शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार हे नाना पटोलेंशी स्पर्धा करीत आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: April 11, 2025 18:09 IST

Nagpur : चंद्रशेखर बावनकुळे यांचा वडेट्टीवारांना टोला अनं सपकाळांना चिमटा

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटलवर शासनाने गंभीर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. काही चुका झाल्या असतील तर ते सुद्धा दुरुस्त करण्याकरिता यांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रमुख नेते आहेत, त्यांनी अहवाल तपासून घेतला पाहिजे. विजय वडेट्टीवार नवीन नवीन पक्षनेते झाले आहेत. त्यामुळे ते नाना पटोले यांच्यासोबत स्पर्धा करत आहेत, असा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या जिल्ह्यात यात्रा काढली तर तेच पुरे आहे, असा चिमटाही त्यांनी घेतला.

नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, गुरुवारी अमरावतीमध्ये आणि शुक्रवारी नागपुरात आपण अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहोत. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक लावून तातडीने सर्वेक्षण करावे व अहवाल सरकारकडे सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डीपीसी निधी वाटपासाठी महायुतीची किमिटीमहायुतीचे तिन्ही नेते बसून डीपीसी निधी वाटप कसा करायचा, पालकमंत्री मंत्र्यांचे अधिकार, तालुकास्तरीय समिती कसे वाटप करावे, विरोधी पक्षाचे लोकांनाही तिथे घ्यावा लागते. जिल्हास्तरीय ३७ समित्यांचे वाटप कसे असावे याचा फाम्युर्ला ठरवलेला आहे.

अमित शाह यांचा रायगड दौरा राजकीय नाहीअमित शहा यांचा राजकीय दौरा नसून ते रायगडावर कार्यक्रमासाठी जात आहेत. महायुतीच्या पक्षातील एका नेत्याने निमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारले. यात काही वावगं नाही. ते संस्कृती म्हणून जात आहे. राजकीय भांडवल करू नये, असेही बावनकुळे म्हणाले.

रेती माफियांसोबत हात मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तयारसरकारने वेगवेगळ्या माध्यमातून वाळू घाट कंट्रोल करण्याची योजना केली आहे. रेती माफियांसोबत हात मिळवणी करणाऱ्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांची यादी आली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे म्हणाले, पर्यावरणाची परवानगी नसताना भंडाऱ्यात रेतीघाट सुरू होते. त्यांना विभागीय आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी कारवाईची गरज होती पण झाली नाही. चंद्रपूर, भंडारा, जालना, जाफराबाद यासह अनेक ठिकाणी तक्रारी आल्या आहेत. राहुरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथूनही तक्रारी आहेत. सरकार स्वत:हून कारवाई करत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.पोलीस ठाणे वाढविण्याची गरजनागपुरातील हिंसाचार घटनेनंतर मुख्यमंत्री यांनी गृह विभागाचा आढावा घेतला.सुरक्षेचा आढावा घेतला. नागपूर जिल्ह्यात चार ते पाच पोलीस ठाणे वाढवण्याची गरज आहे. तर शहरात पाच पोलीस ठाणे वाढवण्याची गरज आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, कामठी हा वेगळा सहा नंबरचा झोन तयार करण्याची गरज आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणची पुनर्रचना करून काही पोलीस ठाणे वाढवण्याची गरज बावनकुळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNana Patoleनाना पटोलेnagpurनागपूर