शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गांधींकडे असेपर्यंत 'राम' आणि 'गाय' अहिंसक होते : चंद्रकांत वानखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:25 IST

गांधीजींकडे असेपर्यंत राम आणि गाय अहिंसक होती, मात्र संघाकडे जाताच ते हिंसक झाल्याची परखड टीका ज्येष्ठ विचारवंत व लेखक चंद्रकांत वानखडे यांनी केली.

ठळक मुद्देजनमंच जनसंवादमध्ये ‘गांधी का मरत नाही?’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी राम मानतात, मंंदिर मानतात पण मंदिर बांधायला विरोध करतात. गांधींना हिंदू धर्म प्रिय होता पण जातीभेद, वर्णभेदाला ते धर्मावरचा कलंक मानत होते. गांधींनी सार्वजनिक व्यासपीठावरून अभिजनांची ही पारंपरिक चौकट मोडल्यानेच ते धर्मांधांचे लक्ष्य झाले. गांधीजींकडे असेपर्यंत राम आणि गाय अहिंसक होती, मात्र संघाकडे जाताच ते हिंसक झाल्याची परखड टीका ज्येष्ठ विचारवंत व लेखक चंद्रकांत वानखडे यांनी केली.जनमंचच्या जनसंवाद कार्यक्रमात ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, नरेश क्षीरसागर उपस्थित होते. चंद्रकांत वानखडे यांनी अनेक दाखले समोर ठेवले. गांधीजींवर अनेक प्रकारची टीका केली गेली व चारित्र्यावर शिंतोडे उडविले गेले. त्यांच्यामुळे भारताचे तुकडे झाले, त्यांनी पाकिस्तानला ५५ कोटी दिले ही कारणे देत त्यांच्या हत्येचे समर्थन करणारेही आहेत. मात्र १९३४ साली पहिल्यांदा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न झाला होता व त्यात नारायण आपटे नामक आरोपीचे नाव समोर आले होते. त्यावेळी पाकिस्तान हा शब्दही कुणाला माहीत नव्हता. त्यामुळे हत्येच्या समर्थनात दिली जाणारी कारणे थोतांड असल्याचे जाणवते. या टोकाच्या गांधीद्वेषाचे कारण त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीतून सापडतात. देशात गांधींच्या उदयापूर्वी स्वातंत्र्याची चळवळ ही विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. सामाजिक स्वातंत्र्य की राजकीय स्वातंत्र्य या वादात सामाजिक सुधारणेचा विषय निषिद्ध होता. राजकीय सत्ता ही मक्तेदारी समजणाऱ्या धर्ममार्तंडांना त्यात बहुजनांचा सहभाग नको होता. गांधींच्या उदयानंतर पहिल्यांदा पारंपरिक चौकट मोडली गेली. राजकीय आंदोलनात सामाजिक सुधारणेला प्राधान्य मिळाले व जातीभेद, वर्णभेदाला तडा गेला. गांधींच्या स्वयंपाकगृहापर्यंत सर्व जातीधर्माच्या लोकांना परवानगी होती आणि धार्मिक सत्तेचा दावा करणारे या गोष्टीला ओंगळवाणा, घाणेरडेपणा मानत होते. त्यांच्या दृष्टीने हा घाणेरडेपणा गांधींच्या घरापर्यंत राहिला असता तर चालले असते, पण गांधींनी तो काँग्रेसच्या सार्वजनिक व्यासपीठावर आणला. सवर्णांच्या पारंपरिक चौकटीत असलेली चळवळ गांधी नेतृत्वामुळे सार्वजनिक झाल्याने संतापलेल्या अभिजनांनी स्वातंत्र्य लढ्याला ‘बाटलेले स्वातंत्र्य’ असा उल्लेख करीत त्यापासून फारकत घेतली व ब्रिटिशांशी जवळीक साधली. वर्णव्यवस्थेची चौकट भेदल्यामुळेच गांधीजींची हत्या झाली, असे परखड मत वानखडे यांनी व्यक्त केले.१४७ देशात त्यांचे पुतळे आहेत, १६७ देशांनी त्यांची टपाल तिकिटे काढली आहेत. म्हणून ‘मजबुरी’चे नाही तर ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ अशी उक्ती प्रचारित होणे गरजेचे आहे. गोळ्या घातल्याने, चारित्र्यहनन, मूर्तिभंजन केल्यानेही गांधी मरत नाही, हे बघून आता कधी शहीद भगतसिंग तर कधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधीला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण जे आज भगतसिंंग, नेताजी यांचे नाव घेतात, ते कधी नेताजी किंवा भगतसिंगांसोबत जुळले होते का, असा सवाल वानखडे यांनी केला. मात्र सर्व पुरावे असताना गांधीप्रेमींनी ही टीका खोडली नाही.यावेळी डॉ. शरद निंबाळकर यांनी, या देशात शेती, शेतकऱ्यांचे दु:ख, जातीभेद, असमानता, धर्मांधता आहे तोपर्यंत गांधी मरणार नाही, ते अजरामर राहतील, अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पांडे यांनी केले व संचालन डॉ. राजीव जगताप यांनी केले. नरेश क्षीरसागर यांनी आभार मानले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर