शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या संगीतात फारसे चांगले चालले नाही : उषा मंगेशकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:45 IST

पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत निर्माण व्हायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. ना शब्द चांगले, ना चाल आणि चित्रपटातील प्रसंगाचा अर्थबोधही त्यातून होत नाही. आजकाल चित्रपट संगीताबाबत फारसे चांगले चालले नाही, अशी खंत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीदीला भारतरत्न मिळणे सर्वोच्च क्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत निर्माण व्हायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. ना शब्द चांगले, ना चाल आणि चित्रपटातील प्रसंगाचा अर्थबोधही त्यातून होत नाही. आजकाल चित्रपट संगीताबाबत फारसे चांगले चालले नाही, अशी खंत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या उषाताईंनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या ६-७ दशकापासून गाण गात असून यात अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले. त्यावेळी चांगले गाणारे होते तसे चांगले संगीत निर्माण करणारे संगीतकारही होते. आज मात्र गायक कोण व संगीतकार कोण, हेच लक्षात येत नाही, इतके गायक-संगीतकार दररोज या क्षेत्रात येत आहेत. मात्र त्यांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. आधी अनेक दिवसांच्या तयारीनंतर गाणे गायले जायचे आणि गायकांना ते पाठही व्हायचे. आज गाणच बसवलं जात नाही तर ते पाठ कसे होईल, असा सवाल त्यांनी केला. त्यांना बोल आणि चाल विचारत गावे लागते. पूर्वीची गाणी आजही लोकांच्या मनात आहेत. आताचे गाणे आले कधी आणि गेले कधी, हेच कळत नसल्याचे त्या म्हणाल्या. गाण्यांचे रिमिक्स करणे म्हणजे गाण्यांचा आत्मा मारल्यासारखे असते. आधीच्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक ही गाणी तयार केली आहेत. त्यांचे रिमिक्स करून गाण्यांचे अर्थ आणि भावना बदलविल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान गेल्या काही वर्षात शास्त्रीय संगीताकडे तरुणांचा ओढा वाढला असून चांगले गायक निर्माण होणे, ही सुखदायी बाब असल्याची पावती त्यांनी दिली.उषा मंगेशकर यांची चित्रकार म्हणूनही ओळख आहे. संगीत आणि चित्रकलेचा जवळचा संबंध आहे. आईकडून चित्रकलेची प्रेरणा घेतल्याचे सांगत प्रदर्शनाऐवजी हौसेखातर घरीच पोर्ट्रेट काढत असल्याचे त्यांनी सांगितले. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्याविषयी सांगताना, आम्हा तिन्ही बहिणींचा गायनाचा बाज आणि दिशा वेगवेगळ््या असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र पुढचे १०० वर्षतरी दीदी (लता मंगेशकर) सारखे कुणीही गाऊ शकणार नाही. त्यांचा आवाज जगातले आश्चर्यच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आईचे निधन हा सर्वात वाईट क्षण आणि दीदीला भारतरत्न मिळणे, हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.निवडणुकांकडे भीतीने बघतेहोणाऱ्या निवडणुकांकडे कसे बघता, हा प्रश्न विचारला असता, निवडणुकीकडे भीतीने बघत असल्याचे त्यांनी सांगितले. काय होईल हे सांगता येत नाही, मात्र कोणतेही असो, ते स्थायी सरकार यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कलावंतांच्या अभिव्यक्तीबाबत विचारले असता, कलाकारांनी योग्य असेल तर बाजू घ्यावी आणि चुकीचे असेल तर विरोध करावा असे सांगत, देशाचे नागरिक म्हणून कलावंतांनाही सरकारचे समर्थन अथवा विरोध करण्याचा अधिकार आहे, अशी भावना उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.उषाताईंच्या सोबत हार्मोनीचा ‘त्रिवेणी’ कार्यक्रम आजजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास ठरलेल्या लता मंगेशकर, आशा भोसले व उषा मंगेशकर या तिघी बहिणींच्या संगीत प्रवासाला उजाळा देणारा संगीतमय कार्यक्रम ‘त्रिवेणी’ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सखे सोबती फाऊंडेशन आणि हार्मोनी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात गीत-संगीतासह उषा मंगेशकर यांच्याशी साधलेला संवाद वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. स्वत: उषाताई गाणी सादर करणार असून त्यांच्यासोबत स्थानिक कलावंतांचाही सहभाग राहणार असल्याचे, हार्मोनीचे राजेश समर्थ यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी विजय जथे, प्रफुल्ल मनोहर, रवी अंधारे, मिलिंद देशकर व प्रवीण मनोहर उपस्थित होते.

 

टॅग्स :Usha Mangeshkarउषा मंगेशकरmusicसंगीत