शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘आऊटिंग’साठी निघाले अन् परतलेच नाही; अंबाझरी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 13:30 IST

तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांवर शोककळा

नागपूर : सकाळपासून पाऊस असल्याने ‘आऊटिंग’ करण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. चप्पल धुवायला दोघे तलावात उतरले असताना त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अंबाझरी तलावाजवळ खळबळ उडाली होती. मिहीर शरद उके (२०, इंदोरा) व चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०, लष्करीबाग) ही मृत विद्यार्थ्यांची नावे असून या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे मित्रदेखील होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवाय परिसरातील इतर नागरिकांनादेखील आरडाओरड करत मदतीसाठी बोलविले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अक्षय व प्रशिकने तातडीने पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलीस ठाण्यातील चमू घटनास्थळी पोहोचली. दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली व पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले.

फिरण्यासाठी निघाले अन्..

मिहीर, चंद्रशेखर, अक्षय व प्रशिक हे चौघेही अनेक दिवसांपासूनचे मित्र होते व ‘सोशल मीडिया’वरदेखील सक्रिय होते. रविवारी वातावरण आल्हाददायक असल्याने चौघेही फिरण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ गेले होते. मात्र घरून निघालेले दोघे परत आलेच नाहीत. या घटनेची माहिती कळताच दोघांच्याही नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. याशिवाय डोळ्यासमोर मित्र गमावल्याने अक्षय व प्रशिकला मोठा धक्का बसला आहे.

विद्यार्थ्यांचे ‘आऊटिंग’ ठरतेय धोकादायक

ग्रुपमध्ये अंबाझरी तलावाजवळ फिरायला आलेल्या मित्रांमधील काही जणांचा अतिउत्साह धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. १६ एप्रिल रोजी काही विद्यार्थी अंबाझरी तलावात फिरायला गेले होते. तेव्हा यश रेड्डी या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. तर ५ जून रोजीदेखील विद्यार्थ्यांचा ग्रुप फिरायला गेला असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही व बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातAmbazari Lakeअंबाझरी तलावdrowningपाण्यात बुडणेStudentविद्यार्थीDeathमृत्यू