शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

ट्रकने चार हरणांना चिरडले,एक अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:03 IST

हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील हिवराबाजार - सालई मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.हिवराबाजार-सालई परिसर वन विभागाच्या पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येतो. या जंगलात वाघ, बिबट्यांसह इतर वन्यप्राण्यांचा वावर आहे. याच भागातून पवनी - हिवराबाजार - सालई - तुमसर (भंडारा) मार्ग गेला आहे. हल्ली या मार्गावर अवैध रेतीची वाहतूक वाढली आहे. दरम्यान, सकाळी या मार्गावरील वन विभागाच्या आगाराजवळ हरणाचा कळप रोड ओलांडत असताना रेतीची अवैध वाहतूक करणारा एक भरधाव ट्रक त्या कळपात शिरला. ट्रकचालकाने कुठलीही दयामाया न दाखविता चार हरणांना चिरडले आणि वेगात ट्रक घेऊन निघून गेला. त्यात एक हरीण गंभीर जखमी झाले.माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी हरणाला उपचारासाठी पाठविण्याची व्यवस्था केली. शिवाय, मृत हरणांना ताब्यात घेतले. वन्यप्राण्यांचा शिकारीत अथवा अपघातात मृत्यू ही बाब गंभीर आहे. मात्र, या अपघाताबाबत वन अधिकारी फारसे गंभीर असल्याचे दिसून आले नाही. हा अपघात वन विभागाच्या आगाराजवळ झाल्याने या मार्गावरून नेमके कोणते ट्रक रेती घेऊन जातात, याची माहिती वन कर्मचाऱ्यांना असायला हवी. त्या माहितीच्या आधारे आरोपी ट्रकचालकापर्यंत पाहोचणे वन अधिकाऱ्यांना सहज शक्य होईल, असेही जाणकारांनी सांगितले. परिणामी, वन अधिकारी याबाबत काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अवैध रेतीवाहतुकीचे वन्यप्राणीही बळीसध्या जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक प्रचंड वाढली आहे. या अवैध वाहतुकीमुळे सावनेर तालुक्यातील बडेगाव परिसरात झालेल्या अपघातांमध्ये चौघांना त्यांचा जीव गमवावा लागला. आता ही रेतीची अवैध वाहतूक वन्य प्राण्यांच्या जीवावर उठली आहे. वन्य प्राण्यांचे शिकार प्रकरण वन अधिकारी गांभीर्याने घेते. आता वन अधिकारी अपघातही गांभीर्याने घेतात की नाही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातwildlifeवन्यजीव