शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

विदर्भात असंसर्गजन्य आजार वाढताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:39 IST

पूर्व विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, व गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते जुलै २०१८ या दरम्यान ४ लाख लोकांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देपाच महिन्यात चार लाख लोकांची तपासणी कामाचा ताण, प्रदूषण, वाढते वय व बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, व गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते जुलै २०१८ या दरम्यान ४ लाख लोकांची तपासणी करण्यात आली. यात १० हजार रुग्णांना मधुमेह, २१ हजार रुग्णांना रक्तदाब, ८८३ रुग्णांना हृदयरोग, ७१० रुग्णांना पक्षाघात तर १५८ रुग्णांना विविध प्रकाराचा कर्करोग आढळून आला. संसर्गजन्य आजारांपेक्षा असंसर्गजन्य आजाराचा धोका वाढत असल्याचे हे चित्र असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.पूर्वी संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यूची टक्केवारी मोठी होती. अलीकडे नवनवे संसर्गजन्य आजार डोके वर काढत असले तरी लसीकरण व जनजागृतीमुळे हे आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आले आहे. परंतु त्या तुलनेत असंसर्गजन्य असलेले आजार विशेषत: मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, पक्षाघात व कर्करोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. कामाचा ताण, प्रदूषण, वाढलेली आयुमर्यादा व बदललेली जीवनशैली यामुळे हे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. याला घेऊनच राज्यात आॅगस्ट २०११ पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्यात या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ३० वर्षांवरील लोकांवर कर्करोग, हृदयरोग, मधुमेह व पक्षाघाताची तपासणी करणे, तशी नोंद घेणे, या रुग्णांवर मोफत तपासणी व उपचार करणे सुरू झाले. एप्रिल २०१८ पासून नागपूर व गोंदिया जिल्ह्यातही या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत असंसर्गजन्य आजार वाढल्याचे वास्तव समोर आले आहे.

रक्तदाब व मधुमेहाचे वाढते रुग्णया कार्यक्रमांतर्गंत एप्रिल ते जुलै २०१८ या कालावधीत भंडारा जिल्ह्यात १३८२०९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात मधुमेहाचे ९०४, रक्तदाबाचे ५४५९ दिसून आले.वर्धा जिल्ह्यात ४९५२१ लोकांची तपासणी करण्यात आली. मधुमेहाचे ५९९, रक्तदाबाचे ७५९ रुग्ण आढळले. ४गडचिरोली जिल्ह्यात ५४२४४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मधुमेहाचे ४३१, रक्तदाबाचे १३६२ रुग्णांची नोंद झाली.चंद्रपूर जिल्ह्यात १०४८६९ रुग्णांची तपासणी केली असता मधुमेहाचे २५७०, रक्तदाबाचे ५९०३ रुग्ण आढळून आले.नागपूर जिल्ह्यात ५०९६० रुग्णांची तपासणी केली असता मधुमेहाचे ६१८, रक्तदाबाचे १३३९, हृदयविकाराचे तरगोंदिया जिल्ह्यातील ३०४४४ रुग्णांची तपासणी केल्यावर मधुमेहाचे ५२१० आणि रक्तदाबाचे ६८३० रुग्ण आढळून आले.

संसर्गजन्य आजारापेक्षा असंसर्गजन्य आजार म्हणजे, रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आदी वाढण्याचे अनेक कारण आहेत. यातील म्हत्त्वाचे म्हणजे बदललेली जीवनशैली, ताण, प्रदूषण, वाढलेली आयुर्मर्यादा हे आहेत. या सोबतच तंबाखू, धूम्रपान व दारूचे सेवनही याला कारणीभूत ठरत आहे.-डॉ. जय देशमुख

टॅग्स :Healthआरोग्य