शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नागपुरात कचरा संकलनासाठी दोन कंत्राटदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:59 IST

पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देनिविदा काढल्या : पावसाळा संपताच कार्यादेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाणीपुरवठा व स्वच्छता प्राथमिक गरजा आहेत. याचा विचार करता स्वच्छ भारत अभियानांतर्गत आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लि.चे कंत्राट संपल्याने नवीन दोन कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच कार्यादेश दिले जातील अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.शहरात लवकरच नवीन पॅटर्ननुसार कचरा संकलन केले जाणार आहे. यासाठी शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. त्यांच्यावर घराघरातून कचरा संकलनाची जबाबदारी राहील. प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच भांडेवाडी येथील डम्पिंगयार्ड मधील कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया केली जात आहे. यामुळे भविष्यात डम्पिंग यार्डमध्ये कचरा साठणार नाही.शहराचे असे असेल विभाजनकचरा संकलनासाठी शहराचे दोन भागात विभाजन करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य रस्ता वाडी(अमरावती रोड)-व्हेरायटी चौक-झिरो माईल, एलआयसी चौक-सेंट्रल एव्हेन्यू रोड ते पारडी याप्रमाणे मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजू गृहित धरून उत्तर भागात पाच झोन गृहित धरून सन २०११ च्या जनगणनेनुसार ११.३५ लाख लोकसंख्या व दक्षिण भागात पाच झोन गृहित धरून १३.६३ लाख लोकसंख्या याप्रमाणे विभाजन करण्यात येणार आहे. यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.आर्थिक बोजा वाढणारनागपूर शहरात दररोज ११०० ते ११५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. कचरा संकलन व भांडेवाडी येथे वाहून नेण्यासाठी प्रतिटन १४०० रुपये खर्च येतो. यासाठी महापालिकेला वर्षाला ६० ते ७० कोटी खर्च करावे लागतात. परंतु वाढती महागाई, डिझेलचे दर व मजुरीत होणारी वाढ विचारात घेता नवीन निविदानुसार प्रतिटन २१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. दहा वर्षासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला दरवर्षी वाढीव दर द्यावे लागतील. यामुळे महापालिकेवरील आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे.कंपोस्ट खत निर्माण करण्यावर भरशहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे अपेक्षित आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनीही आवाहन क रण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळातही ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. १२ शाळांत हा प्रकल्प सुरू झाला आहे. सर्वच शाळात प्रकल्प राबविण्याचा विचार असल्याचे राम जोशी यांनी सांगितले.उद्यानात खत प्रकल्पमहापालिकेची लहान-मोठी १३४ उद्याने आहेत. मॉईलच्या सहकार्याने उद्यानात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामुळे उद्याने स्वच्छ राहतील. आजूबाजूच्या नागरिकांनाही ओला कचरा येथे टाकता येईल. यातून निर्माण होणाऱ्या कंपोस्ट खतापासून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल. अशी प्रशासनाला आशा आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न