शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

सहारा वाळवंटाच्या माथ्यावर अतुल फडकविणार तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:39 IST

सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून केलेला सराव...दंदे फाऊंडेशनचे मिळालेले पाठबळ आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर सहारा वाळवंटाच्या माथ्यावर तिरंगा फडकविण्याचे अतुलकुमारने उराशी बाळगलेले स्वप्न...

ठळक मुद्देजगातील सर्वात कठीण २५० कि.मी.ची मॅराथॉन : दंदे फाऊंडेशनचे मिळाले सहकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहारा वाळवंट...सलग सात दिवस...२५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅराथॉन...५० ते ५५ अंशावर तापमान...निर्मनुष्य ठिकाण...साप, विंचू आणि वाळूच्या वादळाचा धोका...भारताचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व... नागपुरातील अतुलकुमार चौकसे याचा सहभाग...गेल्या सहा महिन्यांपासून केलेला सराव...दंदे फाऊंडेशनचे मिळालेले पाठबळ आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर सहारा वाळवंटाच्या माथ्यावर तिरंगा फडकविण्याचे अतुलकुमारने उराशी बाळगलेले स्वप्न...सर्वकाही स्वप्नवत वाटावे असेच, परंतु हे वास्तव आहे. उद्या शनिवार ३१ मार्च रोजी अतुलकुमार या स्पर्धेसाठी नागपूरहून निघतो आहे. मॅराथॉनमध्ये भारताचा तिरंगा फडकविण्याचा त्याचा मानस आहे. दंदे फाऊंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे व डॉ. सीमा दंदे यांनी शुक्रवारी तिरंगा त्याचा स्वाधीन करीत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी या सर्वांनी मिळून पत्रकारांशी संवाद साधला. स्पर्धा यशस्वीतेने पूर्ण करून विदेशात भारताचा तिरंगा फडकावूनच मी मायदेशी परतणार, असा ठाम विश्वास अतुलकुमारने व्यक्त केला. स्पर्धेत जगभरातील ६० देशांचे १०५० धावपटू सहभागी होणार आहेत. अतुलकुमार या स्पर्धेत धावणारा एकमेव भारतीय धावपटू आहे. अतुल पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत असून शनिवारी मुंबईमार्गे मोरोक्कोला रवाना होत आहे.नकाशा व होकायंत्राच्या मदतीने शोधावा लागणार स्पर्धेचा मार्गअतुलकुमार म्हणाला, ५० ते ५५ अंश तापमानात होणारी ही स्धर्पा ८ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. सलग सात दिवसानंतर १४ एप्रिलला संपेल. त्यापूर्वीचे दोन दिवस स्पर्धेची माहितीसह वैद्यकीय तपासणी व अन्य तयारी करण्यासाठी असणार आहे. २५० किलोमीटरची स्पर्धा सहा टप्प्यामध्ये होणार आहे. स्पर्धेचे आयोजक फ्रान्सचे पॅट्रीक बेअर यांनी स्पर्धेचे अनेक ‘सिक्रेट’ कायम ठेवले आहे. स्पर्धकाला कोणत्या स्टेजमध्ये किती अंतर धावायचे व स्पर्धेचा मार्ग कोणता राहील हे जाहीर केले नाही. विशेष म्हणजे, स्पर्धेचा मार्ग नकाशा आणि होकायंत्राच्या मदतीने शोधावा लागणार आहे. हा मार्गही सपाट नसणार तर डोंगर, दऱ्यातून गेलेला आहे.दररोज केवळ साडेदहा लिटर पाणीअतुलकुमार म्हणाला, ५० डिग्रीच्यावर तापमानात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धकाला कुणाचीही मदत मिळणार नाही. जबाबदारी स्वत:च घ्यावी लागणार आहे. साप, विंचू व वाळूच्या वादळाचा धोक्यासारखे अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. यातील एक आव्हान म्हणजे, रोज केवळ साडेदहा लिटर पाणी मिळणार आहे.अतुलकुमार म्हणााला, पाठीवर २५ किलो वजन घेऊन २५० किलोमीटरचे अंतर ओलांडायचे आहे. पाठीवरील ‘किट’मध्ये स्लिपींग बॅगसह, सात दिवस पुरेल एवढ्या खाण्यापिण्याच्या वस्तूसह, माऊंटन स्टीक, टॉर्च, सोलर बॅटरी, सर्व्हायव्हल ब्लँकेट, ड्राय फ्रुट्ससह विविध औषधांचा समावेश असणार आहे. स्पर्धकासह पायलट म्हणून कोणही व्यक्ती सोबत राहणार नाही. स्पर्धकांवर दोन हॅलिकॉप्टरची पाहणी राहील. दंदे फाऊंडेशनच्या सहकार्यामुळे जगातील सर्वात कठीण स्पर्धेत मी सहभागी होत असल्याचे अतुलकुमार चौकसेने आवर्जून सांगितले.अतुल देशाची मान उंचावणार : डॉ. पिनाक दंदेसहारा वाळवंटातील ही जगातील सर्वात कठीण स्पर्धा असली तरी अतुलकुमारची सकारात्मकता, आत्मविश्वास, जिद्द व गेल्या चार महिन्यांपासून केलेल्या तयारीमुळे २५० किलोमीटरची स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून देशाची मान उंचावेल, असा विश्वास दंदे फाऊंडेशनचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांनी व्यक्त केला. डॉ. दंदे म्हणाले, अतुलमधील साहस आणि परिश्रम घेण्याची जिद्द पाहूनच दंदे फाऊंडेशनने त्याला मदतीचा हात दिला. स्पर्धेपूर्वी अतुलचे मानसिक व शारीरिक क्षमता सक्षम करण्यात आली. वाळवंटात ही स्पर्धा होणार असल्याने कन्हान नदीच्या पात्रात सराव करून घेतला. तापमानाशी जुळवून घेण्यासाठी ‘ट्रेडमिल’च्या खोलीत ‘हिटर’च्यामदतीने तापमान वाढवून धावण्याचाही सराव केला. कमीत कमी वजन व स्नायूंना बळकटी देण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. धावतांना नाक व कानाला दुखापत होणार नाही व बुटमध्ये वाळू जाणार नाही, याबद्दलही साहित्य तयार करून घेण्यात आले. अतुलमध्ये जगावेगळी कामगिरी करण्याची क्षमता असून तो या कठीणातील कठीण स्पर्धाही यशस्वी करेल, असेही डॉ. दंदे म्हणाले.

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनnagpurनागपूर