शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात उशिरा आलो, हा आरोप चुकीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:48 IST

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते.

ठळक मुद्देराजन खान : मी संपूर्ण महाराष्टÑाचा प्रतिनिधी

ऑनलाईन लोकमत नागपूर : अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी वैदर्भीय मतदारांच्या भेटी घेतल्या, मात्र राजन खान यांनी आतापर्यंत विदर्भात पाऊल ठेवले नव्हते. त्यामुळे राजन खान यांचे विदर्भाकडे दुर्लक्ष असून ते वैदर्भीय मतदारांना महत्त्व देत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर होत होती. त्यावर राजन खान यांनी या आरोपांचे खंडन केले. मी विदर्भ, मराठवाडा किंवा प. महाराष्ट्राचा सुपुत्र नाही तर अख्ख्या महाराष्ट्रचा प्रतिनिधी आहे. या धावपळीत कदाचित भेटायला उशीर झाला, मात्र मी माझी भूमिका साहित्य महामंडळ व मतदारांपर्यंत पत्रव्यवहाराद्वारे पोहचविली आहे, असा खुलासा त्यांनी रविवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केला.समाज आणि साहित्याची सेवा करणे हे साहित्यिकाचे काम असते व ते आतापर्यंत मी प्रामाणिकपणे करीत आलो आहे. संमेलनाचे अध्यक्षपद लाभाचे पद नाही, मात्र मराठी जनमानसांच्या दृष्टीने सन्मानाचे मानले जाते. त्यामुळे संमेलन अध्यक्ष झालो तर या साहित्य सेवेच्या कामाला नवा आयाम मिळेल. मात्र निवडणूक लढवत असलो तरी कुणाशी ईर्षा, असूया किंवा स्पर्धा नाही.त्यामुळे जिंकलो तरी अत्याधिक खूश होणार नाही किंवा हरलो तर निराशही होणार नाही. साहित्य हा जगण्याचा प्रवास असून तो पुढेही असाच सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांत अध्यक्षपदाच्या प्रचलित निवडणुकीवरून टीका होत आहे. मात्र सध्यातरी हीच प्रक्रिया सुरू असल्याने ती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. मात्र भविष्यात ही पद्धत बदलेल आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड होईल, असेही ते म्हणाले.हा किळसवाणा प्रकार दुरुस्त करायचा आहेअध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चालणारे गटातटाचे खेळ, प्रादेशिक वादामुळे साहित्य संमेलन बदनाम झाले आहे. संमेलनाकडे सामान्य माणसे कुचेष्टेने पाहू लागले आहेत. अध्यक्षपदासाठी अमूक व्यक्ती किंवा साहित्य संघटनांची लांगुलचालन करावे लागणे किंवा उमेदवाराने संमेलनासाठी प्रायोजकत्व मिळवून देण्याची भाषा करणे, हा साहित्यसृष्टीतील किळसवाणा प्रकार आहे. साहित्य ही पावित्र्याची गोष्ट आहे, मात्र अशा प्रकारामुळे किळसवाणे होत आहे. त्यामुळे सामान्य मराठी माणूसच नाही तर दिग्गज साहित्यिकही इथे येऊ इच्छित नाही. मलाही तसेच सल्ले दिले गेले आहेत. मात्र ही साहित्यसृष्टी व या संस्था माझ्या आहेत. त्यामुळे माझे घर दुरुस्त करणे माझी जबाबदारी असल्याने मी निवडणूक लढवीत असल्याचे राजन खान यांनी यावेळी सांगितले.कर्नाटक सरकारची भूमिका घटनाविरोधीकर्नाटकच्या सीमा भागातील लोकांवर कानडी भाषेची सक्ती करणे ही कन्नड सरकारची भूमिका घटनाविरोधी आहे. महाराष्ट शासनाने कधी शासकीय स्तरावर इतर भाषांचा द्वेष केला नाही, उलट सन्मानच केला आहे. महाराष्ट्राची ही भूमिका कन्नड शासनाला समजावून सांगण्यासाठी लेखकांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे. संमेलनाचा अध्यक्ष झाल्यावर हा एक प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.