शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

"... तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाहीत"; 'त्या' राजीनाम्यावरुन आव्हाड संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:24 IST

आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला.

नागपूर/मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी आज राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे. राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात ही बाब पुढे आणली. त्यामुळे, अधिवेशनाच्या काळातच आरक्षणाच्या प्रश्नावरुन हा विषय अधिक गंभीर बनला आहे. यापूर्वी आयोगाच्या सदस्यांचेही राजीनामे पडले आहेत. माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. परंतु, तो ९ डिसेंबरला मंजूर करण्यात आला. त्यावरुन, आता विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला.

निरगुडे यांनी राजीनामा देण्याचे कारण त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले नसले तरी आयोगावरील दबाव कारण असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर यापूर्वी सदस्य पदाचा राजीनामा दिलेले सदस्य बालाजी किल्लारीकर यांनीही खळबळजनक दावा केला. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकार मनमानी करत असल्यामुळेच निरगुडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय. 

राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला. जी कॉन्स्टीट्युशनल बॉडी असते, त्यातून सरकारला कोणालाही बाहेर काढता येत नाही. मागच्या दोन महिन्यात दोन सदस्यांनी आणि आता अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हा राजीनामा केवळ राजकीय दबावातूनच दिला गेलाय. आम्ही म्हणल तसेच करुन द्या, असा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नकार दिला आहे, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

तसेच, जे घडणारच नाही, ते या सरकारला घडवून दाखवायचं आहे, जे कॉन्स्टीट्युशनली अशक्य आहे. तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टीट्युशनली आरक्षण वाढवून देत नाहीत, तोपर्यंत तुम्ही काहीच करु शकत नाही. हे कॉलेजच्या मुलालाही कळेल. पण, इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचंय. सगळं माहिती सगळ्यांना, मग कोणी ओबीसीविरुद्ध बोलायचं, कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं आणि उभ्या महाराष्ट्राची राखरांगोळी करायची. यातूनच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे. निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

किल्लारीकरांचा गौप्यस्फोट

संपूर्ण समाज आरक्षणात यायला हवा. तुलनात्मक अभ्यासाच्या आधारावर मराठा समाजाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा याला आक्षेप होता. गोखले इन्स्टिट्यूटमार्फतच हे काम करायला हवे, असा फडणवीसांचा आग्रह होता, असं किल्लारीकर यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाचे व्यापक स्वरुपात सर्वेक्षण करू नये तर संक्षिप्त स्वरुपात सर्वेक्षण करावे. यामुळे हे सर्वेक्षण लवकर होईल, असं फडणवीसांचं म्हणणं होतं, असं किल्लारीकर यांनी नमूद केलंय. 

टॅग्स :reservationआरक्षणJitendra Awhadजितेंद्र आव्हाडGovernmentसरकारResignationराजीनामा