शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१०० व्या नाट्यसंमेलनाच्या रंगात रंगणार विदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:44 IST

९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व्हाया विदर्भ मुंबईला पोहोचणार आहे.

ठळक मुद्देगुढीपाडव्याला तंजावूरपासून वाजणार नांदीप्रत्येक स्थळी सात दिवस रंगणार संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ९९व्या अ.भा. मराठी नाट्य संमेलनानंतर १०० व्या नाट्य संमेलनाविषयी गेले वर्षभर वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले होते. जवळपास ते सर्व तर्क थोड्याथोड्याशा फरकाने खरेच ठरल्याची ग्वाही बुधवारी मिळाली. सांगली येथून वाजणारी १०० व्या नाट्य संमेलनाची वारी व्हाया विदर्भ मुंबईला पोहोचणार आहे. त्याअनुषंगाने विदर्भात नाट्य संमेलनाच्या वारीचा गजर तब्बल २१ दिवस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.अ.भा. मराठी नाट्य संमेलन, मुंबईचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार जागतिक रंगभूमी दिनी २७ मार्च रोजी सांगली येथे १०० व्या नाट्य संमेलनाची नांदी वाजणार आहे. तत्पूर्वी गुढीपाडव्याला २५ मार्च रोजी तंजावूर येथे मराठी रंगभूमीचे जनक व्यंकोजी राजांच्या समाधीला नमन केले जाईल तर मुंबई येथे १४ जून रोजी संमेलनाचा समारोप होणार आहे. दरम्यान ७ जूनपर्यंत ही वारी महाराष्ट्रातील दहा प्रमुख स्थळांवरून मुंबईला पोहोचणार आहे. या प्रत्येक स्थळी होणारी ही छोटी छोटी संमेलने शनिवार-रविवार अशी द्विदिवसीय असणार आहेत. या संमेलनांपूर्वी येणाऱ्या सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवारी संमेलनांतर्गत संमेलनस्थळाच्या नजिकच्या छोट्या छोट्या गावांमध्ये प्रत्येक दिवशी नाटकांचे सादरीकरण केले जाऊन, त्या भागात नाटक पोहोचवले जाणार आहे. त्यानंतर शनिवारी स्थानिक पातळीवरील नाटकांचे स्पर्धात्मक सादरीकरण होईल. यातील उत्तम सादरीकरणाला मुंबई येथे होणाºया समारोपीय सोहळ्यात सादरीकरणाची संधी मिळेल व पुरस्कृत करण्यात येणार आहे तर रविवारी नाट्य परिषदेच्या मध्यवर्तीतर्फे स्थानिक नागरिकांशी सुसंवाद निर्माण करणारे नाट्यसंगीत, संगीत नाटक किंवा नाट्यचर्चांचे आयोजन केले जाणार असल्याचे मंगेश कदम यांनी सांगितले. अशा तऱ्हेने दहाही स्थळी प्रत्येकी सात दिवस नाट्यसंमेलनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थळांची निवड लवकरच होणार असून, विदर्भात किमान तीन ठिकाणी अशी नाट्य संमेलने होण्याची शक्यता आहे.हे संमेलन उत्सवी नसून सर्वांना व्यापणारे ठरेल - मंगेश कदम१०० वे नाट्य संमेलन हे दरवेळेसारखे उत्सवी असणार नाही. या संमेलनाद्वारे तळागाळातल्या रंगकर्मी व रंगरसिकांपर्यंत पोहोचण्यासोबतच, जिथे कधीच नाटके झाली नाही अशा ठिकाणी ज्योत प्रज्वलित करणारे ठरणार आहे. त्यामुळेच, हे नाट्य संमेलन विशेष ठरणार असल्याची भावना नाट्य परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी व्यक्त केली.मुंबईत होणार महासंमेलननाट्य संमेलनाचा समारोपीय सोहळा मुंबईमध्ये १३ व १४ जून रोजी होणार असून, त्यापूर्वी ८ ते १२ जून रोजी नाटकांचा राष्ट्रीय महोत्सव होणार असल्याचे मंगेश कदम यांनी सांगितले. अशा तºहेने १०० व्या नाट्य संमेलनाचे महासंमेलन मुंबईत होणार आहे. समारोपानंतरही ही वारी महाराष्ट्राबाहेर इंदूर, बेंगळूरु, हैदराबाद आणि दिल्ली येथे पोहोचेल. ७ नोव्हेंबरपर्यंत १०० व्या नाट्य संमेलनाचा हा सोहळा देशभरात साजरा होईल, असे कदम म्हणाले.नागपूरला मिळणार सलग दुसऱ्यांदा मानविदर्भात साधारणत: तीन ठिकाणी १०० व्या नाट्यसंमेलनाची छोटी संमेलने होतील. विदर्भाची जबाबदारी नाट्य परिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली असून, स्थळे अद्याप निश्चित झाली नसली तरी नागपूर, अमरावती व कारंजा (वाशिम) येथे ही संमेलने पार पडण्याची शक्यता आहे. नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन १४ एप्रिल रोजी असतो. त्याअनुषंगाने विदर्भातील नाट्य संमेलन १४ एप्रिलपासूनच पुढचे २१ दिवस रंगण्याची शक्यता आहे.

टॅग्स :NatakनाटकmarathiमराठीVidarbhaविदर्भ