शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 23:50 IST

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी असहकार पुकारला होता. वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना दर्जाहीन अन्नामुळे प्रकृती खराब झाली असून सुमारे १२ विद्यार्थिनी या विषबाधेमुळे ‘आयसीयू’मध्ये दाखल असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने मौन साधले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाविरोधात पुकारला ‘एल्गार’मध्यरात्रीपर्यंत सुरू होते आंदोलनवसतीगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी असहकार पुकारला होता. वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना दर्जाहीन अन्नामुळे प्रकृती खराब झाली असून सुमारे १२ विद्यार्थिनी या विषबाधेमुळे ‘आयसीयू’मध्ये दाखल असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने मौन साधले आहे.मागील आठवड्यात सुमारे १० विद्यार्थिनीना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे होते. त्या विद्यार्थिनींना रामदासपेठ येथील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर १८० हून अधिक विद्यार्थिनींमध्ये ताप, उलट्या, अंगदुखी ही लक्षणे दिसून आली. या विद्यार्थिनींनी विविध इस्पितळांत उपचार घेतले. मात्र १२ विद्यार्थिनी या ‘आयसीयू’मध्ये असून प्रशासनाने त्यांना पाहण्याचीदेखील तसदी घेतली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. सायंकाळी सहा वाजता प्रशासनातील अधिकारी, अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे वसतिगृहाच्या समस्यांविरोधात तीनशेहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रात्री आठनंतर एकत्र आले व प्रशासनाविरोधात घोषणा सुरू केल्या.‘व्हीएनआयटी’ प्रशासनाकडून मौनदरम्यान या मुद्दयावर ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासनाकडून मौन साधण्यात आले आहे. बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ‘व्हीएनआयटी’च्या अधिष्ठात्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हवामान बदलामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने संचालक, अधिष्ठाता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या आत जाण्याची मनाई करण्यात आली.या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्याविद्यार्थ्यांनी आक्रमकपणे प्रशासनासमोर मागण्या मांडल्या. सर्वात अगोदर तर वसतीगृहातील जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा व वेळ पडली तर कंत्राटदार बदला. खानावळीची नियमित तपासणी व्हावी, खानावळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, संपूर्ण वसतिगृह आणि स्वच्छतागृहे यांची स्वच्छता करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.पालकांना सूचना नाहीमोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींची तब्येत खालावली असतानादेखील प्रशासनाने पालकांना सूचना दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्याचप्रमाणे उपचारांसाठी विमा असल्याचे कारण देत खर्च करण्यासदेखील नकार दिला आहे. आम्ही आमच्या खिशातून सध्या खर्च करत असल्याची माहिती इस्पितळात दाखल असलेल्या विद्यार्थिनींच्या सहकाऱ्यांनी दिली.अ़नेक विद्यार्थी बाहेर ताटकळलेविद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सर्व प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे कोचिंग क्लास, प्रोजेक्ट इत्यादींच्या कामाने बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. रात्री उशीरापर्यंत काही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेरच ताटकळत उभे होते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन