शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

नागपुरात जुळ्यांना जन्म देऊन बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:14 AM

दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे झालेल्या या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा आरोप लावला.

ठळक मुद्देडागा रुग्णालय : नातेवाईकांनी घातला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे झालेल्या या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा आरोप लावला.‘सिरोपॉझिटिव्ह’, साडेसात महिन्यांची प्रसुती व प्रसुतीनंतर औषधे देऊनही प्लासेंटा (वार) बाहेर न आल्याने शस्त्रक्रियेद्वारे ते काढण्याची तयारी करीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.नागपुरातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय गर्भवतीच्या पोटात दुखायला लागल्याने कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री १.३० वाजता गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल केले. रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी तिने पहिल्या बाळाला जन्म दिला तर दोन तासानंतर, पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी दुसºया बाळाला जन्म दिला. दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याने ‘प्लासेंटा’ बाहेर आला नव्हता. त्यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली. परंतु दोन तासानंतरही ‘प्लासेंटा’ बाहेर न आल्याने शस्त्रक्रियेद्वारे तो काढण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. रुग्णासोबतच विविध तपासण्यांची कागदपत्रे नव्हती. यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी त्या महिलेचे हिमोग्लोबीन व इतर चाचण्या करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत रक्तस्राव होण्याचा धोका असल्याने रक्ताची जमवाजमव करण्यात आली. सकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी बाळंतीणीला शस्त्रक्रिया गृहात हलविण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यातून बाहेर काढण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत असतानाच तिचा मृत्यू झाला. सकाळी ८.३० वाजता मृत्यूची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. याला घेऊन नातेवाईकांनी शस्त्रक्रिया गृहात गोंधळ घातला. शहर काँग्रेस समितीचे सचिव इर्शाद अली व वसीम खान यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पार्वेकर यांना घेराव घातला. याच दरम्यान पोलीसही आलेत. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना तिच्या आजाराची माहिती दिल्यावर प्रकरण शांत झाल्याचे डागा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.उपचारात उशीर झालामृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावला. ते म्हणाले, सामान्य प्रसुतीच्या नावाखाली रुग्णाकडे दुर्लक्ष केले. यात खूप रक्तस्राव झाला. शिवाय, ५ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत तिच्यावर उपचारच झाले नाही. या वेळेत तिच्यावर उपचार झाले असते तर तिचा जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.जन्माला आलेले शिशू कमी वजनाचेसाडेसात महिन्यातच प्रसुती झाल्याने तिची दोन्ही जुळी मुले कमी वजनाची आहे. पहिले शिशु १.४ किलोग्रॅमचे असून ती मुलगी आहे तर दुसरे शिशु हे केवळ १ किलोगॅ्रमचे असून तो मुलगा आहे. दोन्ही शिशुंवर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.शस्त्रक्रिया लांबल्यामृताच्या नातेवाईकांनी सकाळी ८.३० वाजेपासून शस्त्रक्रिया गृहासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही तास हा गोंधळ सुरू असल्याने रुग्णालयातील शस्त्रक्रिया लांबल्या, शिवाय रुग्ण तपासणीतही अडथळा आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पार्वेकर यांनी सांगितले.तहसील ठाण्यात तक्रार दाखलमृत महिलेच्या पतीने तहसील ठाण्यात जाऊन या प्रकरणाची मौखिक तक्रार दाखल केली. परंतु या संदर्भातील लेखी तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे अद्यापही करण्यात आलेली नसल्याचे समजते.शवविच्छेदन न करताच घरी नेला मृतदेहसुत्राने सांगितले, नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर डागा प्रशासनाने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून मेयोत पाठविण्यात आला. परंतु काही दूर गेल्यानंतर नातेवाईकांनी आॅटोमधून मृतदेह आपल्या घरी नेला. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला.चौकशी केली जाईलनातेवाईकांच्या आरोपावरून चौकशी केली जाईल. शिवाय ‘डेथ आॅडिट’ही केले जाईल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, त्याच्या अहवालानंतरच नेमके कारण सांगता येईल. परंतु तूर्तास तरी ‘पल्मोनरी अ‍ॅम्बोलिसम’मुळे महिलेचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. रुग्णालयातर्फे कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही.-डॉ. सीमा पार्वेकरवैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय

टॅग्स :Deathमृत्यूDaga Hospitalडागा हॉस्पिटल