शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विदर्भ माझा पक्ष लढविणार जिल्हा परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 11:58 PM

विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यात लढणार : विदर्भाचा मुद्दा राजकीय करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे. विदर्भाचा मुद्दा अधिक वेगाने राजकीय बनविण्यासाठी आणि विदर्भासंदर्भात असलेले जनमत मतपेटीतून व्यक्त व्हावे यासाठी या निवडणुका लढविल्या जातील, असे पक्षाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले.यासंदर्भात माहिती देताना पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे म्हणाले, विदर्भ राज्य निर्मितीचा उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच या पक्षाची स्थापना झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या कार्याची प्रेरणा यामागे आहे. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पक्षाने प्रत्येक वेळी आपली स्पष्ट भूमिका ठेवली आहे. या वेळीही विदर्भनिर्मितीच्या उद्देशानेच फक्त विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात आपला पक्ष मैदानात उतरणार आहे. बहुतेक सर्वच जागा पक्षाकडून लढल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.स्थानिक पक्ष बळकट होणार नाही आणि मागणीसाठी भक्कमपणे पुढे येणार नाही, तोपर्यंत राज्यनिर्मितीचे वातावरण तयार होणार नाही. तेलंगणाच्या निर्मितीपूर्वी स्थानिक राजकीय पक्षांनी वारंवार निवडणुका लढविल्या. त्यातून राज्यनिर्मितीसंदर्भात असणारे जनमत स्पष्ट होत गेले. ९० ते ९५ टक्के जनता विदर्भ राज्य निर्मितीच्या बाजूने असल्याचा दावा तिरपुडे यांनी यावेळी केला. मतदानातून नागरिकांनी तो व्यक्त करावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दीपक पालीवाल यांच्या नेतृत्वात तर पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले यांच्या नेतृत्वात अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील निवडणुका लढविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक पालीवाल, बाबा कोंबाडे, मंगेश तेलंग, किरण बोरकर, संजय कटकमवार, ज्ञानेश्वर गुरव आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक