शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नागपुरात कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:59 IST

पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देनिविदा काढल्या : पावसाळा संपताच कार्यादेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.शहरात लवकरच नवीन पॅटर्ननुसार कचरा संकलन केले जाणार आहे. यासाठी शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. त्यांच्यावर घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी राहील. प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच भांडेवाडी येथील डम्पिंगयार्ड मधील कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया केली जात आहे. यामुळे भविष्यात डम्पिंग यार्डमध्ये कचरा साठणार नाही.शहराचे असे असेल विभाजनकचरा संकलनासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ता वाडी(अमरावती रोड)-व्हेरायटी चौक-झिरो माईल, एलआयसी चौक-सेंट्रल एव्हेन्यू रोड ते पारडी याप्रमाणे मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजू गृहित धरून उत्तर भागात पाच झोन गृहित धरून सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.३५ लाख लोकसंख्या व दक्षिण भागात पाच झोन गृहित धरून १३.६३ लाख लोकसंख्या याप्रमाणे विभाजन करण्यात येणार आहे. यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.आर्थिक बोजा वाढणारनागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा संकलन व भांडेवाडी येथे वाहून नेण्यासाठी प्रतिटन १४०० रुपये खर्च येतो. यासाठी महापालिकेला वर्षाला ६० ते ७० कोटी खर्च करावे लागतात. परंतु वाढती महागाई, डिझेलचे दर व मजुरीत होणारी वाढ विचारात घेता नवीन निविदानुसार प्रतिटन २१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. दहा वर्षासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला दरवर्षी वाढीव दर द्यावे लागतील. यामुळे महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.कंपोस्ट खत निर्माण करण्यावर भरशहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे अपेक्षित आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही आवाहन क रण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळातही ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. १२ शाळांत हा प्रकल्प सुरू झाला आहे. सर्वच शाळात प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे राम जोशी यांनी सांगितले.उद्यानात खत प्रकल्पमहापालिकेची लहान-मोठी १३४ उद्याने आहेत. मॉईलच्या सहकार्याने उद्यानात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे उद्याने स्वच्छ राहतील. आजूबाजूच्या नागरिकांनाही ओला कचरा येथे टाकता येईल. यातून निर्माण होणाऱ्या कंपोस्ट खतापासून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल. अशी प्रशासनाला आशा आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न