शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

न्यायासाठी अख्खे गाव उतरले रस्त्यावर, नागपूरच्या कुडकुडत्या थंडीत मांडला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 12:51 PM

या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देडब्ल्यूसीएलच्या विरोधात संविधान चौकात चिल्ल्यापिल्ल्यांसह गावकऱ्यांचे आंदोलन

नागपूर : शहरात सध्या गारठा चांगलाच वाढला आहे. अशात बल्लारपूर क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोलीतील विस्थापित झालेले ग्रामस्थ नागपुरात आले असून कापडाच्या पालाखाली गावातील तरुण, म्हातारी मंडळी व बायाबापड्या मुलाबाळांसह आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संविधान चौकात ठिय्या ठोकून आहेत.

ऐन शेतीच्या हंगामात गाव, घर, शाळा सोडून १६० लोकांचा समूह आंदोलनात सहभागी आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन टिकावे यासाठी पोटापाण्याची रसद गावातून आणली आहे. पाच दिवस आंदोलनाला झालीत, मात्र कुणी फिरकले नाही. १५ डिसेंबर रोजी प्रशासनाने बैठक बोलाविली आहे. बैठकीत तडजोड न झाल्यास आंदोलनाची आक्रमकता वाढून आमरण उपोषण करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

हे आंदोलनकर्ते चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सुब्बई चिंचोली गावचे आहेत. या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०५ प्रकल्पगस्त शेतकरी जमिनीचा मोबदला व करारानुसार १ सातबाऱ्यावर १ नोकरी मिळावी याच्या प्रतीक्षेत आहेत.

विशेष म्हणजे गावातील तरुणांचे डब्ल्यूसीएलमध्ये नोकरी लागेल या प्रतीक्षेत वय निघून गेले आहे. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केल्याने शेतजमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही. जमिनीवर कर्ज काढता येत नाही. जनसुविधेची कामे गावापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी हे गावकरी घरदार सोडून संविधान चौकात बसले आहेत.

हे आंदोलन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश पाईकवार यांच्या नेतृत्वात सुरू असून, आंदोलनात अरुण सोमलकर, रमेश चाफले, वैभव लारोकर, अनिल लोखंडे, जगदीश मारबते, रोशन गौरकर, अलका चौधरी, सुरेखा सोमलकर, आदींचा समावेश आहे.

- आंदोलकांच्या मागण्या

वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील सुब्बई येथील चिंचोली रिकास्ट प्रकल्पातील २०५ प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी.

वेकोलीने अधिग्रहित केलेल्या शेतजमिनीचा आर्थिक मोबदला प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावा.

लाभार्थ्यांना रोजगाराकरिता वय मर्यादेमध्ये सात वर्षांची सवलत देण्यात यावी.

टॅग्स :agitationआंदोलनjobनोकरीFarmerशेतकरी