ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांनी बांधली वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:44+5:302020-12-09T04:07:44+5:30

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेशच्यावतीने अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात पाठिंबा देत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात ...

Vajramutha built by farmers in rural areas | ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांनी बांधली वज्रमूठ

ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांनी बांधली वज्रमूठ

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेशच्यावतीने अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात पाठिंबा देत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपाई व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते राहुल सोमकुवर, गौतम ढोक,नीलेश ढोके, आशिष मेश्राम, गायकवाड आदी उपस्थित होते.

नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी शहरात फिरून भारत_बंदला समर्थन करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले.

आम आदमी पक्षातर्फे सकाळी ११ वाजता सीताबर्डी येथे निदर्शने करण्यात आली. तेथील व्यावसायिक व व्यापारी संघटनांना आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत सहभाग घेतला व समर्थन केले. राज्य समिती सदस्य देवेंद्र वानखेड़े, जगजीत सिंघ, नागपूर संयोजक कविता सिंघल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. राज्य सहसचिव अशोक मिश्रा, अमरीश सावरकर, नागपूर सचिव भूषण ढाकूलकर, प्रशांत निलाटकर, अजय धर्मे, हरीश गुरबानी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेस विचार जनजागृती अभियानानेदेखिल पाठिंबा दर्शवित संविधान चौकात आंदोलन व निदर्शने केली. प्रा. विजय बारसे, तनवीर अहमद, कृष्‍णराव परतेकी, यशवंत तेलंग, शिरीष तिवारी, मोहनीश देवलापुरे यांच्‍या नेतृत्‍वात आंदोलन करण्‍यात आले .

दक्षिण नागपूरमध्ये प्रदेश सचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यात व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. या दरम्यान दक्षिण नागपूरमध्ये बाईक रॅली काढून बंदचे आवाहन केले.

भीमशक्तीच्यावतीनेही शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहर अध्यक्ष बाबा बनसोड यांच्या नेतृत्वात अब्दुल रफीक, देवा कांबळे, अनिल मेश्राम,कैलास बोरकर, साहिल भागवत, माधवी बनसोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.,

कळमना धान्य बाजार अडतिया मंडळानेही बंदमध्ये सहभाग घेतला. मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली. गोपाळ कळमकर, रामेश्वर हिरुडकर, सारंग वानखेेड, नरेश जीभकाटे आदी सहभागी होते. नारेबाजी करून मार्केटमध्ये मिरवणूक काढण्यात आली.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धरणे करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, डॉ. रेखा बारहाते, गुणेश्वर आरीकर, विनोद उलिपवार, संजय पन्नासे, डॉ राजू गोसावी, प्रा. रमेश पिसे, विलास काळे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने लोकमत चौक, सीताबर्डी येथे आंदोलन करण्यात आले. प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, नागपूर शहर युवक काँग्रेसचे ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर प्रदेशच्यावतीने अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात पाठिंबा देत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली. यावेळी रिपाई व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते राहुल सोमकुवर, गौतम ढोक , नीलेश ढोके, आशिष मेश्राम,आश्र्वजित गायकवाड आदी उपस्थित होते.

नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी शहरात फिरून भारत_बंदला समर्थन करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. राशन दुकानदार संघानेही संविधान चौकात निदर्शने केली. यात संघटना अध्यक्ष उद्धव अग्रवाल, प्रफुल भूरा, राजेश कामडे, संजय उरकुडे, राजू दिक्षीत, मीलींद सोनटक्के आदी उपस्थित होते.राशन दुकानदार संघानेही संविधान चौकात निदर्शने केली. यात संघटना अध्यक्ष उद्धव अग्रवाल, प्रफुल भूरा, राजेश कामडे, संजय उरकुडे, राजू दिक्षीत, मीलींद सोनटक्के आदी उपस्थित होते.

आम आदमी पक्षातर्फे सकाळी ११ वाजता सीताबर्डी येथे निदर्शने करण्यात आली. तेथील व्यावसायिक व व्यापारी संघटनांना आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत सहभाग घेतला व समर्थन केले. राज्य समिती सदस्य देवेंद्र वानखेड़े, जगजीत सिंघ, नागपुर संयोजक कविता सिंघल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. राज्य सहसचिव अशोक मिश्रा, अमरीश सावरकर, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, प्रशांत निलाटकर, अजय धर्मे, हरीश गुरबानी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कॉंग्रेस विचार जनजागृती अभियानानेदेखिल पाठिंबा दर्शवित संविधान चौकात आंदोलन व निदर्शने केली. प्रा. विजय बारसे, तनवीर अहमद , कृष्‍णराव परतेकी , यशवंत तेलंग, शिरीष तिवारी , मोहनीश देवलापुरे,यांच्‍या नेतृत्‍वात आंदोलन करण्‍यात आले .

दक्षिण नागपूरमध्ये प्रदेश सचिव गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यात व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. या दरम्यान दक्षिण नागपूरमध्ये बाईक रॅली काढून बंदचे आवाहन केले.

भिमशक्तीच्या वतीनेही शेतकरी आंदोलनास पाठिंबा दर्शवित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शहर अध्यक्ष बाबा बनसोड

यांच्या नेतृत्वात अब्दुल रफीक, देवा कांबळे, अनिल मेश्राम,कैलास बोरकर, साहिल भागवत, माधवी बनसोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.,

कळमना धान्य बाजार अडतिया मंडळानेही बंदमध्ये सहभाग घेतला. मंडळाचे अध्यक्ष अतुल सेनाड यांच्या नेतृत्वात बाईक रॅली काढण्यात आली. गोपाळ कळमकर, रामेश्वर हिरुडकर, सारंग वानखेेड, नरेश जीभकाटे आदी सहभागी होते. नारेबाजी करून मार्केटमध्ये मिरवणूक काढण्यात आली.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने धरणे करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, शरद वानखेडे, डॉ. रेखा बारहाते, गुणेश्वर आरीकर, विनोद उलिपवार, संजय पन्नासे, डॉ राजु गोसावी, प्रा रमेश पिसे, विलास काळे यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.

...

१३ तालुक्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

देशातील नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. यामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार आहे. त्यामुळे हा कायदा रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरू राहील, असा संकल्प करीत नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी केंद्र सरकार विरोधात वज्रमूठ बांधली. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यात भिवापूर ते नरखेड तालुक्यापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला बळ देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. कामठी तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश महासचिव सुरेश भोयर यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यात उमरेड, बुटीबोरी, भिवापूर, रामटेक, नरखेड, कुही, मांढळ, वाडी, कोराडी या सर्वच प्रमुख शहरात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाविकास आघाडीचे समर्थक रस्त्यावर उतरले. सावनेर शहरात मुख्य रस्त्यावर टायर जाळत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. बंदमुळे जिल्ह्यातील कामठी, सावनेर, नरखेड आदी बाजार समित्यांचे व्यवहार दुुपारपर्यंत ठप्प राहिले.

Web Title: Vajramutha built by farmers in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.