शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

विदर्भात उशिरा आलो, हा आरोप चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 1:45 AM

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते.

ठळक मुद्देराजन खान : मी संपूर्ण महाराष्टÑाचा प्रतिनिधी

ऑनलाईन लोकमत नागपूर : अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते. त्यामुळे राजन खान यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष असून ते वैदर्भीय मतदारांना महत्त्व देत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर होत होती. त्यावर राजन खान यांनी या आरोपांचे खंडन केले. मी विदर्भ, मराठवाडा किंवा प. महाराष्ट्राचा सुपुत्र नाही तर अख्ख्या महाराष्ट्रचा प्रतिनिधी आहे. या धावपळीत कदाचित भेटायला उशीर झाला, मात्र मी माझी भूमिका साहित्य महामंडळ व मतदारांपर्यंत पत्रव्यवहाराद्वारे पोहचविली आहे, असा खुलासा त्यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.समाज आणि साहित्याची सेवा करणे हे साहित्यिकाचे काम असते व ते आतापर्यंत मी प्रामाणिकपणे करीत आलो आहे. संमेलनाचे अध्यक्षपद लाभाचे पद नाही, मात्र मराठी जनमानसांच्या दृष्टीने सन्मानाचे मानले जाते. त्यामुळे संमेलन अध्यक्ष झालो तर या साहित्य सेवेच्या कामाला नवा आयाम मिळेल. मात्र निवडणूक लढवत असलो तरी कुणाशी ईर्षा, असूया किंवा स्पर्धा नाही.त्यामुळे जिंकलो तरी अत्याधिक खूश होणार नाही किंवा हरलो तर निराशही होणार नाही. साहित्य हा जगण्याचा प्रवास असून तो पुढेही असाच सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत अध्यक्षपदाच्या प्रचलित निवडणुकीवरून टीका होत आहे. मात्र सध्यातरी हीच प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मात्र भविष्यात ही पद्धत बदलेल आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड होईल, असेही ते म्हणाले.हा किळसवाणा प्रकार दुरुस्त करायचा आहेअध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चालणारे गटातटाचे खेळ, प्रादेशिक वादामुळे साहित्य संमेलन बदनाम झाले आहे. संमेलनाकडे सामान्य माणसे कुचेष्टेने पाहू लागले आहेत. अध्यक्षपदासाठी अमूक व्यक्ती किंवा साहित्य संघटनांची लांगुलचालन करावे लागणे किंवा उमेदवाराने संमेलनासाठी प्रायोजकत्व मिळवून देण्याची भाषा करणे, हा साहित्यसृष्टीतील किळसवाणा प्रकार आहे. साहित्य ही पावित्र्याची गोष्ट आहे, मात्र अशा प्रकारामुळे किळसवाणे होत आहे. त्यामुळे सामान्य मराठी माणूसच नाही तर दिग्गज साहित्यिकही इथे येऊ इच्छित नाही. मलाही तसेच सल्ले दिले गेले आहेत. मात्र ही साहित्यसृष्टी व या संस्था माझ्या आहेत. त्यामुळे माझे घर दुरुस्त करणे माझी जबाबदारी असल्याने मी निवडणूक लढवीत असल्याचे राजन खान यांनी यावेळी सांगितले.कर्नाटक सरकारची भूमिका घटनाविरोधीकर्नाटकच्या सीमा भागातील लोकांवर कानडी भाषेची सक्ती करणे ही कन्नड सरकारची भूमिका घटनाविरोधी आहे. महाराष्ट शासनाने कधी शासकीय स्तरावर इतर भाषांचा द्वेष केला नाही, उलट सन्मानच केला आहे. महाराष्ट्राची ही भूमिका कन्नड शासनाला समजावून सांगण्यासाठी लेखकांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर हा एक प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.