शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात महाविकास आघाडी ६२ पैकी ४५ जागा जिंकणार, विजय वडेट्टीवार यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 12:39 IST

म्हणाले, फडणवीस यांच्यावर पुन्हा विरोधी पक्षात बसण्याची वेळ येणार

नागपूर : विदर्भात विधानसभेच्या ६२ जागांपैकी ४५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. गेल्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. त्यानंतर निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसावे लागले. यावेळीही तसेच होईल. फडणवीस यांना पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागेल, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा जनता विरोधी पक्षाकडे आशेने पाहते. पावसाळी अधिवेशनात आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नाही. पण नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मला नाईट वॉचमन म्हणून हिणवत आहेत. पण कधी कधी नाईट वॉचमन सेंच्युरी काढतो. गेल्यावेळी मी विरोधी पक्षनेते असताना १५ जागाही येणार नाहीत, असा दावा केला जात होता. मात्र ४५ जागा आल्या. आता चित्र पालटलेले दिसेल. राज्यात सत्ता आल्यास हायकमांडच्या नजरेतील कॅप्टन कोण असेल, हे मला सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस फुटणार नाही

- शिवसेना, राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष फोडून त्यांचे चिन्ह घालविण्याचा भाजपने प्रयत्न केला. पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे त्याचा ‘पंजा’ कसा घालविणार, असा सवाल करीत काँग्रेस फुटणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

ओबीसींची नागपुरात महारॅली

- काँग्रेसतर्फे नागपुरात ओबीसींची महारॅली आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. या रॅलीसाठी देशभरातील ‘इंडिया’ आघाडीच्या ओबीसी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले जाईल. या रॅलीमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी एल्गार पुकारला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यातील आरक्षणाची ५० टक्क्यांची सीमा हटवून तामिळनाडूप्रमाणे ७० टक्के करावी. त्यानंतर वाढीव आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

वडेट्टीवार म्हणाले.....

- बच्चू कडू यांच्यावर आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. ते सरकार विरोधात आंदोलन करू लागले आहेत. येत्या काळात ते महाविकास आघाडीसोबत असतील.

- महाराष्ट्राकडे वाटचाल करू पाहणारी भारत राष्ट्र समिती तेलंगणातच फुटली आहे. बीआरएसची महाराष्ट्रातील एन्ट्री ही सत्ताधारी पुरस्कृत आहे.

- आधी शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. तरी भाजपचा ग्राफ वाढलेला नाही. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्वरित निवडणुका घ्या.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाVidarbhaविदर्भ