शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘आऊटिंग’साठी निघाले अन् परतलेच नाही; अंबाझरी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 13:30 IST

तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांवर शोककळा

नागपूर : सकाळपासून पाऊस असल्याने ‘आऊटिंग’ करण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. चप्पल धुवायला दोघे तलावात उतरले असताना त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अंबाझरी तलावाजवळ खळबळ उडाली होती. मिहीर शरद उके (२०, इंदोरा) व चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०, लष्करीबाग) ही मृत विद्यार्थ्यांची नावे असून या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे मित्रदेखील होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवाय परिसरातील इतर नागरिकांनादेखील आरडाओरड करत मदतीसाठी बोलविले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अक्षय व प्रशिकने तातडीने पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलीस ठाण्यातील चमू घटनास्थळी पोहोचली. दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली व पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले.

फिरण्यासाठी निघाले अन्..

मिहीर, चंद्रशेखर, अक्षय व प्रशिक हे चौघेही अनेक दिवसांपासूनचे मित्र होते व ‘सोशल मीडिया’वरदेखील सक्रिय होते. रविवारी वातावरण आल्हाददायक असल्याने चौघेही फिरण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ गेले होते. मात्र घरून निघालेले दोघे परत आलेच नाहीत. या घटनेची माहिती कळताच दोघांच्याही नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. याशिवाय डोळ्यासमोर मित्र गमावल्याने अक्षय व प्रशिकला मोठा धक्का बसला आहे.

विद्यार्थ्यांचे ‘आऊटिंग’ ठरतेय धोकादायक

ग्रुपमध्ये अंबाझरी तलावाजवळ फिरायला आलेल्या मित्रांमधील काही जणांचा अतिउत्साह धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. १६ एप्रिल रोजी काही विद्यार्थी अंबाझरी तलावात फिरायला गेले होते. तेव्हा यश रेड्डी या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. तर ५ जून रोजीदेखील विद्यार्थ्यांचा ग्रुप फिरायला गेला असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही व बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातAmbazari Lakeअंबाझरी तलावdrowningपाण्यात बुडणेStudentविद्यार्थीDeathमृत्यू