शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगितली नाही म्हणून वैशाली जामदार यांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:46 IST

Nagpur : हायकोर्टाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगितली नाही, या तांत्रिक कारणामुळे नागपूर विभागाच्या माजी शिक्षण उपसंचालक व छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव वैशाली जगन्नाथ जामदार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे सायबर पोलिसांची नाचक्की झाली.

न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार आरोपीला सर्वप्रथम अटक करण्याची कारणे लेखी स्वरुपात सांगणे आवश्यक आहे. त्यानंतरच आरोपीला अटक केली जाऊ शकते. परंतु, सायबर पोलिसांनी या बंधनकारक कायदेशीर प्रक्रियेचे पालनच केले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामदार यांची अटक अवैध ठरवून त्यांना जामीन दिला. सायबर पोलिसांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांच्या तक्रारीवरून जामदार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. 

मूलभूत अधिकाराची पायमल्ली झालीभारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा व जगण्याचा मूलभूत अधिकार बहाल केला आहे. सरकार व न्यायालयावर या अधिकाराचे संरक्षण करण्याचे दायित्व आहे. हा अधिकार आरोपींनाही नाकारला जाऊ शकत नाही. त्यामुळे आरोपीला अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलिसांनी जामदार यांच्यासह त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतरांना अटक करण्याची कारणे सांगितली नाही. परिणामी, जामदार यांच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली झाली, असे कडक ताशेरेही न्यायालयाने पोलिसांवर ओढले.

घोटाळ्यात सहभाग असल्याचे पुरावेरेकॉर्डवरील पुराव्यांवरून जामदार यांचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून येते, असे परखड निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले. परंतु, पोलिसांच्या चुकीमुळे जामदार यांना जामीन मिळाला. त्या २० डिसेंबर २०२० ते २४ मे २०२३ पर्यंत नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक होत्या. त्यांच्या कार्यकाळात २११ बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. 

अशा आहेत जामिनाच्या अटी

  • एक लाख रुपयाचे वैयक्तिक बंधपत्र व दोन जामीनदार सादर करावे. तपासाला सहकार्य करावे.
  • तपास पूर्ण होईपर्यंत दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पोलिस ठाण्यात हजेरी लावावी.
  • जिल्हा न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय नागपूर जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार नाही.
  • प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित करण्याचा प्रयत्न करायचा नाही.
टॅग्स :nagpurनागपूर