शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2024 18:22 IST

विजय वडेट्टीवार यांचा आरोप : भाजपने देशद्रोह्याला तिकीट दिले

नागपूर : उज्वल निकम यांनी कसाबच्या बिर्याणीचा विषय काढून काँग्रेसला बदनाम केले होते. कसाबला कोणी बिर्याणी देईल का आणि नंतर उज्वल निकम यांनी ते मान्य केले. जे न्यायालयात पुरावे द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत, हे कसले वकील, हे देशद्रोही आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

      गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, हेमंत करकरे यांचा खून झाला ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. ती आरएसएसच्या समर्पित एका पोलिस अधिकाऱ्याची होती. त्यावेळी हे सत्य कोर्टापासून लपवल्या गेले. अशा देशद्रोह्याला जर भाजप तिकीट देत असेल तर भाजप अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालणार का ,असा सवाल त्यांनी केला. भाजप शिंदे गटाने भ्रष्टाचार करणाऱ्याला किती मानाचे स्थान दिले आहे. ज्यांच्यावर किरीट सोमय्यानी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सर्व आता भाजपचे उमेदवार आहेत. यावरूनच आता भाजप हा बेईमानांचा, चोरांचा पक्ष झालाय हे नव्याने सांगण्याची गरज नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

कर्नाटकमध्ये ज्याच्यावर बलात्काराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा बलात्काऱ्याला भाजप तिकीट देत असेल तर महिलांप्रती त्यांचे विचार कसे आहेत हे दिसून येते. ब्रूजभूषण सिंग, कुलभूषण सिंगर, पद्मराजन, कन्हैयालाल मिश्रा, चिन्मयानंद हे सर्व महिलांचे शोषण करणारे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरताहेत. भाजपने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. जनता आता हे ओळखून आहे. म्हणून तिसऱ्या चौथा टप्प्यात लोक यांना गाडण्याची वाट बघत आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणताही काँग्रेसचा नेता भाजपमध्ये जाणार नाही. ॲड. प्रकाश आंबेडकर कधी कधी अशा पुड्या सोडतात, अनेकदा त्या पुड्या मध्ये काही निघत नाही, असा चिमटाही त्यांनी आंबेडकरांना काढला.

सलमान खान प्रकरणातील आरोपी आत्महत्या की खून ?- सलमान खान प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. पण कदाचित त्याचा खून झाला असावा असा संशय आहे. कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो. एवढा मोठा हायप्रोफाईल विषय असताना या प्रकरणाला काही कलाटणी देण्याचा उद्देश आहे का, याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. पोलीस ठाण्यात आत्महत्या किंवा मृत्यू झाला. नितिमत्तेच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने जबाबदारी म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अपेक्षा होती. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसUjjwal Nikamउज्ज्वल निकमBJPभाजपा