शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर विमानतळावर आढळले दोन बॉम्ब! मॉक ड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते. सतर्कतेबाबतच्या सरावासाठी ही नियमित स्वरूपाची मॉक ड्रील होती.

ठळक मुद्देएक तासाचा अल्टिमेटम; संपूर्ण विमानतळ खाली करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास माओवाद्यांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये दोन बॉम्ब ठेवल्याची सूचना मिळाली. थोड्याच वेळात बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्यात आले. यादरम्यान विमानतळाच्या आतील सर्व कर्मचारी व प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगपासून दूर ठेवण्यात आले होते.मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत विमानतळावर नेहमीप्रमाणे सामान्य परिस्थिती होती. दुपारी २.२० च्या सुमारास एअर एशियाच्या बुकिंग आॅफिस व एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया(एएआय)ला एक फोन कॉल आला. यात सांगण्यात आले की, काही व्हीव्हीआयपींना उडविण्यासाठी माओवाद्यांनी विमानतळावर दोन बॉम्ब पुरलेले आहेत. परंतु व्हीव्हीआयपींनी विमान प्रवास रद्द केल्याबाबतचा पुन्हा कॉल आला व पुरण्यात आलेल्या दोन्ही बॉम्बचा एक तासाचा स्फोट होणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर संबंधित सुरक्षा यंत्रणेला याची माहिती देण्यात आली.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला(सीआयएसएफ)च्या सशस्त्र जवानांनी मोर्चा सांभाळला. या सुरक्षा यंत्रणेचे श्वान पथकही पोहोचले. विमानतळाच्या आतील अनेक लोकांना नेमके काय सुरू आहे, याची माहिती नव्हती. यादरम्यान मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या अग्निशमन दलाचे कर्मचारी डिपार्चर गेटवर सज्ज झाले. २.३० ला पोलीस बॉम्ब शोधक पथक पोलिसांच्या मदतीला दाखल झाले. काही वेळातच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्याही आल्या.यादरम्यान सुरक्षा रक्षकांनी शिटी वाजवून ड्रॉप अ‍ॅन्ड गो झोनपासून दूर राहण्याचे लोकांना तसेच वाहनांना दूर ठेवण्याचे सांगण्यात आले. एमआयएल, एएआय व एअरलाईन्सचे कर्मचारी प्रसंगावधान ओळखून सतर्क झाले अन् सुरक्षा जवानांसोबत कामाला लागले. सीआयएसएफच्या श्वान पथकाने २.४५ ते २.५० दरम्यान पुरून ठेवलेल्या बॉम्बचा शोध घेतला. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकातील जवानांनी स्फोटक रोधक गणवेश परिधान करून बॉम्ब काढले. दोन्ही बॉम्ब निकामी केले. हा प्रकार मॉक ड्रीलचा एक भाग होता. परंतु मॉक ड्रीलची कार्रवाई पूर्ण होईपर्यंत स्थानीय प्रशासनाची अ‍ॅम्बुलन्स आली नव्हती. बॉम्बचा शोध घेतल्यानंतर ३.५० वाजता राज्य शीघ्र कृती दलाचे जवान पोहोचले.नियमित मॉक ड्रीलब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी(बीसीएएस)च्या दिशानिर्देशानुसार दरवर्षी ही प्रक्रि या केली जाते. यात सर्व एअरलाईन्सची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक पोलीस व अन्य संबंधित विभाग सहभागी झाले होते. या मोहिमेतील काही ठराविक लोकांना वगळता याची कुणालाही माहिती नव्हती की ही एक मॉक ड्रील आहे.विजय मुळेकर, सिनियर एअरपोर्ट डायरेक्टर, एमआयएल बैठकीत झाली चर्चामॉक ड्रीलनंतर जुन्या टर्मिनल बिल्डिंगच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात एमआयएलचे सिनियर एअरपोर्ट डायरेक्टर विजय मुळेकर, मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सरडकर, सीआयएसएफचे असिस्टंट कमांडंट टी.डी. विन्सेंट, एमआयएलचे अधिकारी लक्ष्मीनारायण, सोनेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह अन्य विभाग व एअरलाईन्सचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कारवाईच्या वेळेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी निकषानुसार ड्रीलमध्ये सहभागी विभागांनासुद्धा माहिती पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरBombsस्फोटके