शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपुरात आसमंतात एकसुरात निनादला वंदे मातरम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 9:12 PM

जोश, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात वंदे मातरम् या मंत्राचे सूर संत्रानगरीच्या आसमंतात निनादले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये उत्साह, जोश आणि जल्लोष : मातृभूमी प्रतिष्ठानचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र राहिलेल्या ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने देशाच्या भावी पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचा हुंकार चेतविला. विद्यार्थ्यांमध्ये हीच देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अखंड भारत संकल्प दिनानिमित्त सक्करदरा चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन झाले. यामध्ये शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. जोश, जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात वंदे मातरम् या मंत्राचे सूर संत्रानगरीच्या आसमंतात निनादले.मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात येत असून, दरवर्षी लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. यावर्षी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र म्हणजे चित्रपट अभिनेता व भाजपचे खासदार सनी देओल हे होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रामुख्याने उपस्थित होते. सकाळी विविध शाळांचे विद्यार्थी आकर्षक गणवेशात हातात तिरंगा ध्वज घेऊन शिक्षकांसह सक्करदरा चौकाच्या कार्यक्रमस्थळी एकत्र आले. यात ३० च्यावर शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सर्वांच्या मुखामध्ये देशभक्तीचे गाणे गुणगुणत होते. सहभागी झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पं. बच्छराज व्यास विद्यालय, प्रेरणा कॉन्व्हेंट, केशवनगर शाळा, सरस्वती शिशू मंदिर, लोकांची शाळा आदी दक्षिण आणि पूर्व नागपुरातील शाळा होत्या. परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पावसाचे वातावरण असतानाही हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्साह बघता या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद समजला जाऊ शकतो. ढोलताशांच्या गजरात सनी देओल व नितीन गडकरी यांचे आगमन झाले. संपूर्ण वातावरण देशभक्तिमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर शिक्षकांनी आणि पालकांनी एकासुरात वंदे मातरम् गीत सादर केले. क्रांतिकारकांना देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा देणारे व देशभक्तीने भारलेले हे गीत संपूर्ण आसमंतात निनादले. यावेळी विद्यार्थी विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेत सजून आले होते. हातात तिरंगा घेऊन देण्यात आलेल्या ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. याप्रसंगी आयोजक व मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोयर यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, रामदास आंबटकर, गिरीश व्यास, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, दीपक कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.यानंतर विद्यार्थी, शिक्षकांनी आणि पालकांनी एकासुरात वंदे मातरम् गीताचे गायन केले. क्रांतिकारकांना देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा देणारे व देशभक्तीने भारलेले हे गीत संपूर्ण आसमंतात निनादले. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्चा जयघोष करीत वातावरण भारावून सोडले. या जोशपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.आयोजनात ईश्वर धीरडे, दीपक धुरडे, उषा पॅलट, शीतल कामडे, दिव्या धुरडे, नीता ठाकरे, स्नेहल बिहारे, विजय आसोले, अनिल लांबाडे, रवी अंबाडकर, विकास बुंडे, मनोज जाचक, राम कोरके, नरेंद्र गोरले, प्रशांत तुंगार, अभिजित मुळे, आशू वैद्य व मातृभूमी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा सहभागअखंड भारताचे संकल्प पूर्ण करू हा विश्वास : गडकरी 

आपण दरवर्षी १४ ऑगस्ट हा अखंड भारत संकल्प दिन म्हणून साजरा करतो. अखंड भारत हे आमचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न आम्ही पूर्ण करणारच, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. १५ ऑगस्टला येणारा स्वातंत्र्यदिन हे आनंदाचेच पर्व असते. मात्र यावर्षी हा आनंद वेगळ्या कारणानेही द्विगुणित झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुडगूस घातला होता. मात्र केंद्र शासनाद्वारे काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याच्या एका निर्णयाने अतिरेक्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे हा स्वातंत्र्यदिन अधिक आनंददायी झाल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली.हिंदुस्थान जिंदाबाद था, है और रहेगा : सनी देओल 
सनी देओल भाषणासाठी उभे होताच विद्यार्थी व नागरिकांमध्येही उत्साह संचारला. त्यांनीही जोशपूर्ण स्वरात ‘हिंदुस्थान जिंदाबाद है, जिंदाबाद था और जिंदाबाद रहेगा...’ हा गदर चित्रपटातील संवाद ऐकवीत उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट जोश भरला. त्याला प्रतिसाद देत वंदे मातरम् व भारतमाता की जयच्या घोषणांनी परिसर पुन्हा दुमदुमला. सुनी यांनी ‘बच्चो...’ अशी सुरुवात करीत, तुमचा उत्साह पाहून अखंड भारत होईल, असा विश्वास वाटत असल्याची भावना व्यक्त केली. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आदी क्रांतिकारकांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे हा स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करताना त्यांचा विसर पडता कामा नये. तुम्ही या देशाची शक्ती आहात. आपला देश महान आहेच आणि तो नेहमी राहावा, हा विचार आपण करतो. ही भावना तुमच्या मनात सदैव कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमnagpurनागपूर