शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... नाग नदीच्या विषयुक्त पाण्यावर पिकतो भाजीपाला; मार्केटमधून जातो प्रत्येकाच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 14:08 IST

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देविषारी विळखा : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

 

दयानंद पाईकराव

नागपूर : आरोग्य उत्तम राहावे म्हणून आपण महाग असल्या तरी, पालेभाज्या बाजारातून खरेदी करून आणून खातोच. परंतु या पालेभाज्या विषयुक्त असल्याचे सांगितल्यास, ते कोणालाच पटणार नाही. परंतु हे धक्कादायक वास्तव आहे.

नागपूरशेजारील नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे केमिकलयुक्त विषारी पाणी वापरून भाजीपाला आणि इतर पिके पिकवली जात आहेत. ‘लोकमत’च्या चमूने केलेल्या ‘ऑन दि स्पॉट’ पाहणीत हे घाबरवून सोडणारे चित्र समोर आले. हा विषारी भाजीपाला खाऊन नागपूरकरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. नाग नदी शुद्धीकरणाचा प्रकल्प सध्या तरी कागदावरच आहे. मात्र, तोवर नागपूर शहरातील सांडपाणी, सिवरेजचे पाणी नाग नदीत कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, यासाठी महापालिकेने दखल घेऊन तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

नाग नदीवर जागोजागी मोटरपंप

नाग नदीपासून अनेक शेतकऱ्यांची शेती २०० मीटर ते पाऊण किलोमीटरवर आहे. नाग नदीच्या काठावर जागोजागी शेकडो पाण्याचे मोटरपंप बसविलेले आहेत. जमिनीखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या माध्यमातूनही शेतकरी हे दूषित पाणी आपल्या शेतापर्यंत घेऊन जात असल्याचे आढळून आले.

दूषित पाण्यावर पिकते मेथी, पालक, कोबी

- नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर करून गहू, चेच भाजी, पालक, मेथी, अंबाडी, भेंडी, ढेमस, संत्रा, लिंबू, सोयाबीन, वांगी, लवकी, सांबार, कोबी ही भाजीपाला पिके घेण्यात येतात. त्यासाठी नाग नदीच्या दूषित पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचा कस खराब होतो. तसेच या पाण्यावर घेतलेल्या भाजीपाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी मान्य केली.

या गावातील शेती नाग नदीच्या पाण्यावर...

- नाग नदीला लागून असलेल्या जवळपास सर्वच गावांत नाग नदीचे दूषित पाणी वापरून विषयुक्त भाजीपाला पिकवला जातो. यात पुणापूर, पावनगाव, धारगाव, शिरपूर, आसोली, महालगाव, कापसी, आरंभा, तितुर, तरोडी, खेडी, कुही, मांढळ आदी गावांचा समावेश आहे.

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्याnagpurनागपूरpollutionप्रदूषण