शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

आजच्या संगीतात फारसे चांगले चालले नाही : उषा मंगेशकर यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:45 IST

पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत निर्माण व्हायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. ना शब्द चांगले, ना चाल आणि चित्रपटातील प्रसंगाचा अर्थबोधही त्यातून होत नाही. आजकाल चित्रपट संगीताबाबत फारसे चांगले चालले नाही, अशी खंत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदीदीला भारतरत्न मिळणे सर्वोच्च क्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वीच्या काळी गीतकार खूप विचार करून गीतांची रचना करायचे. पुढे चित्रपटाच्या कोणत्या प्रसंगाला गीत योग्य बसेल इथपासून संगीत कोण देईल, कुणाकडून गाऊन घ्यायचे, यावर चर्चा केली जायची. त्यानंतर १५ दिवस ते महिनाभर त्यावर रिहर्सल व्हायची व नंतरच सुमधूर गीत निर्माण व्हायचे. आता मात्र तसे होताना दिसत नाही. ना शब्द चांगले, ना चाल आणि चित्रपटातील प्रसंगाचा अर्थबोधही त्यातून होत नाही. आजकाल चित्रपट संगीताबाबत फारसे चांगले चालले नाही, अशी खंत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेल्या उषाताईंनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या ६-७ दशकापासून गाण गात असून यात अनेक अनुभव आले, अनेक लोक भेटले. त्यावेळी चांगले गाणारे होते तसे चांगले संगीत निर्माण करणारे संगीतकारही होते. आज मात्र गायक कोण व संगीतकार कोण, हेच लक्षात येत नाही, इतके गायक-संगीतकार दररोज या क्षेत्रात येत आहेत. मात्र त्यांचे अस्तित्व फार काळ टिकत नाही. आधी अनेक दिवसांच्या तयारीनंतर गाणे गायले जायचे आणि गायकांना ते पाठही व्हायचे. आज गाणच बसवलं जात नाही तर ते पाठ कसे होईल, असा सवाल त्यांनी केला. त्यांना बोल आणि चाल विचारत गावे लागते. पूर्वीची गाणी आजही लोकांच्या मनात आहेत. आताचे गाणे आले कधी आणि गेले कधी, हेच कळत नसल्याचे त्या म्हणाल्या. गाण्यांचे रिमिक्स करणे म्हणजे गाण्यांचा आत्मा मारल्यासारखे असते. आधीच्या लोकांनी अतिशय विचारपूर्वक ही गाणी तयार केली आहेत. त्यांचे रिमिक्स करून गाण्यांचे अर्थ आणि भावना बदलविल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान गेल्या काही वर्षात शास्त्रीय संगीताकडे तरुणांचा ओढा वाढला असून चांगले गायक निर्माण होणे, ही सुखदायी बाब असल्याची पावती त्यांनी दिली.उषा मंगेशकर यांची चित्रकार म्हणूनही ओळख आहे. संगीत आणि चित्रकलेचा जवळचा संबंध आहे. आईकडून चित्रकलेची प्रेरणा घेतल्याचे सांगत प्रदर्शनाऐवजी हौसेखातर घरीच पोर्ट्रेट काढत असल्याचे त्यांनी सांगितले. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्याविषयी सांगताना, आम्हा तिन्ही बहिणींचा गायनाचा बाज आणि दिशा वेगवेगळ््या असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र पुढचे १०० वर्षतरी दीदी (लता मंगेशकर) सारखे कुणीही गाऊ शकणार नाही. त्यांचा आवाज जगातले आश्चर्यच आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आईचे निधन हा सर्वात वाईट क्षण आणि दीदीला भारतरत्न मिळणे, हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.निवडणुकांकडे भीतीने बघतेहोणाऱ्या निवडणुकांकडे कसे बघता, हा प्रश्न विचारला असता, निवडणुकीकडे भीतीने बघत असल्याचे त्यांनी सांगितले. काय होईल हे सांगता येत नाही, मात्र कोणतेही असो, ते स्थायी सरकार यावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कलावंतांच्या अभिव्यक्तीबाबत विचारले असता, कलाकारांनी योग्य असेल तर बाजू घ्यावी आणि चुकीचे असेल तर विरोध करावा असे सांगत, देशाचे नागरिक म्हणून कलावंतांनाही सरकारचे समर्थन अथवा विरोध करण्याचा अधिकार आहे, अशी भावना उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली.उषाताईंच्या सोबत हार्मोनीचा ‘त्रिवेणी’ कार्यक्रम आजजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय चित्रपट संगीताचा इतिहास ठरलेल्या लता मंगेशकर, आशा भोसले व उषा मंगेशकर या तिघी बहिणींच्या संगीत प्रवासाला उजाळा देणारा संगीतमय कार्यक्रम ‘त्रिवेणी’ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. सखे सोबती फाऊंडेशन आणि हार्मोनी इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात गीत-संगीतासह उषा मंगेशकर यांच्याशी साधलेला संवाद वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. स्वत: उषाताई गाणी सादर करणार असून त्यांच्यासोबत स्थानिक कलावंतांचाही सहभाग राहणार असल्याचे, हार्मोनीचे राजेश समर्थ यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी विजय जथे, प्रफुल्ल मनोहर, रवी अंधारे, मिलिंद देशकर व प्रवीण मनोहर उपस्थित होते.

 

टॅग्स :Usha Mangeshkarउषा मंगेशकरmusicसंगीत