शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

भारत-पाकिस्तान युद्धाची विजयी मशाल नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:40 IST

Victory torch of Indo-Pakistani war, nagpur news १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय जवानांच्या शानदार विजयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. यानिमित्त दिल्ली येथून काढण्यात आलेली सुवर्ण विजयी मशाल नागपुरात दाखल झाली आहे.

ठळक मुद्देकामठी कन्टाेनमेंट, सीताबर्डी किल्ला, साेनेगाव एअरफाेर्स स्टेशनवर परेड

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : १९७१ साली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धातभारतीय जवानांच्या शानदार विजयाला या वर्षी ५० वर्षे पूर्ण हाेत आहेत. यानिमित्त दिल्ली येथून काढण्यात आलेली सुवर्ण विजयी मशाल नागपुरात दाखल झाली आहे. कामठीच्या गार्ड रेजिमेंट सेंटर तसेच सीताबर्डी किल्ला आणि साेनेगावच्या एअरफाेर्स स्टेशनवर शानदार परेड काढून मशालीचे स्वागत करण्यात आले. शुक्रवारी ही मशाल वायुसेनानगरच्या मेंटेनन्स कमांड मुख्यालयात दाखल हाेईल.

२०२१ हे वर्ष भारत-पाकिस्तानयुद्धातील विजयाचे सुवर्ण महाेत्सवी वर्ष आहे. १६ डिसेंबर २०२० रोजी ऐतिहासिक युद्धाचे ५० व्या वर्षात पदार्पण होताच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भारतीय जवानांच्या कर्तृत्वाचा गाैरव करण्यासाठी सुवर्ण विजयी मशाल दिल्ली येथून रवाना केली हाेती. ही मशाल आग्रा, ग्वाल्हेर, झांसी, भाेपाळ, इटारसी हाेत बुधवारी संत्रानगरीत पाेहोचली. कॅप्टन अनिरुद्ध नायर हे देशभरात हाेणाऱ्या या सुवर्ण विजयी मशाल मार्चचे नेतृत्व करीत आहेत.

कामठी रेजिमेंटमध्ये जल्लाेषात स्वागत

कामठीच्या गार्ड रेजिमेंट सेंटरमध्ये या विजयी मशालीचे जल्लाेषात स्वागत करण्यात आले. सैनिकांनी ऑटाेमाेटिव्ह चाैक ते कामठी राेडवर दाेन्ही बाजूला दाेन किमीपर्यंत लांब मानवी साखळी बनवली हाेती. त्यांच्या मध्यातून ही मशाल माजी सैनिक व १९७१ च्या वाॅर हीराेजकडून रिले करण्यात आली. या वेळी युद्धातील हीराेज असलेले कर्नल जाली, कर्नल अभय पटवर्धन, स्क्वाॅड्रन लीडर सुबित मुखर्जी, कॅप्टन नटराजन अय्यर व कॅप्टन एम.टी. वखारे यांचा सहभाग हाेता.

साेनेगाव एअरफाेर्स स्टेशनवर परेड

गुरुवारी सकाळी विजयी मशाल सीताबर्डी किल्लास्थित उत्तर महाराष्ट्र व गुजरात सबएरिया येथे पाेहोचली. येथे मानवंदना दिल्यानंतर साेनेगावस्थित एअरफाेर्स स्टेशन येथे आणण्यात आली. या वेळी स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन कंचन कुमार व एएफडब्ल्यूडब्ल्यूएच्या प्रेसिडेंट मीनाक्षी राॅय यांच्या उपस्थितीत आकर्षक परेड काढून मानवंदना देण्यात आली. या वेळी वाॅर हीराेज व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. शुक्रवारी ही मशाल वायुसेनानगरस्थित मेंटेनन्स कमांड मुख्यालयात पाेहोचणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे मुख्य आकर्षण

सुवर्ण विजयी मशाल येते ७ दिवस नागपुरात राहणार आहे. २६ जानेवारी राेजी कस्तुरचंद पार्क येथे हाेणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड आणि समाराेहाचे ते मुख्य आकर्षण ठरणार आहे. या वेळी १९७१ चे वाॅर हीराेज आणि माजी सैनिकांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे डिफेन्स पीआरओ ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांनी सांगितले.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्ध