शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मोझॅक अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

By कमलेश वानखेडे | Updated: October 2, 2023 15:04 IST

नागपर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

नागपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोबतच मोझॅक अळीमुळेही नुकसान झाले. त्यामुळे मंत्रीमंडळाच्या येत्या बैठकीत पीक विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. एसडीआरफ, एनडीआरएफ व पीक विमा या तिहेरी मानकावर मदत केली जाईल, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील अड्याळी व उमरगाव (नागपूर तालुका), पाचगाव, चांपा व गावसुत (उमरेड तालुका), चाफेगडी, मोहगाव, चिचघाट (कुही तालुका) वडना, मोहखेडी व पावडदवना (मौदा तालुका) या अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुंडे म्हणाले, जून महिन्यात सहा तालुक्यात ६५ मि.मी. पाऊस होऊन नुकसान झाले आहे. ८२ पैकी ६२ मंडळ जून आणि सप्टेंबरच्या दोन्ही अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे.

सुरुवातीच्या पेरणीनंतर अतिवृष्टी झाल्याने त्याचे सप्टेंबरमध्ये मंडळात पाच ते सहा वेळा अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा मोठा परिणाम म्हणून पिकांचे नुकसान झाले आहे. या भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. एक रुपया पीक विम्यातून जेथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व दुष्काळ मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना पीक विम्यातून अंतरिम मदत २५ टक्के मदत पीकविमा कंपनी कडून दिली जाणार आहे. २०२१-२२ च्या नुकसान भरपाईची जी शासकीय मदत प्रलंबित आहे ती शेतकऱ्यांना लवरच हस्तांतरित केली जाईल. पुढच्या पाच ते सहा महिन्यानंतर संपूर्ण राज्यात ई- पंचनामे प्रक्रिया राबवली जाईल. अतिवृष्टी असो की नैसर्गिक आपत्ती सर्वांसाठी राज्यात ई पंचनामे सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.

कांद्याचा भाव ज्या ज्या वेळेस पडला साडेतीनशे कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून दिले. कांद्याचे भाव स्थिर रहावे यासाठी अतिरिक्त निर्यात कर लावण्यात आले. देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत २४१० रुपये कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी भाव जाहीर केला. एक लाख टनाची खरेदी शासकीय यंत्रणेने केली, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरू देत नाही

- मागील दहा वर्षांपासून ताईसुद्धा (सुप्रिया सुळे) राजकारणात आहेत. आता दोष कुणाला द्यायचा. पक्षाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. भूमिका त्यांच्याकडे होत्या. विदर्भात सुरवातीपासून १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाला, पण वाटते तेवढी ताकद निर्माण झाली नाही, हे मान्य करावे लागेल. संघटन म्हणून मी आज मंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता मरू देत नाही. याचे मंथन होणे आवश्यक आहे, असा टोलाहीत्यांनी लगावला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसfloodपूरnagpurनागपूर