शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगितली नाही म्हणून वैशाली जामदार यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:46 IST

Nagpur : हायकोर्टाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगितली नाही, या तांत्रिक कारणामुळे नागपूर विभागाच्या माजी शिक्षण उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जगन्नाथ जामदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे सायबर पोलिसांची नाचक्की झाली.

न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार आरोपीला सर्वप्रथम अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगणे आवश्यक आहे. त्यानंतरच आरोपीला अटक केली जाऊ शकते. परंतु, सायबर पोलिसांनी या बंधनकारक कायदेशीर प्रक्रियेचे पालनच केले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामदार यांची अटक अवैध ठरवून त्यांना जामीन दिला. सायबर पोलिसांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून जामदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. 

मूलभूत अधिकाराची पायमल्ली झालीभारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा व जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल केला आहे. सरकार व न्यायालयावर या अधिकाराचे संरक्षण करण्याचे दायित्व आहे. हा अधिकार आरोपींनाही नाकारला जाऊ शकत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलिसांनी जामदार यांच्यासह त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतरांना अटक करण्याची कारणे सांगितली नाही. परिणामी, जामदार यांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली झाली, असे कडक ताशेरेही न्यायालयाने पोलिसांवर ओढले.

घोटाळ्यात सहभाग असल्याचे पुरावेरेकॉर्डवरील पुराव्यांवरून जामदार यांचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून येते, असे परखड निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले. परंतु, पोलिसांच्या चुकीमुळे जामदार यांना जामीन मिळाला. त्या २० डिसेंबर २०२० ते २४ मे २०२३ पर्यंत नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक होत्या. त्यांच्या कार्यकाळात २११ बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. 

अशा आहेत जामिनाच्या अटी

  • एक लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व दोन जामीनदार सादर करावे. तपासाला सहकार्य करावे.
  • तपास पूर्ण होईपर्यंत दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पोलिस ठाण्यात हजेरी लावावी.
  • जिल्हा न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय नागपूर जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार नाही.
  • प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित करण्याचा प्रयत्न करायचा नाही.
टॅग्स :nagpurनागपूर