शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 7:53 PM

वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

ठळक मुद्देवेगवेगळी थाप : रक्कम लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत.अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरी नगरात राहणारे नंदकिशोर मधुकर मून (वय ६७) यांना १ मे रोजी सायबर गुन्हेगाराचा फोन आला. आपण बँक अधिकारी बोलतो. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते नव्याने सुरू करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी मून यांचा एटीएम कार्ड नंबर मागितला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून मून यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यातील ४९ हजार ३९५ रुपये काढून घेतले.दुसरी अशीच घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ मे रोजी घडली. पेन्शन नगरातील रहिवासी शकील इक्बाल अब्दुल (वय ४२) यांच्या मोबाईलवर एकाने फोन केला. तुमचे केवायसी करायचे आहे, असे सांगून आरोपीने शकील यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना मोबाईलवर एक लिंक पाठविली. ही लिंक ओपन केल्याच्या काही वेळेनंतर शकील यांच्या खात्यातून आरोपीने ४९ हजार ९९८ रुपये काढून घेतले.या दोन्ही प्रकरणात नमूद पीडित व्यक्तींनी सायबर शाखेत धाव घेतली. त्यांच्या तक्रारी घेतल्यानंतर सायबर शाखेकडून या दोन्ही प्रकरणांचा तपास करण्यात आला. त्यानंतर बुधवारी अनुक्रमे अजनी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तरीही फसवणूक सुरूचनागपुरातच नव्हे तर विविध शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत. वृत्तपत्रांमधून त्याची माहितीही प्रकाशित होते. तरीसुद्धा काही व्यक्ती शहानिशा न करता आपल्या बँक खात्याबाबत अनोळखी व्यक्तीला माहिती देतात. लॉटरी लागली, एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले, केवायसी करायचे आहे, अशी थाप सायबर गुन्हेगार मारतात. त्यानंतर कार्ड किंवा बँक खात्याची माहिती विचारतात किंवा मोबाईलवर एक लिंक पाठवितात. ही लिंक ओपन करताच आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती आरोपीला कळते आणि त्या आधारे तो ऑनलाईन रक्कम काढून घेतो. वारंवार अशा घटना घडत असून बँकेतर्फेही खातेधारकांना नेहमीच सूचना दिल्या जातात. तरीसुद्धा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे अशा घटना घडण्याची मालिका सुरूच आहे.सायबर शाखेचे आवाहनया घटनांपासून धडा घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन, स्थानिक सायबर शाखेकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची, एटीएम अथवा क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये. केवायसी करण्याचा प्रकार शक्यतो बँकेत जाऊनच करावा. सायबर गुन्हेगाराच्या थापेबाजीला बळी न पडता आपली रक्कम त्याने लंपास करू नये यासाठी प्रत्येकाने पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर