शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दोन दुचाकी आपसात भिडल्या, आई-वडिलांसह मुलाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 10:45 IST

बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलावर भीषण अपघात

बुटीबोरी/टाकळघाट : बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलावर बुधवारी रात्री भीषण अपघात घडला. दोन दुचाकी आपसात भिडल्या. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या एका अपघातात एका कामगाराचाही मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच. ४० सीएल - ९९१९ आणि एम.एच.-४० एएस-५८७१ या क्रमांकाच्या दोन्ही दुचाकी बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने वेणा नदीच्या पुलावरून विरुद्ध दिशेने येत होत्या. या दोन्ही बाइक आपसात धडकल्या. यात सुकळी येथे जात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात वडील शंकर बिसेन (३७), त्यांची पत्नी सरिता बिसेन (३२) आणि मुलगा हिमांशू बिसेन (१४) यांचा समावेश आहे.

इतर तीन जखमींपैकी दोघांना नागपूरला तर एकाला बुटीबोरी येथील माया रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या एका अपघातात अज्ञात वाहनाने मोरारजी कंपनीच्या कामगाराला जगत हॉटेलजवळ वर्धा रोडवर उडवले. मृताचे नाव विजय सूर्यभान ढानके असे असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर