शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

१०० व्या नाट्यसंमेलनाच्या रंगात रंगणार विदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:44 IST

९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व्हाया विदर्भ मुंबईला पोहोचणार आहे.

ठळक मुद्देगुढीपाडव्याला तंजावूरपासून वाजणार नांदीप्रत्येक स्थळी सात दिवस रंगणार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व्हाया विदर्भ मुंबईला पोहोचणार आहे. त्याअनुषंगाने विदर्भात नाट्य संमेलनाच्या वारीचा गजर तब्बल २१ दिवस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अ.भा. मराठी नाट्य संमेलन, मुंबईचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार जागतिक रंगभूमी दिनी २७ मार्च रोजी सांगली येथे १०० व्या नाट्य संमेलनाची नांदी वाजणार आहे. तत्पूर्वी गुढीपाडव्याला २५ मार्च रोजी तंजावूर येथे मराठी रंगभूमीचे जनक व्यंकोजी राजांच्या समाधीला नमन केले जाईल तर मुंबई येथे १४ जून रोजी संमेलनाचा समारोप होणार आहे. दरम्यान ७ जूनपर्यंत ही वारी महाराष्ट्रातील दहा प्रमुख स्थळांवरून मुंबईला पोहोचणार आहे. या प्रत्येक स्थळी होणारी ही छोटी छोटी संमेलने शनिवार-रविवार अशी द्विदिवसीय असणार आहेत. या संमेलनांपूर्वी येणाऱ्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवारी संमेलनांतर्गत संमेलनस्थळाच्या नजिकच्या छोट्या छोट्या गावांमध्ये प्रत्येक दिवशी नाटकांचे सादरीकरण केले जाऊन, त्या भागात नाटक पोहोचवले जाणार आहे. त्यानंतर शनिवारी स्थानिक पातळीवरील नाटकांचे स्पर्धात्मक सादरीकरण होईल. यातील उत्तम सादरीकरणाला मुंबई येथे होणाºया समारोपीय सोहळ्यात सादरीकरणाची संधी मिळेल व पुरस्कृत करण्यात येणार आहे तर रविवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीतर्फे स्थानिक नागरिकांशी सुसंवाद निर्माण करणारे नाट्यसंगीत, संगीत नाटक किंवा नाट्यचर्चांचे आयोजन केले जाणार असल्याचे मंगेश कदम यांनी सांगितले. अशा तऱ्हेने दहाही स्थळी प्रत्येकी सात दिवस नाट्यसंमेलनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थळांची निवड लवकरच होणार असून, विदर्भात किमान तीन ठिकाणी अशी नाट्य संमेलने होण्याची शक्यता आहे.हे संमेलन उत्सवी नसून सर्वांना व्यापणारे ठरेल - मंगेश कदम१०० वे नाट्य संमेलन हे दरवेळेसारखे उत्सवी असणार नाही. या संमेलनाद्वारे तळागाळातल्या रंगकर्मी व रंगरसिकांपर्यंत पोहोचण्यासोबतच, जिथे कधीच नाटके झाली नाही अशा ठिकाणी ज्योत प्रज्वलित करणारे ठरणार आहे. त्यामुळेच, हे नाट्य संमेलन विशेष ठरणार असल्याची भावना नाट्य परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी व्यक्त केली.मुंबईत होणार महासंमेलननाट्य संमेलनाचा समारोपीय सोहळा मुंबईमध्ये १३ व १४ जून रोजी होणार असून, त्यापूर्वी ८ ते १२ जून रोजी नाटकांचा राष्ट्रीय महोत्सव होणार असल्याचे मंगेश कदम यांनी सांगितले. अशा तºहेने १०० व्या नाट्य संमेलनाचे महासंमेलन मुंबईत होणार आहे. समारोपानंतरही ही वारी महाराष्ट्राबाहेर इंदूर, बेंगळूरु, हैदराबाद आणि दिल्ली येथे पोहोचेल. ७ नोव्हेंबरपर्यंत १०० व्या नाट्य संमेलनाचा हा सोहळा देशभरात साजरा होईल, असे कदम म्हणाले.नागपूरला मिळणार सलग दुसऱ्यांदा मानविदर्भात साधारणत: तीन ठिकाणी १०० व्या नाट्यसंमेलनाची छोटी संमेलने होतील. विदर्भाची जबाबदारी नाट्य परिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, स्थळे अद्याप निश्चित झाली नसली तरी नागपूर, अमरावती व कारंजा (वाशिम) येथे ही संमेलने पार पडण्याची शक्यता आहे. नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन १४ एप्रिल रोजी असतो. त्याअनुषंगाने विदर्भातील नाट्य संमेलन १४ एप्रिलपासूनच पुढचे २१ दिवस रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NatakनाटकmarathiमराठीVidarbhaविदर्भ