शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

२८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत का, हे चाचपणीनंतर उद्धव ठाकरेंना कळेल

By कमलेश वानखेडे | Updated: July 17, 2024 19:16 IST

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार

कमलेश वानखेडे

नागपूर : उबाठा हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी युती करावी, त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचा विचार उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकतो. त्यामुळे कदाचित ते राज्यभर चाचपणी करत असतील. २८८ मतदारसंघांमध्ये उमेदवार आहेत की नाही हे त्यांना चाचपमणी केल्यावर कळेल, असा टोला उद्योगमंत्री उदय सामांत यांनी लगावला.

नागपुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, आदित्य ठाकरे हे अडीच वर्षापासून महाराष्ट्र सत्ता परिवर्तन होईल असे म्हणत होते. पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. शेकापचे जयंत पाटल यांनी जो आरोप केलेला आहे. त्या अनुषंगाने विधानसभेला दोन तीन महिने बाकी आहे. कुणी कुणी महायुतीला मतदान केले याचे पडसाद विधानसभेत दिसतील. जयंत पाटील याांची मतं फुटणार हे डोळ्यासमोर दिसत होते. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरीत्या केले, असा आरोप त्यांनी केला. अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री आहेत. त्यांना कुठल्या सूत्रांनी सांगितले मला माहित नाही. विधान परिषदेमध्ये त्यांनी ट्रेलर बघितलेला आहे. विधानसभेत काय होणार हे त्यांनाही माहित आहे. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्याचे काम ते करत आहे, असा चिमटाही सामंत यांनी घेतला.

चारुलता टोकस यांचे महायुतीत स्वागत करू

काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांना ऑफर दिली की नाही, हे मला माहिती नाही. पण टोकस यांचं महायुतीमध्ये स्वागत आहे, असे सांगत टोकस यांच्या प्रवेशाचे संकेत दिले. विदर्भात किती जागा लढायच्या या संदर्भात आम्ही यादी तयार केलेली आहे. हा सगळा अधिकार मुख्यमंत्री शिंदे यांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशाल गडाच्या बाबतीत जातीपातीचे राजकारण करण्यात अर्थ नाही. अनधिकृत बांधकामामुळे झालेला तो उद्रेक होता. निवडणूक आल्या म्हणून जातीपातीचे धर्माचा राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचे काम कोणी करू नये, असे सांगत त्यांनी खा. ओवेसी यांना सुनावले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतnagpurनागपूर