शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 23:50 IST

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी असहकार पुकारला होता. वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना दर्जाहीन अन्नामुळे प्रकृती खराब झाली असून सुमारे १२ विद्यार्थिनी या विषबाधेमुळे ‘आयसीयू’मध्ये दाखल असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने मौन साधले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाविरोधात पुकारला ‘एल्गार’मध्यरात्रीपर्यंत सुरू होते आंदोलनवसतीगृहातील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत विद्यार्थ्यांनी असहकार पुकारला होता. वसतीगृहात राहणाऱ्या सुमारे २०० विद्यार्थिनींना दर्जाहीन अन्नामुळे प्रकृती खराब झाली असून सुमारे १२ विद्यार्थिनी या विषबाधेमुळे ‘आयसीयू’मध्ये दाखल असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘व्हीएनआयटी’ प्रशासनाने मौन साधले आहे.मागील आठवड्यात सुमारे १० विद्यार्थिनीना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे होते. त्या विद्यार्थिनींना रामदासपेठ येथील दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर १८० हून अधिक विद्यार्थिनींमध्ये ताप, उलट्या, अंगदुखी ही लक्षणे दिसून आली. या विद्यार्थिनींनी विविध इस्पितळांत उपचार घेतले. मात्र १२ विद्यार्थिनी या ‘आयसीयू’मध्ये असून प्रशासनाने त्यांना पाहण्याचीदेखील तसदी घेतली नाही, असा दावा विद्यार्थ्यांनी केला. सायंकाळी सहा वाजता प्रशासनातील अधिकारी, अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे वसतिगृहाच्या समस्यांविरोधात तीनशेहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी रात्री आठनंतर एकत्र आले व प्रशासनाविरोधात घोषणा सुरू केल्या.‘व्हीएनआयटी’ प्रशासनाकडून मौनदरम्यान या मुद्दयावर ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासनाकडून मौन साधण्यात आले आहे. बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ‘व्हीएनआयटी’च्या अधिष्ठात्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. हवामान बदलामुळे विद्यार्थिनी आजारी पडल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने संचालक, अधिष्ठाता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘व्हीएनआयटी’च्या आत जाण्याची मनाई करण्यात आली.या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्याविद्यार्थ्यांनी आक्रमकपणे प्रशासनासमोर मागण्या मांडल्या. सर्वात अगोदर तर वसतीगृहातील जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा व वेळ पडली तर कंत्राटदार बदला. खानावळीची नियमित तपासणी व्हावी, खानावळीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, संपूर्ण वसतिगृह आणि स्वच्छतागृहे यांची स्वच्छता करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.पालकांना सूचना नाहीमोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींची तब्येत खालावली असतानादेखील प्रशासनाने पालकांना सूचना दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्याचप्रमाणे उपचारांसाठी विमा असल्याचे कारण देत खर्च करण्यासदेखील नकार दिला आहे. आम्ही आमच्या खिशातून सध्या खर्च करत असल्याची माहिती इस्पितळात दाखल असलेल्या विद्यार्थिनींच्या सहकाऱ्यांनी दिली.अ़नेक विद्यार्थी बाहेर ताटकळलेविद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सर्व प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे कोचिंग क्लास, प्रोजेक्ट इत्यादींच्या कामाने बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. रात्री उशीरापर्यंत काही विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेरच ताटकळत उभे होते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन