शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

अखाद्य बर्फाचा खाण्यासाठी वापर : आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:13 IST

कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआईसगोला, कुल्फी, सरबतमध्ये सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.उपराजधानीचे तापमान ४३ अंशापर्यंत गेले आहे. अंगाची लाही लाही होऊ लागली असताना कोल्डड्रिंक, रसवंती, निंबूशरबत, आइसक्रीम व ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखादा बर्फाचा गोळेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयांत टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो किंवा तो कसा तयार होतो, त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही याची कुणीच खातरजमा करत नाही. शहरात बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या ‘कूलिंग’साठीच अखाद्य बर्फ तयार करतात. केवळ दोनच कंपन्या ‘आईसक्यूब’ तयार करतात. हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठे हॉटेल्स, बीअरबार येथेच होतो. कूलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे. अखाद्य बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनाना थंडावा (कूलिंग) देण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात, असे असतानाही अन्न औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही म्हणून काहीजण खासगी टॅँकरचे पाणी वापरतात. तर काही कारखाने विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची कोणतीही खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक आहे की नाही, याचीही तपासणी होत नाही. बहुसंख्य बर्फ अस्वच्छ पाण्यापासूनच तयार होत असल्याचे चित्र आहे.फूटपाथवर विकला जातो बर्फशहरातील अनेक महत्त्वाच्या चौकातील फूटपाथवर सर्रास बर्फाची विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फाला ऊन लागू नये म्हणून तो ठेवण्याच्या जागेवर अंथरली जाणारी पोती तसेच बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती अत्यंत घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यातच असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरवणारा असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बहुसंख्य आईस गोलावाले, कुल्फीवाले, निंबू शरबत व उसाचा रसवाले येथून हा बर्फ घेऊन जातात.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर