शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

नागपुरात भाजीपाला व फळांचा तुटवडा : कळमना फळ बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 21:12 IST

कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देभाजी बाजार शुक्रवारपासून बंद होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीमुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांना बाजारातून घरी पाठविण्यात येत आहे. अशा गंभीर स्थितीत कळमन्यातील ठोक फळे आणि भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येत नसल्याने अडतिया असोसिएशनने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार फळ बाजार बुधवार आणि भाजीपाला बाजार शुक्रवारपासून ३१ मार्चपर्यंत ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे.या पार्श्वभूमीवर शहरात फळे आणि भाज्यांचा तुटवडा होणार असून गृहिणींना घरगुती भाज्यांवर भर द्यावा लागणार आहे. विहिरगाव येथील शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, भाज्या तोडणीला आल्यानंतर शेतात ठेवता येत नाही. त्याची विक्री करावीच लागते. अशा स्थितीत सोमवारपर्यंत रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री केली. पण मंगळवारी पोलिसांनी हाकलून लावले. विक्री करणार कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे भाज्या घरीच पडून आहेत. कोरोनामुळे आर्थिक फटका बसला आहे.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, देशाच्या अन्य राज्यातून रविवारपर्यंत फळांची आवक होती. पण शहरात कर्फ्यू असल्याने फळांची विक्री झाली नाही. त्यामुळे बहुतांश फळे विक्रीविना पडून आहेत. फळे नाशवंत असल्याने साठवणूक करता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना कळमन्यात फळे आणण्यास मनाई केली आहे. मंगळवारी असलेली फळे विकून बुधवारपासून दुकाने बंद ठेवणार आहे, असा निर्णय अडतिया असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे शहरात ३१ मार्चपर्यंत फळे मिळणार नाहीत.कळमन्यातील युवा सब्जी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. पण शहरात कर्फ्यू असल्याने किरकोळ विक्रेते कळमन्यात भाज्या खरेदीसाठी येत नाहीत; शिवाय शहरातील आठवडी बाजारही बंद झाले आहेत. त्यामुळे दररोज भाज्या मोठ्या प्रमाणात बाजारात शिल्लक असतात. अन्य राज्यातून येणाऱ्या ट्रकची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे कळमन्यात भाज्या विक्रीसाठी आणू नये, असे स्थानिक शेतकऱ्यांना सांगितले आहे. शुक्रवारी बाजाराला सुटी असते. त्यामुळे शनिवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. भाज्या मिळत नसल्याने लोकांमध्ये रोष असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारvegetableभाज्या