शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

नागपुरात कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:59 IST

पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देनिविदा काढल्या : पावसाळा संपताच कार्यादेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.शहरात लवकरच नवीन पॅटर्ननुसार कचरा संकलन केले जाणार आहे. यासाठी शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. त्यांच्यावर घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी राहील. प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच भांडेवाडी येथील डम्पिंगयार्ड मधील कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया केली जात आहे. यामुळे भविष्यात डम्पिंग यार्डमध्ये कचरा साठणार नाही.शहराचे असे असेल विभाजनकचरा संकलनासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ता वाडी(अमरावती रोड)-व्हेरायटी चौक-झिरो माईल, एलआयसी चौक-सेंट्रल एव्हेन्यू रोड ते पारडी याप्रमाणे मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजू गृहित धरून उत्तर भागात पाच झोन गृहित धरून सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.३५ लाख लोकसंख्या व दक्षिण भागात पाच झोन गृहित धरून १३.६३ लाख लोकसंख्या याप्रमाणे विभाजन करण्यात येणार आहे. यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.आर्थिक बोजा वाढणारनागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा संकलन व भांडेवाडी येथे वाहून नेण्यासाठी प्रतिटन १४०० रुपये खर्च येतो. यासाठी महापालिकेला वर्षाला ६० ते ७० कोटी खर्च करावे लागतात. परंतु वाढती महागाई, डिझेलचे दर व मजुरीत होणारी वाढ विचारात घेता नवीन निविदानुसार प्रतिटन २१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. दहा वर्षासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला दरवर्षी वाढीव दर द्यावे लागतील. यामुळे महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.कंपोस्ट खत निर्माण करण्यावर भरशहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे अपेक्षित आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही आवाहन क रण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळातही ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. १२ शाळांत हा प्रकल्प सुरू झाला आहे. सर्वच शाळात प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे राम जोशी यांनी सांगितले.उद्यानात खत प्रकल्पमहापालिकेची लहान-मोठी १३४ उद्याने आहेत. मॉईलच्या सहकार्याने उद्यानात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे उद्याने स्वच्छ राहतील. आजूबाजूच्या नागरिकांनाही ओला कचरा येथे टाकता येईल. यातून निर्माण होणाऱ्या कंपोस्ट खतापासून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल. अशी प्रशासनाला आशा आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न