शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 8:43 PM

राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश : युवकांनाही मिळणार रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शासनाने दोन वर्षासाठी हे अभियान हाती घेतले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकासावर आधारीत उपक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचा तसेच आवश्यक असलेल्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जि.प.च्या ग्रामीण विकास यंत्रणेला दिली आहे. शासनाची यंत्रणा व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी रामटेक भागात मेळावा घेऊन, मोठ्या संख्येने युवकांना यात सहभागी करून घेतले. या संपूर्ण अभियानावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. प्रत्येक पंधरवड्यात अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. योजनेची आर्थिक उद्दिष्टे

  • शेतक ऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट करणे
  • पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधार करणे
  • कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर आणणे
  • ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे

सामाजिक उद्दिष्ट

  • कुटुंबांना पक्की घरे बांधून देणे
  • शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे
  • सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे

 मानवी विकास उद्दिष्ट

  • बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे
  • आरोग्य व स्वच्छतेचा दर्जा सुधारणे
  • शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे

 गावांची निवडरामटेक : बांद्रा, गर्रा, खुर्सापार, डोंगरगाव, खडगीखेडा, कामठी, सावरा, उसरीपार, सावरा, जमुनिया, टुयापार, फुलझरी, खापा, पिपरिया, सालई, सिल्लारी, तोतलाडोहपारशिवनी : बोरी, रमजान, सालई, अंबाझरी, मकरधोकडा, सालेघाट, सिलादेवी, सुवरधरा, गारगोटी, पारडी, घाटपेंढरी, किरंगीसर्रा, कोलितमारा, मेहकेपार

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासnagpurनागपूर