शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

त्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 20:41 IST

आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. बिप्लब कुमार देब यांनी मंगळवारी दीक्षाभूमी व संघ मुख्यालयाला भेट दिली. संघ स्मृतिमंदिरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले.

ठळक मुद्देबिप्लब कुमार देब : दीक्षाभूमी, संघ मुख्यालयाला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या ‘एनआरसी’वरुन( नॅशनल रजिस्टर आॅफ सिटीझन्स) राजकारण तापले असताना त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी नेमके विरोधात वक्तव्य केले आहे. आसामप्रमाणे त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची अजिबात आवश्यकता नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. बिप्लब कुमार देब यांनी मंगळवारी दीक्षाभूमी व संघ मुख्यालयाला भेट दिली. संघ स्मृतिमंदिरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले.आसामप्रमाणे ईशान्येकडील इतरही राज्यांमध्ये ‘एनआरसी’ तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या धर्तीवर देब यांनी त्रिपुरात असे काही होणार नाही, असे सांगितले. त्रिपुरामध्ये ‘एनआरसी’ची कुठलीही मागणी नाही. आमच्या राज्यात बेकायदेशीर स्थलांतरित लोक नाहीत. सर्व नागरिकांकडे योग्य कागदपत्रे आहेत. आसाममध्येदेखील ही फारशी संवेदनशील बाब नाही. मात्र आता याचे राजकारण करण्यात येत असून विदेशी मानसिकतेचे काही लोक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.देब यांच्या हिंदीचा झाला लोच्याबिप्लब कुमार देब यांनी हिंदीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र हिंदीत बोलत असताना ते थोडे अडखळले व आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी नकळतपणे टीका केली. आसाममध्ये फार संवेदनशील बाब आहे, असे मला वाटत नाही. या मुद्द्यावरुन धास्ती निर्माण करण्यात सर्बानंद सोनोवाल हे सक्षम नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले. काही वेळाने त्यांनी यात सुधारणा केली.सरसंघचालकांची घेतली भेटबिप्लब कुमार देब यांनी सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर संघ मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे तासभर ते मुख्यालयात होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच भेट होती.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुषसंघ मुख्यालयातून देब हे थेट दीक्षाभूमी येथे गेले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेतले. बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपुरुष होते. त्यांच्यामुळे देशात लोकशाही रुजली व दीक्षाभूमीत येऊन लोकशाहीचा खरी भावना समजते आहे. नागपुरातील लोक फार भाग्यवान आहेत, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी