शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

बालभारतीच्या पुस्तकात काळाशी सुसंगत नवे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 8:51 PM

घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात सर्व विषय हे कृतिशील केले आहे.

ठळक मुद्देव्हीज्युलायझेशनवर विशेष भर : अभ्यासक्रमात आणलीय व्यावहारिकता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. बदललेल्या अभ्यासक्रमात सर्व विषय हे कृतिशील केले आहे.काळानुरूप झालेले बदल, लैंगिक असमानतेचे मागासलेपण मागे टाकत घरातील आई कशी मॉर्डन झाली आहे, तिचे अस्तित्व चूल आणि मूल न राहता ती आता कॉम्प्युटरवर बसून कशी आॅनलाईन साहित्याची खरेदी करते आहे, अशा प्रकारचे अनेक चांगले बदल झाल्याचे जाणवते आहे. विद्यार्थ्यांना समजेल अशी सोपी भाषा, एखादी भूतकाळातील गोष्ट समजावण्यासाठी वर्तमान काळातील उदाहरणांचा केलेला वापर, टेक्नोलॉजी, इंटरनेट आदींचा दिलखुलास वापर या पुस्तकांमध्ये केलेला पहायला मिळत आहे. भूगोलाच्या पुस्तकात त्या देशाची आर्थिक, सामाजिक माहिती, लोकसंख्या, खनिज संपत्ती, नैसर्गिक साधने आदी माहिती दिली आहे.गणिताच्या पुस्तकात नव्याने आलेल्या जीएसटीची माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच शेअर्स, डिबेंचर्स, डिमॅट अकाऊंट काय असते, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज, विमा अशा सर्व संकल्पनांची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यशास्त्राच्या पुस्तकात सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच इंग्रजीच्या पुस्तकात व्यावहारिक भाषेचा समावेश केला आहे. रेल्वेचा फॉर्म कसा भरावा, ईमेल कसा करावा, व्यावहारिक संभाषण आदीला महत्त्व दिले आहे. यावर गुणसुद्धा आहे.नवीन पुस्तकाची वैशिष्ट्ये

  •  सर्व पुस्तकांमध्ये क्यू आर कोड छापण्यात आला आहे.
  •  या पुस्तकांमध्ये भरपूर छायाचित्रांचा वापर केला आहे.
  •  डिजिटल पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक आणि सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणार
  • शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर
  •  मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन सोपे

यंदा प्रथमच बालभारती पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पद्धती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी पुस्तिका देणार आहे. सर्व भाषा तसेच भाषेतर विषयांसाठी स्वतंत्र अशा मूल्यमापन पुस्तिकांची निर्मिती बालभारतीने केली आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना, कृतिपत्रिका, प्रश्नपत्रिका यांचे स्वरूप व निर्मितीचे निकष आणि त्याद्वारे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे. यामुळे दहावीच्या परीक्षेत नेमके काय येणार याचा तपशील विद्यार्थ्यांना या पुस्तिकेच्या आधारे मिळू शकणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. नागपूर विभागात ५२ लाख ६३ हजार पुस्तकांचा पुरवठासर्वशिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून यंदा ५२ लाख ६३ हजार २१४ पुस्तकांची मागणी आली होती. २३ जूनपूर्वी या सर्व पुस्तकांचा पुरवठा करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातून सांगण्यात आले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण