शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सार्वजनिक घोटाळ्यांच्या चौकशीवर लक्ष ठेवणाऱ्या समितीला हव्यात विविध सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:30 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी विभागातील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश के. बी. झिंजर्डे यांचा समावेश आहे. या समितीने उच्च न्यायालयाला पत्र लिहून सरकारला विविध निर्देश देण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाला लिहिले पत्र : दोन सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समितीत समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सरकारी विभागातील आर्थिक घोटाळ्यांच्या दैनंदिन चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण व सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश के. बी. झिंजर्डे यांचा समावेश आहे. या समितीने उच्च न्यायालयाला पत्र लिहून सरकारला विविध निर्देश देण्याची विनंती केली आहे.सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये घोटाळे आहेत. त्यामुळे विभाग प्रमुखांनी त्यांच्या सचिवांमार्फत स्वत:च्या विभागातील घोटाळ्यांची माहिती समितीला द्यावी. विभाग प्रमुखांनी खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्यास ते फौजदारी कारवाईसाठी पात्र ठरतील. सर्व प्रलंबित तक्रारींची माहिती दिल्यानंतर नवीन तक्रार आल्यास तिची माहिती एक आठवड्यात देण्यात यावी. यासंदर्भात कॉम्प्युटर अप्लिकेशन तयार केल्यास तक्रारींची माहिती देणे व चौकशींवर लक्ष ठेवणे सोपे होईल. तसेच, दैनंदिन काम करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, असे समितीचे म्हणणे आहे. यासंदर्भात सरकारला आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी हे पत्र रेकॉर्डवर घेऊन यातील मुद्यांवर १९ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे.घोटाळेबाजांवर सरकार वेळीच योग्य कारवाई करीत नाही. बरेचदा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाते. तेव्हापर्यंत महत्त्वपूर्ण पुरावे नष्ट होऊन जातात. त्याचा फायदा आरोपींना मिळतो. घोटाळ्यांमुळे सार्वजनिक निधीचे नुकसान होते. घोटाळ्याच्या चौकशीमध्ये सरकारची ऊर्जा व्यर्थ जाते. प्रकरण न्यायालयात आल्यास न्यायव्यवस्थेचा किमती वेळ खर्ची होतो. शेवटी हातात ठोस म्हणावे असे काहीच लागत नाही. असे एक -दोन नाही तर, अनेक प्रकरणांमध्ये झाल्याचे न्यायालयाला आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने घोटाळ्यांच्या चौकशीवर लक्ष ठेवण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मनरेगाच्या कामात झालेल्या आर्थिक घोटाळ्यामध्ये सहा वर्षांनंतर कारवाई सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या तक्रारीनंतर घोटाळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मधुकर निस्ताने यांनी २०१३ मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये न्यायालयाने १ आॅगस्ट २०१८ रोजी ही समिती स्थापन करण्याचा आदेश दिला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर