शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 20:41 IST

आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. बिप्लब कुमार देब यांनी मंगळवारी दीक्षाभूमी व संघ मुख्यालयाला भेट दिली. संघ स्मृतिमंदिरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले.

ठळक मुद्देबिप्लब कुमार देब : दीक्षाभूमी, संघ मुख्यालयाला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. बिप्लब कुमार देब यांनी मंगळवारी दीक्षाभूमी व संघ मुख्यालयाला भेट दिली. संघ स्मृतिमंदिरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले.आसामप्रमाणे ईशान्येकडील इतरही राज्यांमध्ये ‘एनआरसी’ तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या धर्तीवर देब यांनी त्रिपुरात असे काही होणार नाही, असे सांगितले. त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची कुठलीही मागणी नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित लोक नाहीत. सर्व नागरिकांकडे योग्य कागदपत्रे आहेत. आसाममध्येदेखील ही फारशी संवेदनशील बाब नाही. मात्र आता याचे राजकारण करण्यात येत असून विदेशी मानसिकतेचे काही लोक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.देब यांच्या हिंदीचा झाला लोच्याबिप्लब कुमार देब यांनी हिंदीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र हिंदीत बोलत असताना ते थोडे अडखळले व आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी नकळतपणे टीका केली. आसाममध्ये फार संवेदनशील बाब आहे, असे मला वाटत नाही. या मुद्द्यावरुन धास्ती निर्माण करण्यात सर्बानंद सोनोवाल हे सक्षम नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. काही वेळाने त्यांनी यात सुधारणा केली.सरसंघचालकांची घेतली भेटबिप्लब कुमार देब यांनी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर संघ मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे तासभर ते मुख्यालयात होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुषसंघ मुख्यालयातून देब हे थेट दीक्षाभूमी येथे गेले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेतले. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष होते. त्यांच्यामुळे देशात लोकशाही रुजली व दीक्षाभूमीत येऊन लोकशाहीचा खरी भावना समजते आहे. नागपुरातील लोक फार भाग्यवान आहेत, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी