शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

भारत-पाकिस्तान युद्धाची विजयी मशाल नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:40 IST

Victory torch of Indo-Pakistani war, nagpur news १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय जवानांच्या शानदार विजयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. यानिमित्त दिल्ली येथून काढण्यात आलेली सुवर्ण विजयी मशाल नागपुरात दाखल झाली आहे.

ठळक मुद्देकामठी कन्टाेनमेंट, सीताबर्डी किल्ला, साेनेगाव एअरफाेर्स स्टेशनवर परेड

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धातभारतीय जवानांच्या शानदार विजयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. यानिमित्त दिल्ली येथून काढण्यात आलेली सुवर्ण विजयी मशाल नागपुरात दाखल झाली आहे. कामठीच्या गार्ड रेजिमेंट सेंटर तसेच सीताबर्डी किल्ला आणि साेनेगावच्या एअरफाेर्स स्टेशनवर शानदार परेड काढून मशालीचे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी ही मशाल वायुसेनानगरच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयात दाखल हाेईल.

२०२१ हे वर्ष भारत-पाकिस्तानयुद्धातील विजयाचे सुवर्ण महाेत्सवी वर्ष आहे. १६ डिसेंबर २०२० रोजी ऐतिहासिक युद्धाचे ५० व्या वर्षात पदार्पण होताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारतीय जवानांच्या कर्तृत्वाचा गाैरव करण्यासाठी सुवर्ण विजयी मशाल दिल्ली येथून रवाना केली हाेती. ही मशाल आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, भाेपाळ, इटारसी हाेत बुधवारी संत्रानगरीत पाेहोचली. कॅप्टन अनिरुद्ध नायर हे देशभरात हाेणाऱ्या या सुवर्ण विजयी मशाल मार्चचे नेतृत्व करीत आहेत.

कामठी रेजिमेंटमध्ये जल्लाेषात स्वागत

कामठीच्या गार्ड रेजिमेंट सेंटरमध्ये या विजयी मशालीचे जल्लाेषात स्वागत करण्यात आले. सैनिकांनी ऑटाेमाेटिव्ह चाैक ते कामठी राेडवर दाेन्ही बाजूला दाेन किमीपर्यंत लांब मानवी साखळी बनवली हाेती. त्यांच्या मध्यातून ही मशाल माजी सैनिक व १९७१ च्या वाॅर हीराेजकडून रिले करण्यात आली. या वेळी युद्धातील हीराेज असलेले कर्नल जाली, कर्नल अभय पटवर्धन, स्क्वाॅड्रन लीडर सुबित मुखर्जी, कॅप्टन नटराजन अय्यर व कॅप्टन एम.टी. वखारे यांचा सहभाग हाेता.

साेनेगाव एअरफाेर्स स्टेशनवर परेड

गुरुवारी सकाळी विजयी मशाल सीताबर्डी किल्लास्थित उत्तर महाराष्ट्र व गुजरात सबएरिया येथे पाेहोचली. येथे मानवंदना दिल्यानंतर साेनेगावस्थित एअरफाेर्स स्टेशन येथे आणण्यात आली. या वेळी स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन कंचन कुमार व एएफडब्ल्यूडब्ल्यूएच्या प्रेसिडेंट मीनाक्षी राॅय यांच्या उपस्थितीत आकर्षक परेड काढून मानवंदना देण्यात आली. या वेळी वाॅर हीराेज व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. शुक्रवारी ही मशाल वायुसेनानगरस्थित मेंटेनन्स कमांड मुख्यालयात पाेहोचणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण

सुवर्ण विजयी मशाल येते ७ दिवस नागपुरात राहणार आहे. २६ जानेवारी राेजी कस्तुरचंद पार्क येथे हाेणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड आणि समाराेहाचे ते मुख्य आकर्षण ठरणार आहे. या वेळी १९७१ चे वाॅर हीराेज आणि माजी सैनिकांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे डिफेन्स पीआरओ ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्ध