शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

‘आऊटिंग’साठी निघाले अन् परतलेच नाही; अंबाझरी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 13:30 IST

तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांवर शोककळा

नागपूर : सकाळपासून पाऊस असल्याने ‘आऊटिंग’ करण्यासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अंबाझरी तलावात बुडून मृत्यू झाला. चप्पल धुवायला दोघे तलावात उतरले असताना त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही. दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अंबाझरी तलावाजवळ खळबळ उडाली होती. मिहीर शरद उके (२०, इंदोरा) व चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०, लष्करीबाग) ही मृत विद्यार्थ्यांची नावे असून या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

रविवारी दुपारी मिहीर उके व चंद्रशेखर वाघमारे हे अंबाझरी तलावाजवळ फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय मेश्राम व प्रशिक भिडे हे त्यांचे मित्रदेखील होते. अंबाझरी तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. त्यांच्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शिवाय परिसरातील इतर नागरिकांनादेखील आरडाओरड करत मदतीसाठी बोलविले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांच्याही नाकातोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अक्षय व प्रशिकने तातडीने पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलीस ठाण्यातील चमू घटनास्थळी पोहोचली. दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती देण्यात आली व पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले.

फिरण्यासाठी निघाले अन्..

मिहीर, चंद्रशेखर, अक्षय व प्रशिक हे चौघेही अनेक दिवसांपासूनचे मित्र होते व ‘सोशल मीडिया’वरदेखील सक्रिय होते. रविवारी वातावरण आल्हाददायक असल्याने चौघेही फिरण्यासाठी अंबाझरी तलावाजवळ गेले होते. मात्र घरून निघालेले दोघे परत आलेच नाहीत. या घटनेची माहिती कळताच दोघांच्याही नातेवाइकांना प्रचंड धक्का बसला. याशिवाय डोळ्यासमोर मित्र गमावल्याने अक्षय व प्रशिकला मोठा धक्का बसला आहे.

विद्यार्थ्यांचे ‘आऊटिंग’ ठरतेय धोकादायक

ग्रुपमध्ये अंबाझरी तलावाजवळ फिरायला आलेल्या मित्रांमधील काही जणांचा अतिउत्साह धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. १६ एप्रिल रोजी काही विद्यार्थी अंबाझरी तलावात फिरायला गेले होते. तेव्हा यश रेड्डी या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. तर ५ जून रोजीदेखील विद्यार्थ्यांचा ग्रुप फिरायला गेला असताना त्यांना पोहायचा मोह आवरला नाही व बुडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :AccidentअपघातAmbazari Lakeअंबाझरी तलावdrowningपाण्यात बुडणेStudentविद्यार्थीDeathमृत्यू