शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

"... तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाहीत"; 'त्या' राजीनाम्यावरुन आव्हाड संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:24 IST

आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला.

नागपूर/मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात ही बाब पुढे आणली. त्यामुळे, अधिवेशनाच्या काळातच आरक्षणाच्या प्रश्नावरुन हा विषय अधिक गंभीर बनला आहे. यापूर्वी आयोगाच्या सदस्यांचेही राजीनामे पडले आहेत. माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. परंतु, तो ९ डिसेंबरला मंजूर करण्यात आला. त्यावरुन, आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला.

निरगुडे यांनी राजीनामा देण्याचे कारण त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले नसले तरी आयोगावरील दबाव कारण असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी सदस्य पदाचा राजीनामा दिलेले सदस्य बालाजी किल्लारीकर यांनीही खळबळजनक दावा केला. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकार मनमानी करत असल्यामुळेच निरगुडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय. 

राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला. जी कॉन्स्टीट्युशनल बॉडी असते, त्यातून सरकारला कोणालाही बाहेर काढता येत नाही. मागच्या दोन महिन्यात दोन सदस्यांनी आणि आता अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा केवळ राजकीय दबावातूनच दिला गेलाय. आम्ही म्हणल तसेच करुन द्या, असा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नकार दिला आहे, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

तसेच, जे घडणारच नाही, ते या सरकारला घडवून दाखवायचं आहे, जे कॉन्स्टीट्युशनली अशक्य आहे. तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टीट्युशनली आरक्षण वाढवून देत नाहीत, तोपर्यंत तुम्ही काहीच करु शकत नाही. हे कॉलेजच्या मुलालाही कळेल. पण, इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचंय. सगळं माहिती सगळ्यांना, मग कोणी ओबीसीविरुद्ध बोलायचं, कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं आणि उभ्या महाराष्ट्राची राखरांगोळी करायची. यातूनच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे. निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

किल्लारीकरांचा गौप्यस्फोट

संपूर्ण समाज आरक्षणात यायला हवा. तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा याला आक्षेप होता. गोखले इन्स्टिट्यूटमार्फतच हे काम करायला हवे, असा फडणवीसांचा आग्रह होता, असं किल्लारीकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचे व्यापक स्वरुपात सर्वेक्षण करू नये तर संक्षिप्त स्वरुपात सर्वेक्षण करावे. यामुळे हे सर्वेक्षण लवकर होईल, असं फडणवीसांचं म्हणणं होतं, असं किल्लारीकर यांनी नमूद केलंय. 

टॅग्स :reservationआरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडGovernmentसरकारResignationराजीनामा