शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुसळधार पावसाचा जोर; रेल्वे लाईनमधील गिट्टी वाहून गेल्याने इटारसी मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 13:24 IST

तीन रेल्वे गाड्या रद्द, नऊ गाड्यांना विलंब तर दोन गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या.

नागपूर : सर्वत्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वेसेवेत व्यत्यय निर्माण झाला आहे. अशात नागपूर इटारसी रेल्वे सेक्शनमधील किरतगड-केसला स्थानकादरम्यान रेल्वेलाईनमधील गिट्टी वाहून गेली. त्यामुळे डाऊन लाईनवरच्या (इटारसी मार्ग) रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. धोका लक्षात घेता या मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्या दुसऱ्या मार्गावर वळवल्या. तीन रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर ९ रेल्वेगाड्या आहे तेथेच थांबविण्यात आल्याने त्या विलंबाने धावणार आहेत.

चार दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक रेल्वेगाड्या मंदगतीने धावत आहेत. अशात किरतगड- केसला रेल्वेस्थानका दरम्यानच्या पटरीची गिट्टी पावसामुळे वाहू लागली. शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास हा प्रकार सुरू झाला. तो लगेच लक्षात न आल्याने या मार्गावर पहाटे ४ वाजेपर्यंत रेल्वे धावत होत्या. नंतर मात्र धोका वाढल्याचे लक्षात आल्याने डाऊन लाईनवरील रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या.

रेल्वे प्रशासनाने लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुसरीकडे ट्रेन क्रमांक २०८०६ नवी दिल्ली - विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १२६२६ नवी दिल्ली त्रिवेंद्रम केरला एक्स्प्रेसचा मार्ग बदलवून ती खंडवा, बडनेरा, वर्धा, बल्लारपूर मार्गाने चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर नागपूर - आमला, आमला - नागपूर आणि आमला इटारसी या तीन पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आल्या. गिट्टी वाहून गेल्याने रेल्वेलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे, डाऊन लाईनवरील वाहतूक बंद करण्यात आल्याने ट्रेन क्रमांक १२७२४ तेलंगणा एक्स्प्रेस, १२७९२ सिकंदराबाद एक्स्प्रेस, १६०९४ लखनऊ चेन्नई एक्स्प्रेस आणि २२६९२ बंगळुरू राजधानी एक्स्प्रेस या गाड्या किरतगडजवळ थांबविण्यात आल्या.

काही वेळेनंतर अप लाईनवरून या तीन गाड्यांना एक एक करून पुढे सोडण्यात आले. मात्र, नागपूर इटारसी रेल्वेसेक्शनमधील ट्रेन क्रमांक १२७९१ सिकंदराबाद एक्स्प्रेस, १२६४९ संपर्कक्रांती एक्स्प्रेस, १६०३१ अंदमान एक्स्प्रेस, २०८४५ बिलासपूर -बिकानेर एक्स्प्रेस आणि १२८०७ समता एक्स्प्रेस जागो जागी काही वेळेसाठी अडकून पडली. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.

दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर

पहाटेपासून रेल्वेलाईन दुुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धस्तरावर सुरू केले. त्यामुळे दुपारी १२.२६ वाजता डाऊन लाईनवरील वाहतूक सुरळीत होऊ शकली. त्यानंतर पहिली रेल्वेगाडी १२७९२ सिकंदराबाद एक्स्प्रेस या मार्गावरून धावू लागली.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूरRailway Passengerरेल्वे प्रवासीRainपाऊस