शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात होणार महानुभाव पंथाचे अध्यासन

By admin | Updated: February 29, 2016 02:53 IST

महानुभाव पंथाने मराठीला राजभाषेचा व धर्मभाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठीच्या वाटचालीत महानुभाव पंथाने मोठे योगदान दिले आहे.

महानुभाव साहित्य संमेलन : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणानागपूर : महानुभाव पंथाने मराठीला राजभाषेचा व धर्मभाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठीच्या वाटचालीत महानुभाव पंथाने मोठे योगदान दिले आहे. महानुभाव पंथाचे हे विचार व साहित्याच्या अभ्यास व संशोधनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात चक्रधरस्वामी यांच्या नावाने महानुभाव पंथाचे अध्यासन सुरू करण्यात येईल. तसेच त्याला राज्य शासनाच्यावतीने आर्थिक पाठबळ सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. महानुभाव सेवा संघ नागपूरद्वारा सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात महानुभाव साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्यश्री गोविंदराज व्यास कारंजेकरबाबा हे संमेलनाध्यक्ष होते. नागराजबाबा शास्त्री हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, रायकरबाबा, सुभद्राआत्या शास्त्री कपाटे, माहूरकरबाबा शास्त्री हे विशेष अतिथी होते. युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, आनंदराव गजभिये, चंद्रशेखर गायकवाड, पुरुषोत्तम ठाकरे, अविनाश ठाकरे, परिणय फुके व्यासपीठावर होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १२ व्या शतकात जेव्हा सामाजिक विषमतेने परिसीमा गाठली होती तेव्हा समाज समता व बंधुत्व विसरू लागला होता. तेव्हा महानुभाव पंथाने पहिल्यांदा समतेचे बीजारोपण केलं. भेदाभेद, विषमता दूर झाली पाहिजे, समाजात समता निर्माण झाली पाहिजे, असा प्रयत्न केला. मराठ्यांचे राज्य हे अटकेपार गेले. परंतू मराठीला पहिल्यांदा अटकेपार कंदहारपर्यंत नेण्याचे कार्य महानुभाव पंथाने केले. महानुभाव पंथाची खरी विचारभूमी ही रिद्धपूर राहिली आहे. रिद्धपूरचा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. रिद्धपूरचा विकास केला जाईल. तेथे यात्री निवासाचे काम लवकरच सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, धर्म हा केवळ ईश्वर भक्तीचा मार्ग नसून संपूर्ण मानवी जीवनाला प्रकाशमान करणारी दुर्दम्य अशी प्रेरणा आहे. स्वामींचा विचार हा लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. काणे यांनी महानुभावपंथाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे सांगितले. याप्रसंगी नागराजबाबा शास्त्री, रायकरबाबा, सुभद्राआत्या शास्त्री कपाटे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महानुभाव साहित्य संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन आणि ग्लोबल महानुभाव संघ या अ‍ॅन्ड्राईड अ‍ॅप्लीकेशनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी संचालन केले. अ‍ॅड. के. आर. शेंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)लीळाचरित्राचा वाद कायमचा सोडवावा महानुभाव सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. तु.वि. गेडाम यांनी महानुभाव पंथीयांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा विषद केल्या. ‘लीळाचरित्र’ या ग्रंथाचा मुद्दा उपस्थित करीत ते म्हणाले, याबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे. या ग्रंथाची तिसरी प्रत छापून तयार आहे. परंतु त्याचे प्रकाशन करता येत नाही. काही लीळाबाबत वाद आहेत. त्या खरच वादग्रस्त आहेत की नाही,. यासाठी शासनाने तीन सदस्यीय समिती नेमावी आणि त्याचा अहवाल न्यायालयात सादर करून या विषयाचा एकदा सोक्षमोक्ष लावावा. तसेच चक्रधर स्वामी यांच्या जयंतीच्या दिवशी ऐच्छिक सुटी जाहीर करावी, रिद्धपूरचा विकास करावा, तेथे नवीन यात्री निवास बांधावे, चंद्रपूर जिल्ह्यातील चिचोली या गावाला पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करावे आणि विद्यापीठात चक्रधरस्वामींच्या नावाने अध्यासन सुरू करावे, अशा मागण्याही केल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लीळाचरित्र ग्रंथाबाबत सध्या न्यायालयात वाद सुरू आहे, इतकीच आपल्याला माहिती आहे. त्यासंदर्भात आपल्याकडून संपूर्ण माहिती घेऊन ती समजून त्यातून निश्चित मार्ग काढला जाईल. काही वाद असतील तर ते वगळून ग्रंथ प्रकाशित करण्याबाबतची सूचना चांगली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महानुभावाचे साहित्य व दर्शनप्रकाराची गंगोत्री म्हणजे लीळाचरित्रच - आचार्यश्री कारंजेकरबाबा महानुभावांचे जे हजारो साहित्यप्रकार व दर्शनप्रकार जन्माला आले असतील त्यांची गंगोत्री लीळाचरित्रच आहे, असे संमेलनाध्यक्ष आचार्यश्री गोविंदराजव्यास कारंजेकरबाबा यांनी सांगितले. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, धर्मशास्त्र अशा कित्येक विषयांच्या अभ्यासकांचा लीळाचरित्र हा कंठमणी आहे. इ.स. १२७८ मध्ये श्रीम्हार्इंभट्टांनी लिहिलेला हा ग्रंथ मराठीतील पहिला ग्रंथ आहे, हे आपण अभिमानाने सांगायलाच हवे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धधर्माचा स्वीकार करण्याआधी समता आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या महानुभवपंथाचा स्वीकार करण्याविषयी सखोल विचार केला होता, याला अलिकडचा इतिहास साक्षी असल्याचेही ते यावेळी म्हणाले.