१, धांम ०.२४ टक्के, लोअर वर्धा टप्पा १ २.३२ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ येथे २.४५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.पाच वर्षातील पाणीसाठा स्थितीवर्ष         मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा (१९ जून रोजी)२०१९ - १७८.३६ दलघमी२०१८ - ३८१.४२ दलघमी२०१७ - २९७.८६ दलघमी२०१६ - ६४६ दलघमी२०१५ - ७२० दलघमी२०१४ - १४५०.८० दलघमी

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई