शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 14:08 IST

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देविषारी विळखा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

 

दयानंद पाईकराव

नागपूर : आरोग्य उत्तम राहावे म्हणून आपण महाग असल्या तरी, पालेभाज्या बाजारातून खरेदी करून आणून खातोच. परंतु या पालेभाज्या विषयुक्त असल्याचे सांगितल्यास, ते कोणालाच पटणार नाही. परंतु हे धक्कादायक वास्तव आहे.

नागपूरशेजारील नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे केमिकलयुक्त विषारी पाणी वापरून भाजीपाला आणि इतर पिके पिकवली जात आहेत. ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या ‘ऑन दि स्पॉट’ पाहणीत हे घाबरवून सोडणारे चित्र समोर आले. हा विषारी भाजीपाला खाऊन नागपूरकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. नाग नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प सध्या तरी कागदावरच आहे. मात्र, तोवर नागपूर शहरातील सांडपाणी, सिवरेजचे पाणी नाग नदीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, यासाठी महापालिकेने दखल घेऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

नाग नदीवर जागोजागी मोटरपंप

नाग नदीपासून अनेक शेतकऱ्यांची शेती २०० मीटर ते पाऊण किलोमीटरवर आहे. नाग नदीच्या काठावर जागोजागी शेकडो पाण्याचे मोटरपंप बसविलेले आहेत. जमिनीखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातूनही शेतकरी हे दूषित पाणी आपल्या शेतापर्यंत घेऊन जात असल्याचे आढळून आले.

दूषित पाण्यावर पिकते मेथी, पालक, कोबी

- नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर करून गहू, चेच भाजी, पालक, मेथी, अंबाडी, भेंडी, ढेमस, संत्रा, लिंबू, सोयाबीन, वांगी, लवकी, सांबार, कोबी ही भाजीपाला पिके घेण्यात येतात. त्यासाठी नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस खराब होतो. तसेच या पाण्यावर घेतलेल्या भाजीपाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी मान्य केली.

या गावातील शेती नाग नदीच्या पाण्यावर...

- नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे दूषित पाणी वापरून विषयुक्त भाजीपाला पिकवला जातो. यात पुणापूर, पावनगाव, धारगाव, शिरपूर, आसोली, महालगाव, कापसी, आरंभा, तितुर, तरोडी, खेडी, कुही, मांढळ आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्याnagpurनागपूरpollutionप्रदूषण